सुशांतला बॉलिवूड सोडून शेती का करायची होती? कंगना राणौतने पुन्हा साधला घराणेशाहीवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 03:54 PM2020-07-29T15:54:22+5:302020-07-29T15:56:10+5:30
पुन्हा बरसली कंगना राणौत...
वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाने अचानक वळण घेतले आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतची कथित गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय सुशांत बॉलिवूडची दुनिया सोडून केरळमध्ये ऑर्गेनिक शेती करू इच्छित होता, असा खुलासाही केला आहे. साहजिकच बॉलिवूडमधील झगमगाट सोडून सुशांतला शेती का करायची होती, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिनेही नेमका हाच प्रश्न विचारत पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीवर वार केला आहे. नेहमीप्रमाणे ट्वीट करत तिने अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
Entire 2019 Shushant didn’t shoot for any film, he was boycotted by film mafia his father has mentioned he wanted to quit and do organic farming, why such a power house of talent had to quit he left glorious career in science, why farming now ? #RheaChakraborty
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 28, 2020
‘2019 या वर्षभरात सुशांतने कोणत्याही सिनेमासाठी शूटींग केले नव्हते. कारण फिल्म माफियांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. सुशांतच्या वडिलांनी सांगितले की, तो शेती करू इच्छित होता. प्रतिभेचे ‘पॉवर हाऊस’ असलेला आणि सायन्समधील शानदार करिअर सोडून बॉलिवूडमध्ये आलेला सुशांत अखेर शेती का करू इच्छित होता?’ असा सवाल कंगनाने केला आहे.
She used his fear of mafia media their bullying and ban, it’s very common to have mental health issues because of extreme struggles, in Hollywood people even flaunt it, why he thought better to die then to face their smear campaigns, why?#RheaChakraborty#WhyFearCBIForSSR
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 28, 2020
रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कंगनाने मीडियावर निशाणा साधला आहे. ‘रिया चक्रवर्तीने सुशांतला मीडिया माफियांची भीती दाखवत त्याला घाबरवले, धमकावले, बॅन करण्याची धमकी दिली. प्रचंड संघर्षाच्या काळात मानसिक आरोग्यासंदर्भातील समस्या होणे स्वाभाविक आहे. हॉलिवूडमधील अनेक कलाकारही यातून गेले आहेत. सुशांतला त्याला बदनाम करण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेला सामोरे जाण्याऐवजी मृत्यू पत्करणे अधिक योग्य का वाटले असेल?’ असे तिने दुस-या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद चांगलाच तापला आहे. कंगना राणौतने हा मुद्दा लावून धरला आहे.