Birthday Special : त्या काळात कंडोम विकायलाही तयार होता शाहरूख खान; असा बनला ‘रोमान्सचा बादशाह’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 10:30 IST2017-11-02T05:00:26+5:302017-11-02T10:30:26+5:30
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याचा आज (२ नोव्हेंबर) वाढदिवस. नव्वदच्या दशकात शाहरुखने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने कधीच मागे ...

Birthday Special : त्या काळात कंडोम विकायलाही तयार होता शाहरूख खान; असा बनला ‘रोमान्सचा बादशाह’!
ब लिवूडचा किंगखान शाहरूख खान याचा आज (२ नोव्हेंबर) वाढदिवस. नव्वदच्या दशकात शाहरुखने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आजवर त्याने ८० हुन अधिक चित्रपट केलेत. ‘डर’, ‘बाजीगर’, ‘अंजाम’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘देवदास’,‘स्वदेश’, ‘माय नेम इज खान’, ‘चक दे इंडिया’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ असे अनेक सूपरहिट चित्रपट शाहरुखने दिले आहेत. त्याच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’या चित्रपटाने तर २० वर्षे अखंड प्रेक्षकांच्या मनात राज्य केले. आज शाहरूखकडे सगळे आहे. ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी सगळे. पण इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी शाहरूखने अपार संघर्ष केला आहे. त्याची पत्नी गौरी खान हिने पदोपदी शाहरूखला सोबत केली. प्रत्येक संकटाच्या वेळी ती शाहरूखच्या खंबीरपणे शाहरूखच्या पाठीशी उभी राहिली.
![]()
![]()
अनुपमा चोप्रा यांनी शाहरूखच्या आयुष्यावर लिहिलेल्या ‘शहंशाह ए बॉलिवूड’ या चरित्रात्मक पुस्तकात अनेक किस्से आहेत.शाहरूखच्या संघर्षाच्या काळातील हे अनेक किस्से कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील. पुस्तकानुसार, उमेदीच्या काळात शाहरूखला सपोर्ट करण्यासाठी गौरी स्वत: नोकरी करायची. प्रेक्षकांना अविवाहित रोमॅन्टिक हिरो आवडायचे, त्याकाळात शाहरूखने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. याचमुळे आमिर खानने आपल्या लग्नाची बातमी चार वर्षांपर्यंत लपवून ठेवली होती. शाहरूखने मात्र गौरीसोबतचे नाते कुणापासूनही लपवले नाही. अनेकांनी शाहरूखला चित्रपट हिट होत नाही, तोपर्यंत लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. पण शाहरूख ठाम होता. मी चित्रपट सोडू शकतो. पण लग्न टाळू शकत नाही. तिच्याशिवाय मी वेडा होईल. तिच माझी संपत्ती आहे, असे शाहरूख त्यांना सांगायचा. त्याने आपले प्रेम कधीच लपवले नाही.
![]()
प्रारंभी शाहरूख चित्रपटांसाठी अतिशय कमी फी घ्यायचा. स्टार बनल्यानंतरही त्याची फी कमी होती. लोक त्याकाळात त्याला कमी बजटवाला स्टार म्हणायचे. चित्रपटांनी शाहरूखला अनेक चाहते दिलेत. पण त्याला सर्वाधिक प्रसिद्धी लहान पडद्यावरील जाहिरातींनी दिली. त्याकाळात आमिर खान एका जाहिरातीसाठी सात कोटी घ्यायचा. शाहरूख अर्ध्या किमतीत जाहिरात करायचा. चित्रपट करणे शाहरूखची आवड होती. पण जाहिरातींनी त्याचे घर चालायचे. १९९८ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत शाहरूख याबद्दल बोलला होता. ‘मला बंगल्यासाठी पैसे हवेत. मुलाचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी मला पैशांची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठीही मला पैसे हवेत. पैशांसाठी मी कोला नाही तर कंडोमही विकेल’, असे तो म्हणाला होता.
![]()
ALSO READ: पाहा, शाहरूख खान व गौरी खानचे candid-moments !!
