Join us

IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

कोणत्या खेळाडूसंदर्भात नेमकं काय म्हणाला गांगुली? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:10 IST

Open in App

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने श्रेयस अय्यर संघात नाही, ही गोष्ट खटकणारी असल्याचे बोलून दाखवले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे भारतीय संघात अनुभवाची कमी आहे. ही उणीव भरुन काढण्याची क्षमता असणाऱ्या श्रेयस अय्यरच्या नावाचा इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी विचार व्हायला हवा होता, असा सूरही भारतीय संघाची घोषणा झाल्यावर उमटल्याचे पाहायला मिळाले. आता सौरव गांगुलीनं इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाच्या निवडीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत बीसीसीआय निवड समितीचे अजित आगरकर यांच्याशी पंगा घेतला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सर्वोत्तम फॉर्म अन् आखूड टप्प्याच्या चेंडूवरील फटकेबाजीचाही दिला दाखला 

सौरव गांगुली म्हणाला आहे की, श्रेयस अय्यरचा सध्याचा फॉर्म पाहता इंग्लंड दौऱ्यावर त्याला संधी मिळायला हवी होती. मागील एक वर्षांपासून तो सातत्याने चांगली कामगिरी करतोय. तो असा खेळाडू आहे ज्याला संघाबाहेर ठेवता येऊ शकत नाही. तो दबावातही धावा करताना दिसून येते. जबाबदारीनं खेळताना आखूड टप्प्याच्या चेंडूवरही तो चांगली फटकेबाजी करतोय. व्हाइट बॉल क्रिकेटच्या तुलनेत कसोटीत वेगळे आव्हान असते. पण तरीही त्याचा कसोटी संघात समावेश करून इथं तो काय करतोय ते पाहायला हवे, असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे.   

टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट

आगरकर म्हणाले होते की, तो चांगला खेळतोय पण...

इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला संघात स्थान का नाही? या प्रश्नावर अजित आगरकर म्हणाले होते की, तो सध्या व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. कसोटीत त्याला संधी मिळेल, पण यासाठी त्याला आणखी प्रयत्न करावे लागतील.  श्रेयस अय्यरची कसोटीतील कामगिरी श्रेयस अय्यरनं २०२१ मध्ये कानपूरच्या मैदानातील ग्रीन पार्कच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात त्याने १०५ धावांची खेळी केली होती. एवढेच नाही तर दुसऱ्या डावातही त्याच्या भात्यातून ६५ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तो कसोटी संघातील स्थान टिकवण्यात अपयशी ठरला. आतापर्यंत १४ कसोटी सामन्यातील २४ डावात त्याने ३६.८६ च्या सरासरीसह ८११ धावा केल्या आहेत. यात पदार्पणातील कसोटी सामन्यातील शतकासह ५ अर्धशतकांचा समावेस आहे. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५श्रेयस अय्यरसौरभ गांगुलीअजित आगरकरबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