भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पराभव केला आणि कसोटी मालिका २-०ने जिंकली.
पहिल्या कसोटीत खराब कामगिरी केल्यानंतर, भारतीय संघाकडून दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमनाची अपेक्षा होती. पण सर्व खेळाडूंनी निराशा केली आणि अपेक्षा फोल ठरल्या.
आफ्रिकेने दिलेले ५४९ धावांचे महाकाय लक्ष्य टीम इंडियाला झेपले नाही. भारताचा डाव १४० धावांत आटोपला आणि कसोटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव झाला.
या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी भारतीय संघाबाबत रोखठोक मत मांडले. त्यांनी भारतीय संघाला चांगलेच सुनावले.
'सध्याच्या कसोटी संघाला सुधारणेला खूप वाव आहे. काही खेळाडू कसोटीसाठी तयार नाहीत. पण प्रश्न असा आहे की किती जण खरोखर सज्ज आहेत?'
'पूर्वीचा टीम इंडियाचा भारतीय पिचवर दबदबा होता. भारतात भारतीय संघाला हरवणे शक्य होत नव्हते. पण आता तो दबदबा हळूहळू नाहीसा व्हायला लागलाय.'
'दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बवुमाला कर्णधार म्हणून निवडणे हे खूपच प्रेरणादायी आहे. तो त्याच्या नेतृत्वकौशल्याने आफ्रिकन संघाला नवनव्या उंचीवर नेण्यात सफल झालाय.'
'भारत आणि आफ्रिका यांच्यातील क्रिकेट संबंध कायम मैत्रिपूर्ण राहिलेत. त्यामुळे दोन्ही बाजूने बोलण्यात आलेले आक्षेपार्ह शब्द पुन्हा ऐकायला मिळू नयेत', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.