Join us

Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

IND vs PAK, Asia Cup 2025: पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांमुळे भारताने त्यांच्याशी खेळू नये असा चाहत्यांचा सूर आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:24 IST

Open in App

IND vs PAK match latest update, Asia Cup 2025: आशिया कप २०२५ मधील महामुकाबला म्हणजेच भारत आणि पाकिस्तान संघांमधील सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिराती (यूएई) ला जाईल. तिथे भारताचा सामना १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध ग्रुप अ मध्ये होईल. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, या स्पर्धेत टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार का? जाणून घेऊया.

भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार?

दोन्ही देशांमधील तणावानंतर, अनेक भारतीय चाहत्यांचे असे मत आहे की टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्येही असेच काहीसे दिसून आले. परंतु एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभान अहमद यांच्या मते, आशिया कपमध्ये या दोन्ही संघांमध्ये सामना खेळला जाईल. द नॅशनलच्या वृत्तानुसार, सुभान म्हणाले की, आम्ही कोणतीही हमी देऊ शकत नाही, परंतु आशिया कपची तुलना WCL सारख्या खाजगी स्पर्धेशी करणे योग्य नाही. जेव्हा आशिया कप खेळण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा सरकारची परवानगी आधीच घेतली जाते. त्यामुळे आशा आहे की WCL सारखी परिस्थिती या स्पर्धेत निर्माण होणार नाही.

स्पर्धेत ८ संघ सहभागी

२०२५चा आशिया कप टी२० स्वरूपात खेळला जाईल. २०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. यावेळी स्पर्धेत आठ संघ सहभागी होत आहेत. भारत आणि पाकिस्तान हे ग्रुप अ मध्ये यूएई आणि ओमानसह आहेत, तर ग्रुप ब मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. जर दोन्ही संघ सुपर फोर आणि फायनलमध्ये पोहोचले तर भारत आणि पाकिस्तान तीनदा एकमेकांसमोर येऊ शकतात.

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तानसंयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