​कपूर कुटुंबियांना दुबईतून बाहेर जाण्यास करण्यात आली मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 13:12 IST2018-02-27T07:42:05+5:302018-02-27T13:12:05+5:30

श्रीदेवी मृत्यूप्रकरणात आता बोनी कपूर, मोहित मारवाह, कपूर कुटुंबियातील काही मंडळी आणि मारवाह कुटुंबातील काही मंडळींची चौकशी केली जाणार ...

Kapoor family was allowed to go out of Dubai | ​कपूर कुटुंबियांना दुबईतून बाहेर जाण्यास करण्यात आली मनाई

​कपूर कुटुंबियांना दुबईतून बाहेर जाण्यास करण्यात आली मनाई

रीदेवी मृत्यूप्रकरणात आता बोनी कपूर, मोहित मारवाह, कपूर कुटुंबियातील काही मंडळी आणि मारवाह कुटुंबातील काही मंडळींची चौकशी केली जाणार आहे. बोनी कपूर तसेच तिथे उपस्थित असलेल्या कपूर कुटुंबियांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत दुबईच्या बाहेर जाऊ नये असे त्यांना सांगण्यात आले आहे. श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम झाले असून त्यांचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला असल्याचे फॉरेन्सिक अहवालात म्हणण्यात आले आहे. 
श्रीदेवी यांचा हृद्यविकाराने मृत्यू झाला असल्याची चर्चा शनिवारपासून होती. पण आता त्यांच्या मृत्यूप्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. त्यामुळे आता श्रीदेवी यांच्या फोन रेकॉर्डची तपासणी केली जाणार आहे. तसेच श्रीदेवी यांचे जुने मेडिकल रिपोर्ट देखील भारतातून मागवण्यात आले आहेत. श्रीदेवी यांच्यावर कोणते उपचार सुरू होते का याविषयी देखील ते जाणून घेणार आहेत. तसेच त्यांनी केलेल्या सर्जरीचे देखील रिपोर्ट मागण्यात आले आहेत. या सगळ्याचा त्यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का याची तपासणी देखील पोलिस करणार आहेत. 
श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. १९६७ साली एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले होते.
श्रीदेवी यांनी १९७८ ला सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. त्याचबरोबर, श्रीदेवी यांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

Also Read : ही होती श्रीदेवी यांची अंतिम इच्छा


Web Title: Kapoor family was allowed to go out of Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.