Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इगो बाजूला ठेव अन्..."; भारताला हरवल्यानंतर आफ्रिकन कर्णधार एडन मार्करमच्या विधानाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 00:44 IST

Open in App
1 / 6

टीम इंडियाचा सुपर-८च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ७६ धावांनी पराभव केला. या पराभवाने नेट रन रेटवर परिणाम झाला असून भारताचे सेमीफायनलचे गणित बिघडले.

2 / 6

दक्षिण आफ्रिकेचीही फलंदाजी खराब झाली होती, पण नंतर पिच समजून घेत त्यांनी मोठी धावसंख्या उभारली. याच मुद्द्यावरून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने मत मांडले.

3 / 6

'आमची कामगिरी उत्तम झाली. वेगळ्या पद्धतीच्या पिचवर आमच्या संघाच्या खेळाडूंनी पटकन परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यानुसार आपला खेळ फुलवला याचा आनंद आहे.'

4 / 6

'आमच्या फलंदाजीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही भागीदारी होती. मिलर आणि ब्रेव्हिस या दोघांनी दमदार फलंदाजी करत धावा केल्या आणि आम्हाला विजयाची आशा दिली.'

5 / 6

'मैदानात आमच्याकडूनही चुका होतील. एक संघ म्हणून आम्ही त्याचे दडपण घेत नाही. आधीच्या चुका बाजूला सारून नव्याने कसे खेळायचे याकडे आमच्या संघाचे लक्ष असेल.'

6 / 6

'आमच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली होती पण नंतर फलंदाजांनी हुशारी दाखवली. इगो बाजूला ठेव अन् धावा काढण्यावर लक्ष दे असं प्रत्येकजण स्वत:ला समजावत होता,' असे मार्करम म्हणाला.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाद. आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादव