Death Anniversary : दिव्या भारतीच्या निधनानंतर सेटवर घडायच्या विचित्र घटना, वाचून उडेल तुमचा थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 02:15 PM2021-04-05T14:15:21+5:302021-04-05T14:15:43+5:30

वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक विचित्र घटना घडल्या होत्या.

Death Anniversary: Strange events that will happen on the set after Divya Bharati's death, your trembling will fly away after reading | Death Anniversary : दिव्या भारतीच्या निधनानंतर सेटवर घडायच्या विचित्र घटना, वाचून उडेल तुमचा थरकाप

Death Anniversary : दिव्या भारतीच्या निधनानंतर सेटवर घडायच्या विचित्र घटना, वाचून उडेल तुमचा थरकाप

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती सुंदर अभिनेत्रींपैकी एक असून तिने तिच्या लूक्स आणि निरागसतेने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तीन वर्षांच्या छोट्या सिने कारकीर्दीत दिव्या भारतीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या निधनानंतर बॉलिवूडला खूप मोठा धक्का बसला होता. मात्र आजपर्यंत दिव्या भारतीच्या निधनाचे कारण समजू शकले नाही.

५ एप्रिल १९९३ रोजी जवळपास रात्री ११ वाजता अचानक दिव्या भारतीचे निधन झाले. निधनापूर्वी दिव्या भारतीने ९२ चित्रपट साइन केले होते आणि या सर्व चित्रपटांसाठी निर्मात्यांना दिव्याची रिप्लेसमेंट हवी होती. यातील एक चित्रपट होता लाडला. ज्यात अनिल कपूर आणि रवीना टंडन होते. या चित्रपटातील बरेच सीन्स भारतीसोबत शूट केले होते, मात्र अभिनेत्रीच्या निधनानंतर बरेच सीन्स भारतीसोबत शूट केले होते पण अभिनेत्रीच्या निधनानंतर श्रीदेवीची तिच्या जागी वर्णी लागली होती. मग श्रीदेवीने ते सीन शूट केले जे आधी दिव्यासोबत शूट केले होते.

सेटवर घडल्या होत्या विचित्र घटना
असे म्हटले जाते की जेव्हा सहा महिन्यानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली होती तेव्हा सेटवर काही विचित्र घटना घडल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी, शक्ती कपूर आणि रवीना टंडनसोबत एक सीन शूट करत होती. त्यावेळी श्रीदेवीदेखील त्याच ठिकाणी अटकत होती जिथे दिव्या अटकत होती. हे सर्व पाहून रवीना आणि शक्ती कपूरदेखील हैराण झाले होते.

दिव्या स्क्रीनवर आली तशी स्क्रीन पडली
दिव्याचे निधन झाले त्यावेळी ती काही चित्रपटाचं शूटिंग करत होती. काही सिनेमांचे शूटिंग अर्धे झाले होते. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग पुन्हा करावं लागलं. रंग चित्रपटात दिव्या भारतीच्या आयशा जुल्काने काम केलं. आयशा जुल्काने बीबीसीला सांगितलं होतं की, दिव्याच्या निधनानंतर एक खूप मोठी विचित्र गोष्ट घडली. काही महिन्यानंतर आम्ही रंग चित्रपटाचा ट्रायल पाहण्यासाठी फिल्मसिटीला गेलो होतो. जशी दिव्या स्क्रीनवर आली तशी स्क्रीन पडली. आम्हाला हे खूप विचित्र वाटलं.
आयशा जुल्का पुढे म्हणाली की, खूप वेळ विश्वासच बसला नाही. एक आणखीन विचित्र बाब आहे की कदाचित तिला काहीतरी माहित होते. ती नेहमी म्हणायची की, लवकर करा, लवकर चला, जीवन खूप छोटं आहे. तिने कधी स्पष्ट सांगितलं नाही मात्र कदाचित माणसांच्या आतमध्ये एक इंपल्स असतात. तिला प्रत्येक काम लवकर करायचं होतं. तिला जीवनात सगळं काही लवकर मिळत होते. ती स्वतः सांगायची की तिलाच काही समजत नाही. असं वाटतं की कदाचित तिला माहित होतं की ती आपल्यात जास्त दिवस नसेल.

विचित्र किस्से 
दिव्याच्या मृत्यूनंतर अनेक विचित्र किस्से समोर आले होते. खुद्द दिव्या भारतीच्या आईने सांगितले होते की, दिव्याच्या निधनानंतर दिव्या त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना उठवायची. जेव्हा त्याना लवकर उठायचे होते, त्यावेळी दिव्या स्वप्नात येत होती. इतकेच नाही तर दिव्या साजिद नाडियादवालाची दुसरी पत्नी वर्धाच्या स्वप्नात येत होती.
 

Web Title: Death Anniversary: Strange events that will happen on the set after Divya Bharati's death, your trembling will fly away after reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.