फिल्मी: सूरज चव्हाणच्या लग्नाला का गेली नाही अंकिता वालावलकर? अखेर समोर आलं कारण
बिग बॉस मराठी ५चा विजेता आणि रीलस्टार सूरज चव्हाण नुकतंच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. सूरजच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, पुरुषोत्तम पाटील आणि अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हजेरी लावली होती. मात्र सूरजच्या लग्नात अंकिता वालावलकर गैरहजर होती. सूरजचं केळवण करण्यापासून ते त्याच्या लग्नाच्या शॉपिंगपर्यंत सगळीकडे कोकण हार्टेड गर्ल त्याच्या सोबत होती. मात्र सूरजच्या लग्नात अंकिता कुठेच दिसली नाही. त्यामुळे सूरजच्या लग्नात अंकिता का आली नव्हती? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.याचं कारण समोर आलं आहे.
क्रिकेट: IPL 2026 : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Rohit Sharma Record: भारताचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या IPL मधील दुसऱ्या सामन्यात छोट्याखानी खेळीत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या रोहित शर्मानं दुसऱ्या सामन्यात २६ चेंडूत ३५ धावांची उपयुक्त खेळी करताना एक उत्तुंग षटकार मारला. या षटकारासह त्याने IPL मध्ये एका फ्रँचायझी संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे.
पुणे: Pune rain : हृदयद्रावक... आमच्या रंजना मावशी आम्हाला सोडून गेल्या...!
पुणे : “मावशींशी आमचा जुना परिचय... रोजच्या आयुष्याचाच त्या एक भाग होत्या.” नवश्या मारुती परिसरात गेली सात-आठ वर्षे हार-फुले विकणाऱ्या ‘मावशी’ म्हणजे आमच्यासाठी केवळ विक्रेत्या नव्हत्या, तर एक आपुलकीने बोलणारी, हसतमुख व्यक्ती होती. कामावर जाताना-येताना त्यांच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय दिवस पूर्णच होत नसे. गुरुवारीही तसंच झालं. पाच ते दहा मिनिटांपूर्वीच गप्पा मारलेल्या मावशी क्षणात कायमच्या निघून गेल्या.
व्यापार: शेअर बाजारातील घसरण : गुंतवणूकदार हवालदिल, कामथ यांचा गुंतवणुकीचा नवा मंत्र
शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदार सध्या प्रचंड चिंतेत आहेत. विशेषतः ज्यांनी कोविडनंतर शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती आणि ज्यांनी यापूर्वी अशी मोठी घसरण पाहिली नव्हती, अशा गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसलाय. मात्र, तज्ज्ञांच्या मते, बाजार दर काही वर्षांनी अशा मोठ्या घसरणीचा अनुभव घेतो आणि त्यानंतर पुन्हा सावरतो.
व्यापार: Tata Trust मध्ये नवा वाद, विश्वस्तांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह!
दिग्गज औद्योगिक घराणं 'टाटा' समूहाशी संबंधित असलेल्या एका ट्रस्टमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निकटवर्तीय राहिलेले मेहली मिस्त्री यांनी 'बाई हीराबाई जमशेदजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन'च्या दोन दिग्गज विश्वस्तांच्या पात्रतेवर कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.
व्यापार: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल महागले; भारतात दर स्थिर, तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज पुन्हा कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९४.७७ रुपये प्रति लिटर दरानं विकले जात आहे. तर, दिल्लीत आज शनिवारी डिझेलचा दर ८७.६७ रुपये प्रति लिटर आहे. सध्या जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.
पुणे: प्रवाशांवरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण;चौघांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : प्रवाशांवरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण करून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालण्यात आला. कात्रज परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी दोन रिक्षा चालकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेखर गोविंद पुजारी (वय ४९, रा. घुंगरवाली चाळ, संतोषनगर, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.याप्रकरणी कुणाल कांबळे (रा. बिबवेवाडी), एस. मिसाळ ऊर्फ टायगर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुजारी यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राष्ट्रीय: खळबळजनक!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त
हैदराबाद पोलिसांनी कॅल्शियम कार्बाइड वापरून पिकवलेले २०० किलो बनावट आंबे जप्त केले. या प्रकरणात एका फळ विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. अशा आंब्यांमुळे श्वसनाच्या आजारांसहित आरोग्यास धोका आहे. त्यामुळे आंबे खरेदी करताना नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासन आणि पोलिसांनी केले आहे.
