मोहम्मद जीशान अय्युब परतला रंगमंचावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 20:26 IST2016-05-02T14:56:59+5:302016-05-02T20:26:59+5:30
मोहम्मद जीशान अय्युब परतला रंगमंचावर टीव्ही आणि चित्रपटानंतर मोहम्मद जीशान अय्युब हा ‘नॅशनल स्कूल ड्रामा’तून बाहेर पडलेल्या आपल्या काही ...

मोहम्मद जीशान अय्युब परतला रंगमंचावर
म हम्मद जीशान अय्युब परतला रंगमंचावर
टीव्ही आणि चित्रपटानंतर मोहम्मद जीशान अय्युब हा ‘नॅशनल स्कूल ड्रामा’तून बाहेर पडलेल्या आपल्या काही सहकाºयांसोबत पुन्हा एकदा रंगमंचावर परतला आहे. ‘रांझणा’ आणि ‘तनु वेड्स मनू रिटर्न’ या चित्रपटात मोहम्मद जीशान अय्यूब महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. आता तो ‘इस कम्बक्त साठे का क्यां करू’ या हिंदी नाटकासह रंगमंचावर परतत आहे. त्याची पत्नी आणि टेलिव्हिजन अभिनेत्री रसिका आगाशे हिने हे नाटक दिग्दर्शित केले असून यात भूमिका साकारली आहे. हे नाटक अभय नावाच्या एका यशस्वी अॅड फिल्म मेकर्सवर बेतलेले आहे. अभयचे सलमा नावाच्या मुस्लिम युवतीसोबत लग्न होते. हे दोघेही मुंबईत राहत असतात. याचदरम्यान अभयला एका मानसिक चक्रात अडकतो. स्वत:ची इतरांसोबत तुलना आणि या तुलनेत स्वत:ला इतरांपेक्षा सरस सिद्ध करण्यासाठीची धडपड असा आंधळा खेळ तो खेळत राहतो. साठे नावाच्या एका मित्राचे यश आणि प्रगती त्याला सतावू लागते. साठे या यशाच्या लायकच नाही, असा समज करून अभय सतत साठेशी स्वत:ची तुलना करीत राहतो. याचदरम्यान सलमा अभयला यातून बाहेर काढण्यासाठी धडपडते, हेच या नाटकाचे कथानक आहे.
![]()
टीव्ही आणि चित्रपटानंतर मोहम्मद जीशान अय्युब हा ‘नॅशनल स्कूल ड्रामा’तून बाहेर पडलेल्या आपल्या काही सहकाºयांसोबत पुन्हा एकदा रंगमंचावर परतला आहे. ‘रांझणा’ आणि ‘तनु वेड्स मनू रिटर्न’ या चित्रपटात मोहम्मद जीशान अय्यूब महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. आता तो ‘इस कम्बक्त साठे का क्यां करू’ या हिंदी नाटकासह रंगमंचावर परतत आहे. त्याची पत्नी आणि टेलिव्हिजन अभिनेत्री रसिका आगाशे हिने हे नाटक दिग्दर्शित केले असून यात भूमिका साकारली आहे. हे नाटक अभय नावाच्या एका यशस्वी अॅड फिल्म मेकर्सवर बेतलेले आहे. अभयचे सलमा नावाच्या मुस्लिम युवतीसोबत लग्न होते. हे दोघेही मुंबईत राहत असतात. याचदरम्यान अभयला एका मानसिक चक्रात अडकतो. स्वत:ची इतरांसोबत तुलना आणि या तुलनेत स्वत:ला इतरांपेक्षा सरस सिद्ध करण्यासाठीची धडपड असा आंधळा खेळ तो खेळत राहतो. साठे नावाच्या एका मित्राचे यश आणि प्रगती त्याला सतावू लागते. साठे या यशाच्या लायकच नाही, असा समज करून अभय सतत साठेशी स्वत:ची तुलना करीत राहतो. याचदरम्यान सलमा अभयला यातून बाहेर काढण्यासाठी धडपडते, हेच या नाटकाचे कथानक आहे.