रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आयसीसीच्या दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. २०२३ मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धा गमावल्यावर २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप आणि २०२५ च्या हंगामातील चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपद पटकावले. रोहित शर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल वेळी ड्रेसिंग रुममधील माहोल कसा होता याचा खास किस्सा शेअर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
..अन् रोहित शर्माला भरली होती धडकी
भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत ट्रॉफीवर नाव कोरले होते. या स्पर्धेत रोहित शर्मा हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण अंतिम सामन्यात तो फक्त ९ धावांवर बाद झाला होता. रोहित पाठोपाठ रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादवही स्वस्तात तंबूत परतले. ३४ धावांत ३ विकेट्स गमावल्याचे पाहून रोहित शर्माला धडकीच भरली होती. खुद्द रोहितनं याचा खुलासा केला आहे. आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतल्यावर ड्रेसिंग रुममध्ये शांतता पसरली होती. मी खूप घाबरलो होतो, असे रोहित शर्मानं म्हटले आहे.
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
कोहली यातून बाहेर काढेल याची खात्री होती
जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, अंतिम सामन्यात अल्प धावसंख्येवर ३ विकेट्स गमावल्यावर ड्रेसिंग रुममध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मी घाबरलो होतो. कारण सामना त्यांच्या बाजूनं झुकलाय (दक्षिण आफ्रिकेचा संघ) असं मला वाटत होते. अनुभवी कोहली या संकटातून बाहेर काढेल, याची खात्री होती. जे घडलं ते बाजूला ठेवून त्याने चांगली खेळी केली अन् ड्रेसिंग रुममधील वातावरण बदलले, असे रोहित शर्मानं सांगितले.
कोहलीशिवाय या खेळाडूच्या खेळीलाही दिली दाद
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, अक्षरच्या खेळीबद्दल लोक फारसे बोलत नाहीत. त्याची खेळी ही सामन्याला कलाटणी देणारी होती. संघ अडचणीत असताना ३१ चेंडूत ४७ धावांची खेळू खूप मौल्यवान होती. डावात एका फलंदाजाने मोठी खेळी करणे गरजेचे होते. ती भूमिका विराट कोहलीनं अगदी उत्तमरित्या बजावली. याआधी आम्ही शेवटच्या क्षणी पराभव अनुभवला होती. (२०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव) याची पुनरावृत्ती कराची नव्हती. त्यामुळे टी २० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याची संधी सोडायची नाही हे ठरवलं होतं. यासाठी योग्य नियोजन आणि मेहनत घेतली, त्याचं फळं मिळाल, असेही तो यावेळी म्हणाला.