व्यापार: सोनं-चांदी दरात मोठी घसरण: खरेदीसाठी सुवर्णसंधी!
गुरुवारी भारतीय वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. MCX वर सोनं १,४९,६५० रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झालं, तर चांदी ४.४८% च्या मोठ्या घसरणीसह २,३२,६०० रुपये प्रति किलोच्या पातळीवर स्थिरावली. आज म्हणजेच शनिवारी MCX वरील व्यवहार बंद असले, तरी जागतिक बाजारातील संकेत मात्र चिंताजनक आहेत.
ऊर्जा: शिरूर तालुक्यात गारपिटीचा तडाखा; ११९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २०४५ शेतकरी बाधित
शिरूर : शिरूर तालुक्यात १ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून तब्बल ११९५.८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे २०४५ शेतकरी संकटात सापडले असून तालुक्यातील १६ गावांना फटका बसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुवर्णा कटके-आदक यांनी दिली.
क्रिकेट: IPL 2026: श्रेयस अय्यरची पुन्हा तीच चूक, निलंबनाची टांगती तलवार!
IPL 2026 मध्ये षटकांची गती कमी राखल्याने श्रेयस अय्यरला पुन्हा दंड. दुसरी चूक असल्याने कर्णधारासह संघाला फटका. तिसऱ्यांदा चुक झाल्यास एका सामन्याच्या बंदीची शक्यता असून पंजाब संघावरही मोठा परिणाम होऊ शकतो. अशा वेळी अय्यरला नियोजनाबाबत गंभीरपणे लक्ष द्यावे लागेल.
पुणे: तुझे घर पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो; पोलिस ठाण्याबाहेर नगरसेवकाची धमकी;गुन्हा दाखल
पुणे : बांधकामाच्या वादातून नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी संबंधित चांदेर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन रघुनाथ चाकणकर (वय ४६, रा. बाणेर) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यापार: इराण युद्धामुळे खाद्यपदार्थांचे मोठे संकट? तज्ज्ञांचा इशारा
इराण युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला असून सध्या तरी हे युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. यामुळे जगभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत मार्च महिन्यात मोठी वाढ झाली असून, त्या गेल्या वर्षीच्या सप्टेंबरनंतरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अलीकडच्या काळात कच्च्या तेलाच्या आणि नॅचरल गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे आहे.
पुणे: Unseasonal rains : पावसाळी लाइनच नाहीत, शहरात केवळ १६ टक्के प्रमाण
पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावामध्ये रस्त्यांचे जाळे पुरेशा प्रमाणात नाही. त्याचबरोबर, या रस्त्याच्या कडेला पावसाळी लाइन नाहीत. त्याचबरोबर, शहराच्या जुन्या हद्दीमध्ये पावसाळी लाइनचे प्रमाण केवळ १६ टक्के आहे. पाऊस पडल्यानंतर पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी लाइन नसल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे.
पुणे: Unseasonal rains : दोन कोटी खर्चूनही आपत्ती व्यवस्थापन नावालाच; नेमके काय साधले ?
पुणे : पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती, रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी आणि अपघात यांची संपूर्ण माहिती मुंबई महापालिकेतील सुसज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळते. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करून एक मोठा व सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला आहे. मात्र, त्यानंतरही या कक्षाचा उपयोग केवळ कॉल सेंटर पुरताच मर्यादित असून, या कक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारी यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे, त्याच अधिकाऱ्यावर दिल्याने कामकाजात कसलीही सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे कक्षासाठी खर्च केलेले दोन कोटी पाण्यात तर गेले नाहीत, ना अशी शंका उपस्थित होते.
पुणे: पुणे पाण्यात गेले अन् महापालिका प्रशासन जागे झाले..!
पुणे : शहर व उपनगरात तीन दिवस अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. गुरुवारी दुपारी झालेल्या पावसामुळे महापालिकेच्या यंत्रणेचा फज्जा उडाला. शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व भागात पाणी साचले, रस्त्यांना नदीचे तर चौकांना तळ्याचे स्वरूप आले होते. वाहतूक कोंडीबरोबर झाडे कोसळली, वाहनांचे नुकसान, दुचाकी पाण्यात वाहून गेल्या, विद्यार्थी-नोकरदार अडकले. संपूर्ण शहर पाण्यात गेल्यानंतर आणि सर्वत्र दाणादाण झाल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे.
