जितक्या मुलींना डेट केलं, तितका मी..., विवेक ओबेरॉयचा लव्हलाईफबद्दल खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 10:33 AM2022-04-24T10:33:43+5:302022-04-24T10:34:53+5:30

Vivek Oberoi : होय, ताज्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने त्याच्या कॉन्ट्रोव्हर्सिअल लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे.

Bollywood actor vivek oberoi opens up on his bitter love life | जितक्या मुलींना डेट केलं, तितका मी..., विवेक ओबेरॉयचा लव्हलाईफबद्दल खुलासा

जितक्या मुलींना डेट केलं, तितका मी..., विवेक ओबेरॉयचा लव्हलाईफबद्दल खुलासा

googlenewsNext

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi)यांच्यातील वैर जगापासून लपून राहिलेलं नाही. ऐश्वर्या राय हे या वैराचं कारण ठरली होती, हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे. 2003 मध्ये विवेक ओबेरॉयनं स्वत: पत्रपरिषद घेत, सलमानबद्दल एक मोठा खुलासा केला होता. ‘मी आणि ऐश्वर्या सोबत आल्यानंतर सलमानकडून मला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. सलमानने रात्री नशेत मला 42 वेळा फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली,’ असा हा खुलासा होता. त्याच्या या खुलाशानंतर फिल्म इंडस्ट्रीने विवेकला काम देणं बंद केलं होतं. अनेक वर्षे विवेक इंडस्ट्रीतून गायब होता. अर्थात काही वर्षांनंतर विवेक पुन्हा फिल्म इंडस्ट्रीत परतला आणि आजही तो काम करतोय. हा सगळा एपिसोड सांगण्याचे कारण म्हणजे, विवेकची ताजी मुलाखत.  

होय, पिंकविलाला दिलेल्या ताज्या मुलाखतीत विवेकने त्याच्या कॉन्ट्रोव्हर्सिअल लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे.

‘रिलेशनशिपमध्ये असताना मला अनेक वाईट अनुभव आलेत. यानंतर एका टप्प्यावर मला फक्त कॅज्युअल रिलेशनशिप हवं होतं. मी जितक्या अधिक मुलींना डेट केलं, तितका मी एकटा पडत गेलो. लव्ह रिलेशनशिपमध्ये एकेकाळी मी खूप काही सोसलं. त्यामुळे मी चिडचिडा झालो होतो. माझं मन कटुतेनं भरून गेलं होतं. त्यानंतर मला फक्त कॅज्युअल रिलेशनशिप हवं होतं. त्याआधी माझ्या आयुष्यात अनेकजणी आल्यात आणि जितक्या मुली आयुष्यात आल्यात, तितकी अधिक एकटेपणाची जाणीव तीव्र होती’, असं तो म्हणाला.
2010 साली विवेकने प्रियंका अल्वाशी अरेंज मॅरेज केलं. आता त्यांना दोन मुलं आहेत आणि विवेक आपल्या संसारात आनंदी आहे.

सलमानने दिली होती धमकी
सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्या भांडणाचं कारण ऐश्वर्या राय होती. ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर सलमान व ऐश्वर्या प्रेमात पडले होते. जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. त्यावेळी ऐश्वर्यानं सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांनतर ऐश आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील जवळीक वाढली होती.  पण सलमानला ते सहन झालं नाही. याचमुळे त्याने विवेकला फोन करून शिवीगाळ केली होती. पण आता  विवेक हे सगळं विसरून आयुष्यात बराच पुढे निघून गेला आहे. 

Web Title: Bollywood actor vivek oberoi opens up on his bitter love life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.