रणबीरच्या खांद्यावर ‘ए दिल...’चा भार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 10:37 IST2016-09-22T16:09:27+5:302016-09-23T10:37:04+5:30
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीची रंगत वाढवण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉक्सआॅफिसवर ...

रणबीरच्या खांद्यावर ‘ए दिल...’चा भार!
क ण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीची रंगत वाढवण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉक्सआॅफिसवर करणच्या या चित्रपटाची टक्कर आहे, ती अजय देवगणच्या ‘शिवाय’सोबत. त्यामुळे साहजिकच साम, दाम, भेद वापरून ‘ऐ दिल है मुश्किल’चे आक्रमक प्रमोशन केले जाणार आहे. त्याची तयारीही सुरु झाली आहे. पण खबर आहे, ती ऐश्वर्या या प्रमोशनमध्ये स्वत:च्या अटींवर भाग घेणार याची. होय, ऐश्वर्याने म्हणे चित्रपट साईन करण्याआधीच करणसमक्ष काही अटी ठेवल्या आणि करणने त्या मान्य केल्यावरच तिने हा चित्रपट साईन केला. ही अट होती, आऊटडोअर प्रमोशन न करण्याची. केवळ चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाण्यांच्या लॉन्चला हजेरी लावणार. अन्य ठिकाणी म्हणजे शहरात व शहराबाहेर फिरून चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही, असे ऐश्वर्याने करणला स्पष्ट सांगितले आणि यासाठी सबब दिली ती आराध्याची. म्हणजेच या चित्रपटाचा मोठा मोहरा असलेली ऐश्वर्या प्रमोशनमधून बाद झाली.
![]()
म्हणजे उरला तो रणबीर कपूर, फवाद खान आणि अनुष्का शर्मा हे तिघे. तर यापैकी फवादला खुद्द करणच मीडियापासून दूर ठेवत आहे. त्याची भूमिका सरप्राईज स्वरूपात प्रेक्षकांपुढे आणण्याचा करणचा प्लॅन आहे. आता हा प्लॅन यशस्वी करायचा तर फवाद प्रमोशनमधून आपोआप बाद होतो. मग उरला तो रणबीर व अनुष्का. ऐश्वर्याने प्रमोशनमधून सोयीस्कर अंग काढून घेतल्यावर अनुष्का यात किती रस दाखवणार हा प्रश्न आहे. अशास्थितीत एकंदर काय, तर रणबीरलाच प्रमोशनची नौका पार करावी लागणार आहे. तसेही एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमे दिल्याने रणबीरची नौका डळमळू लागली आहे. तेव्हा ‘ऐ दिल है मुश्किल’च्या यशापयावरून रणबीरच्या करिअरची दिशा ठरणार आहे. त्यामुळेच प्रमोशनचा एकखांदी भार उचलून ‘ऐ दिल है मुश्किल’ची नौका रणबीर कशी आणि कुठे पार करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
म्हणजे उरला तो रणबीर कपूर, फवाद खान आणि अनुष्का शर्मा हे तिघे. तर यापैकी फवादला खुद्द करणच मीडियापासून दूर ठेवत आहे. त्याची भूमिका सरप्राईज स्वरूपात प्रेक्षकांपुढे आणण्याचा करणचा प्लॅन आहे. आता हा प्लॅन यशस्वी करायचा तर फवाद प्रमोशनमधून आपोआप बाद होतो. मग उरला तो रणबीर व अनुष्का. ऐश्वर्याने प्रमोशनमधून सोयीस्कर अंग काढून घेतल्यावर अनुष्का यात किती रस दाखवणार हा प्रश्न आहे. अशास्थितीत एकंदर काय, तर रणबीरलाच प्रमोशनची नौका पार करावी लागणार आहे. तसेही एकापाठोपाठ एक फ्लॉप सिनेमे दिल्याने रणबीरची नौका डळमळू लागली आहे. तेव्हा ‘ऐ दिल है मुश्किल’च्या यशापयावरून रणबीरच्या करिअरची दिशा ठरणार आहे. त्यामुळेच प्रमोशनचा एकखांदी भार उचलून ‘ऐ दिल है मुश्किल’ची नौका रणबीर कशी आणि कुठे पार करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.