फिल्मी: 'रामायणम्'मध्ये रणबीर कपूर दिसणार दुहेरी भूमिकेत
रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित 'रामायणम्' सिनेमाची पहिली झलक दोन दिवसांपूर्वी समोर आली. २ मिनिटांच्या टीझरमध्ये रणबीर कपूरने प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतून लक्ष वेधलं. यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. दरम्यान सिनेमात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. भगवान विष्णूच्या १० अवतारांपैकी एक असलेल्या भगवान परशुरामाचीही भूमिका त्याने सिनेमात साकारली आहे. राम आणि परशुराम हे दोन्ही अवतार सादर करणं आव्हानात्मक होतं आणि ही मोठी जबाबदारी होती असं तो म्हणाला. या भूमिकांसाठी कशी तयारी केली याबद्दल त्याने सविस्तर सांगितलं आहे.
सखी: कैरी टिकवण्याची सोपी पद्धत: आंबोशी म्हणजे वर्षभराची साठवण
आंबोशी म्हणजे उन्हात वाळवलेल्या कैरीच्या फोडी, वर्षभर टिकतात. कच्च्या कैऱ्यांपासून केली जाते. आमटी, डाळ आणि लोणच्यात वापरली जाते किंवा आमचूर पावडर बनवण्यासाठी वापरली जाते. ही पद्धत रेफ्रिजरेशनशिवाय कैरीचा आंबटपणा टिकवते, पचनास मदत करते.
राष्ट्रीय: पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार- इमाम उमर इलियासी
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम उमर इलियासी यांनी पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होण्याची भविष्यवाणी केली. त्यांनी कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरच्या प्रगतीचे कौतुक केले, शिक्षण आणि पर्यटन सुधारल्याचे नमूद केले. इलियासी हे निवडक इस्लामी विद्वानांपैकी एक आहेत जे कट्टरता आणि दहशतवादाविरोधात स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतात. दिल्लीतील एका मशिदीत RSS प्रमुख भागवत यांची भेट घेतल्यानंतर ते प्रकाशझोतात आले
पुणे: Video : वाढत्या पावसासाठी गटारांची क्षमता दुप्पट करणार
पुणे : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अनेकदा एका तासात ५० मिमीपासून ते १०० मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पावसाळी गटारांची वहन क्षमता वाढविण्यासाठी नियमात बदल केला आहे. शहरात पावसाळी गटारांची वहन क्षमता दुप्पट केली जाणार आहे. शहरात यापुढे ६० मिलिमीटर व्यासाच्या पाइप ऐवजी एका तासात ११३ ते १३० मि.मी. पाऊस पडेल, त्यानुसार पावसाळी गटारांच्या वाहनाची क्षमता दुप्पट केली जाणार आहे, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
व्यापार: इराण युद्धाचा भारतीय प्रवाशांवर परिणाम; हवाई प्रवास ३०-३५% महागला, जाणून घ्या ताजे दर...
इराण,इस्रायल आणि अमेरिकेतील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता थेट भारतीयांच्या खिशावर होताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) महाग झाले आहे. त्यामुळेच देशातील विमान कंपन्यांनी फ्यूल सरचार्ज वाढवला असून, विमान तिकिटांचे दरही ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत.
राष्ट्रीय: आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा १५ टक्के पगार कापणार
तेलंगणात आई-वडिलांना न सांभाळल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारातून १५% कपात होणार आहे. तेलंगणा सरकारने याबाबतचा एक कायदा मंजूर केला आहे. याबाबत मुलाचे आई-वडील तक्रार करू शकतात, जिल्हाधिकारी ६० दिवसांत या तक्रारीवर निर्णय घेतील. सरकारी, खासगी कर्मचाऱ्यांसाठी कायदा लागू असेल. या कायद्यातंर्गत कर्मचाऱ्याच्या पगारातून १५ टक्के अथवा १० हजारापर्यंत कपात होऊ शकते. पगारातून कापलेले पैसे आई वडिलांना दिले जातील.
ऑटो: महिंद्राच्या EV कार्सवर ग्राहक तुटून पडले; फक्त एका वर्षात 'इतक्या' हजार कार्सची विक्री...
