‘तांडव’ वादाने वाढवली शर्मिला टागोर यांची चिंता,  मुलगा सैफला दिला हा खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 10:36 AM2021-01-29T10:36:35+5:302021-01-29T10:38:42+5:30

सैफ अली खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजने मोठा वाद ओढवून घेतला. हा वाद अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये.

sharmila tagore in tension after tandav controversy gives special advice to his son saif ali khan | ‘तांडव’ वादाने वाढवली शर्मिला टागोर यांची चिंता,  मुलगा सैफला दिला हा खास सल्ला

‘तांडव’ वादाने वाढवली शर्मिला टागोर यांची चिंता,  मुलगा सैफला दिला हा खास सल्ला

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘तांडव’च्या वादानंतर शर्मिला यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम झाला आहे.

सैफ अली खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजने मोठा वाद ओढवून घेतला. हा वाद अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे अनेक राज्यांत या वेबसीरिजविरोधात एफआयआर दाखल झालेत. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने ‘तांडव’च्या टीमला एफआयआरपासून दिलासा देण्यास वा अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. यानंतर सैफ अली खानची आई आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या चिंता वाढल्या आहेत. या वादामुळे शर्मिला अतिशय चिंतीत आहेत.

या वादाच्या पार्श्वभूमीवर शर्मिला यांनी सैफला बरेच काही समजावले. शिवाय एक खास सल्लाही दिल्याचे कळतेय. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘तांडव’च्या वादानंतर शर्मिला यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम झाला आहे. शिवाय करिना लवकरच आई बनणार आहे. अशा वादांमुळे कुटुंबातील कोणताही सदस्य कुठल्याहीप्रकारे अडचणीत येता वा त्याला त्रास होता कामा नये, असे शर्मिला यांचे मत आहे. अशास्थितीत त्यांनी सैफची समजून काढली. यापुढे कोणताही प्रोजेक्ट साईन करण्यासाठी स्क्रिप्ट चांगली वाच. शिवाय काहीही बोलण्याआधी सावध राहा. जेणेकरून भविष्यात असे वाद उद्भवणार नाहीत. असा सल्ला त्यांनी मुलाला दिल्याचे कळते.

‘तांडव’ नेमका वाद काय?

अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेबसीरिजला इतका विरोध का होतोय, हे अद्यापही अनेकांना माहित नाही. तर ‘तांडव’च्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता जीशान अय्यूब याला भगवान शिवाच्या गेटअपमध्ये प्ले करताना दाखवण्यात आले आहे. यादरम्यान तो अनेक आक्षेपार्ह विधान करतो. नेमक्या याला लोकांनी विरोध केला आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम यांनीही या सीरिजला जोरदार विरोध केला आहे. सीरिजमधील भगवान शंकराची थट्टा केलेला भाग हटवायला हवा. अभिनेता जिशान अयूब याला यासाठी माफी मागावी तसेच सीरिजच्या निमार्ता व दिग्दर्शकाने हात जोडून आणि गुडघे टेकून माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: sharmila tagore in tension after tandav controversy gives special advice to his son saif ali khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.