Jagga Jasoos : ...म्हणून 'जग्गा जासूस'मधून गोविंदाला दाखवला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 06:15 PM2021-09-21T18:15:17+5:302021-09-21T18:15:50+5:30

Jagga jasoos: 'जग्गा जासूस'मधून गोविंदाला काढल्यानंतर त्याने २०१७ मध्येच एक ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती.

anurag basu opens up about why govinda got removed from jagga jasoos | Jagga Jasoos : ...म्हणून 'जग्गा जासूस'मधून गोविंदाला दाखवला बाहेरचा रस्ता

Jagga Jasoos : ...म्हणून 'जग्गा जासूस'मधून गोविंदाला दाखवला बाहेरचा रस्ता

googlenewsNext
ठळक मुद्दे'जग्गा जासूस'मध्ये अभिनेता गोविंदाचीही वर्णी लागली होती.

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग बासू (Anurag Basu) यांचा जग्गा जासूस (Jagga Jasoos) हा चित्रपट २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकले होते. विशेष म्हणजे या दोन लोकप्रिय कलाकारांसोबतच अभिनेता गोविंदा (Govinda)  याचीही या चित्रपटामध्ये वर्णी लागली होती. मात्र, चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच अचानकपणे गोविंदाला(Govinda)  या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. 

'मिड डे'च्या वृत्तानुसार, गोविंदा अनप्रिडिक्टेबल असल्यामुळे त्याला या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. अनुराग बासूने स्वत: याविषयी मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलं आहे. 

'मुली दान करायची गोष्ट नाही'; कन्यादानाच्या 'त्या' जाहिरातीमुळे आलिया ट्रोल

मुळात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होण्यासच फार उशीर झाला होता. त्यातच गोविंदा सेटवर नेमके कधी येणार याची काहीच माहिती नव्हती. मुळात ते साऊथ आफ्रिकेला येणार आहेत की नाही, त्यांनी इकडे येण्यासाठी फ्लाइट पकडली आहे की नाही हेदेखील आम्हाला माहित नव्हतं. त्यांचं वागणं एकदमच Unpredictable होतं. आणि, त्या काळात मला या सगळ्या गोष्टींचा मानसिक ताण सहन करणं शक्य नव्हतं. त्यामुळेच मग गोविंदाला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवावा लागला.

गोविंदाने व्यक्त केली नाराजी

'जग्गा जासूस'मधून गोविंदाला काढल्यानंतर त्याने २०१७ मध्येच एक ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. एक अभिनेता म्हणून मी माझं काम केलं होतं. जर दिग्दर्शक म्हणून ते माझ्या कामावर खुश नसतील तर तो त्यांचा निर्णय आहे.

दरम्यान,  'जग्गा जासूस' मी केवळ रणबीरसाठी करत होतो. माझ्या मनात कपूर कुटुंबाविषयी प्रचंड आदर आहे. त्यामुळेच मी हा चित्रपट करत होतो. मुळात मला दिग्दर्शकांनी कोणतीही साइनिंग अमाऊंट किंवा कॉन्ट्रॅक्ट दिलं नव्हतं.

रणबीरने मागितली होती माफी

चित्रीकरणादरम्यान अनेक बदल करण्यात आले. काही कॅरेक्टर्स बदलण्यात आले. त्यामुळे मनापासून माफी मागतो असं रणबीर म्हणाला होता. या चित्रपटाची निर्मिती रणबीरने केली होती.
 

Web Title: anurag basu opens up about why govinda got removed from jagga jasoos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.