शाहरूख खानला आज ‘रोमान्सचा बादशाह’ म्हटले जाते. तो जिथेकुठे जातो तिथे त्याची रोमॅन्टिक सिग्नेचर स्टेज करण्याची विनंती त्याला केली जाते. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की, शाहरूखला पडद्यावरचा लव्हर बॉय बनण्यात कुठलाही इंटरेस्ट नव्हता. यामागेही एक किस्सा आहे. होय, कॅमेºयासमोर रोमान्स करताना शाहरूख लाजायचा. त्यामुळे असे चित्रपट टाळण्याकडे त्याचा कल असायचा. पण मग शाहरूख ‘रोमान्सचा बादशाह’ कसा बनला? शाहरूखने एका मुलाखतीत याबाबतचा किस्सा सांगितला होता. त्याने सांगितले होते की, ‘ मी यश चोप्रा यांच्या ‘डर’मध्ये काम करत होतो. यात माझी भूमिका निगेटीव्ह होती. त्याचवेळी यशजी मला म्हणाले होते. तू पडद्यावर रोमान्स करणार नसशील तर तुझे काहीही होणार नाही. त्यांनी हे वाक्य मला अनेकदा ऐकवले.त्यांच्या बोलण्याचा मी सुद्धा विचार केला. यशजी म्हणताहेत म्हणजे, त्यात काही तथ्य असणार, हे मला पटले आणि मग हिम्मत जुटवून मी रोमॅन्टिक भूमिका करायला सुरुवात केली. मी यशजींचा विश्वास सोबत घेऊन जगलो आणि आज मला त्याचे फळ मिळतेय.’
अनुपमा चोप्रा यांनी शाहरूखच्या आयुष्यावर लिहिलेल्या ‘शहंशाह ए बॉलिवूड’ या चरित्रात्मक पुस्तकात अनेक किस्से आहेत.शाहरूखच्या संघर्षाच्या काळातील हे अनेक किस्से कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील. पुस्तकानुसार, उमेदीच्या काळात शाहरूखला सपोर्ट करण्यासाठी गौरी स्वत: नोकरी करायची. प्रेक्षकांना अविवाहित रोमॅन्टिक हिरो आवडायचे, त्याकाळात शाहरूखने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. याचमुळे आमिर खानने आपल्या लग्नाची बातमी चार वर्षांपर्यंत लपवून ठेवली होती. शाहरूखने मात्र गौरीसोबतचे नाते कुणापासूनही लपवले नाही. अनेकांनी शाहरूखला चित्रपट हिट होत नाही, तोपर्यंत लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. पण शाहरूख ठाम होता. मी चित्रपट सोडू शकतो. पण लग्न टाळू शकत नाही. तिच्याशिवाय मी वेडा होईल. तिच माझी संपत्ती आहे, असे शाहरूख त्यांना सांगायचा. त्याने आपले प्रेम कधीच लपवले नाही.
प्रारंभी शाहरूख चित्रपटांसाठी अतिशय कमी फी घ्यायचा. स्टार बनल्यानंतरही त्याची फी कमी होती. लोक त्याकाळात त्याला कमी बजटवाला स्टार म्हणायचे. चित्रपटांनी शाहरूखला अनेक चाहते दिलेत. पण त्याला सर्वाधिक प्रसिद्धी लहान पडद्यावरील जाहिरातींनी दिली. त्याकाळात आमिर खान एका जाहिरातीसाठी सात कोटी घ्यायचा. शाहरूख अर्ध्या किमतीत जाहिरात करायचा. चित्रपट करणे शाहरूखची आवड होती. पण जाहिरातींनी त्याचे घर चालायचे. १९९८ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत शाहरूख याबद्दल बोलला होता. ‘मला बंगल्यासाठी पैसे हवेत. मुलाचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी मला पैशांची गरज आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठीही मला पैसे हवेत. पैशांसाठी मी कोला नाही तर कंडोमही विकेल’, असे तो म्हणाला होता.
ALSO READ: पाहा, शाहरूख खान व गौरी खानचे candid-moments !!
शाहरूख खानला आज ‘रोमान्सचा बादशाह’ म्हटले जाते. तो जिथेकुठे जातो तिथे त्याची रोमॅन्टिक सिग्नेचर स्टेज करण्याची विनंती त्याला केली जाते. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की, शाहरूखला पडद्यावरचा लव्हर बॉय बनण्यात कुठलाही इंटरेस्ट नव्हता. यामागेही एक किस्सा आहे. होय, कॅमेºयासमोर रोमान्स करताना शाहरूख लाजायचा. त्यामुळे असे चित्रपट टाळण्याकडे त्याचा कल असायचा. पण मग शाहरूख ‘रोमान्सचा बादशाह’ कसा बनला? शाहरूखने एका मुलाखतीत याबाबतचा किस्सा सांगितला होता. त्याने सांगितले होते की, ‘ मी यश चोप्रा यांच्या ‘डर’मध्ये काम करत होतो. यात माझी भूमिका निगेटीव्ह होती. त्याचवेळी यशजी मला म्हणाले होते. तू पडद्यावर रोमान्स करणार नसशील तर तुझे काहीही होणार नाही. त्यांनी हे वाक्य मला अनेकदा ऐकवले.त्यांच्या बोलण्याचा मी सुद्धा विचार केला. यशजी म्हणताहेत म्हणजे, त्यात काही तथ्य असणार, हे मला पटले आणि मग हिम्मत जुटवून मी रोमॅन्टिक भूमिका करायला सुरुवात केली. मी यशजींचा विश्वास सोबत घेऊन जगलो आणि आज मला त्याचे फळ मिळतेय.’