अक्षयकुमारच्या ‘भारत के वीर’ने केली कमाल, शहिदांच्या कुटुंबीयांसाठी जमा केले इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 16:22 IST2018-04-10T10:51:40+5:302018-04-10T16:22:00+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचे देशप्रेम कधीच लपून राहिले नाही. वेळोवेळी तो शहिदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावून गेला. विशेष म्हणजे त्याने ...

अक्षयकुमारच्या ‘भारत के वीर’ने केली कमाल, शहिदांच्या कुटुंबीयांसाठी जमा केले इतके कोटी!
ब लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याचे देशप्रेम कधीच लपून राहिले नाही. वेळोवेळी तो शहिदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावून गेला. विशेष म्हणजे त्याने नेहमीच सढळ हाताने मदत केली. गेल्या काही दिवसांपासून तो शहिदांच्या कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी एक उपक्रम राबवित असून, त्यात त्याला चांगले यश मिळताना दिसत आहे. होय, अक्षयने शहिदांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून २९ कोटी रुपये जमा केले आहेत. या पैशांच्या माध्यमांतून त्यांना तब्बल १५९ परिवारांना आर्थिक मदत केली आहे.
![]()
अक्षयने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती देताना लिहिले की, ‘भारत के वीर’ला एक वर्ष पूर्ण झाले आहे. जे स्वप्न बघितले होते ते आता खरे झाले आहे. हे सांगताना आनंद होत आहे की, आम्ही २९ कोटी रुपये जमा केले आहेत. ज्यामध्ये १५९ परिवारांना मदत केली आहे. तुमचे सहकार्य असेच असू द्या.’ अक्षयकुमारने गेल्या वर्षी सरकारच्या मदतीने ‘भारत के वीर’ नावाने एक वेबसाइट सुरू केली होती. या वेबसाइटच्या माध्यमातून शहिदांच्या परिवारांसाठी आर्थिक मदत गोळा करण्यात आली. एका परिवाराच्या नावे १५ लाख रुपयांची मदत जमा होताच, ते अकाउंट वेबसाइटवरून काढून टाकले जायचे.
![]()
या वेबसाइटच्या माध्यमातून कोणत्याही शहिदांच्या परिवाराला आर्थिक मदत प्राप्त करणे सोपे झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ही वेबसाइट लॉन्च केली होती. यानंतर अक्षयने लोकांना वेबसाइटच्या माध्यमातून कशाप्रकारे आर्थिक मदत केली जाऊ शकते हे समजावून सांगितले. गेल्यावर्षी अक्षयने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १०३ शहिदांच्या कुटुंबीयांना पत्र पाठविले होते. अक्षयने कोल्हापुरातील शहिदांच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांचा धनादेश देताना त्याच्यासोबत एक प्रेम संदेशही पाठविला होता.
अक्षयने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती देताना लिहिले की, ‘भारत के वीर’ला एक वर्ष पूर्ण झाले आहे. जे स्वप्न बघितले होते ते आता खरे झाले आहे. हे सांगताना आनंद होत आहे की, आम्ही २९ कोटी रुपये जमा केले आहेत. ज्यामध्ये १५९ परिवारांना मदत केली आहे. तुमचे सहकार्य असेच असू द्या.’ अक्षयकुमारने गेल्या वर्षी सरकारच्या मदतीने ‘भारत के वीर’ नावाने एक वेबसाइट सुरू केली होती. या वेबसाइटच्या माध्यमातून शहिदांच्या परिवारांसाठी आर्थिक मदत गोळा करण्यात आली. एका परिवाराच्या नावे १५ लाख रुपयांची मदत जमा होताच, ते अकाउंट वेबसाइटवरून काढून टाकले जायचे.
या वेबसाइटच्या माध्यमातून कोणत्याही शहिदांच्या परिवाराला आर्थिक मदत प्राप्त करणे सोपे झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ही वेबसाइट लॉन्च केली होती. यानंतर अक्षयने लोकांना वेबसाइटच्या माध्यमातून कशाप्रकारे आर्थिक मदत केली जाऊ शकते हे समजावून सांगितले. गेल्यावर्षी अक्षयने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १०३ शहिदांच्या कुटुंबीयांना पत्र पाठविले होते. अक्षयने कोल्हापुरातील शहिदांच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांचा धनादेश देताना त्याच्यासोबत एक प्रेम संदेशही पाठविला होता.