Mahindra EV: दिग्गज भारतीय कार उत्पादक कंपनी Mahindra & Mahindra ने इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीने फक्त एका वर्षात आपल्या ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ कार्सच्या 50 हजार युनिट्सची विक्री पूर्ण केली आहे. या यशानंतर कंपनीने उत्पादनही वाढवले असून, आता वेटिंग पिरियड कमी होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय: इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा विस्तार टेक्नॉलॉजी क्षेत्रापर्यंत झाल्याचे दिसत आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ने दुबईमधील अमेरिकन टेक कंपनी Oracle कॉर्पोरेशनच्या डेटा सेंटरवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. मात्र, UAE सरकारकडून अद्याप या हल्ल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
व्यापार: सोन्याच्या दराचा अंदाज: तज्ज्ञांनी खरेदीदारांना संभाव्य संकटाचा इशारा दिला
मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत १७ वर्षांतील सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, आता प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांनी सोन्याच्या दरांबाबत एक नवीन आणि मोठं भाकीत केलंय. त्यांच्या मते, एप्रिल १९८० नंतर एप्रिल २०२६ हा महिना सोन्यासाठी सर्वोत्तम महिना ठरू शकतो. शिफ यांनी सोन्याच्या किमतीसाठी एक नवीन टार्गेट निश्चित केलंय, जे सध्याच्या परिस्थितीत सामान्य जनतेसाठी अत्यंत धक्कादायक आहे.
सखी: टॅनिंग आणि डेड स्किनसाठी कॉफी स्क्रब
या उन्हाळ्यात केमिकल्सला म्हणा 'बाय-बाय' आणि कॉफीच्या साहाय्याने मिळवा मखमली, डागविरहित आणि ग्लोइंग त्वचा.
राष्ट्रीय: इराण युद्धात रशियाची भारताला SU-30 ची मदत; चीन, पाक धास्तावले
भारत आणि रशिया यांच्यात अनेक काळापासून सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याला आणखी बळ मिळाले आहे. रशिया आता भारताला १२ नवीन SU 30 MKI लढाऊ विमान उत्पादन करण्यासाठी साहित्य पुरवठा करणार आहे. रशियाने भारताला १२ नवीन SU-30MKI लढाऊ विमान उत्पादनासाठी लागणारे साहित्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पार्ट्स HAL नाशिक येथे प्लांटमध्ये एकत्रित करून हवाई दलाला या वर्षाच्या अखेरपर्यंत सोपवण्यात येतील.
व्यापार: इराणचा तेल टँकर भारताऐवजी चीनच्या दिशेनं; मार्ग बदलण्याचं कारण काय?
इराणमधून भारताकडे येत असलेला कच्च्या तेलाचा टँकर अचानक चीनच्या दिशेने वळला आहे. 'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, जर हे जहाज भारतात पोहोचलं असतं, तर गेल्या ७ वर्षांत इराणमधून भारतात आलेली ही पहिलीच तेलाची खेप ठरली असती. मात्र, आता या जहाजानं आपला रस्ता बदलला असून हे टँकर नेमके कुठे पोहोचणार, याबाबत अद्याप पूर्ण स्पष्टता नाही.
राष्ट्रीय: 'INS तारागिरी' सेवेत! भारताच्या नौदल सामर्थ्यात वाढ, शत्रूला धडकी
INS तारागिरी या अत्याधुनिक युद्धनौकेमुळे भारताच्या नौदल क्षमतेत वाढ झाली आहे. ७५% हून अधिक स्वदेशी बनावटीची ही नौका 'आत्मनिर्भर भारत' चे प्रतीक आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे व आधुनिक प्रणालींनी सज्ज तारागिरी भारताची सागरी सुरक्षा वाढवते. आयएनएस तारागिरी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. INS तारागिरी ही प्रोजेक्ट १७ए अंतर्गत बांधलेली एक स्वदेशी युद्धनौका आहे.
आंतरराष्ट्रीय: अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
इराणमधील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. अमेरिका आणि इस्रायलने आता इराणच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले वाढवल्याचे वृत्त आहे. पूल, स्टील प्लांट, वैद्यकीय सुविधा केंद्रे यांसारख्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले केल्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन होत आहे का? यावर चर्चा सुरू झाली असून जिनिव्हा कन्व्हेन्शन पुन्हा चर्चेत आले आहे. अशा परिस्थितीत जिनिव्हा कन्व्हेन्शन काय आहे आणि युद्धामध्ये कोणते नियम पाळावे लागतात? हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
व्यापार: HDFC बँकेच्या दुबई शाखेत गैरव्यवहार; अध्यक्षांच्या राजीनाम्याचं कनेक्शन?
दुबईचे आर्थिक नियामक 'दुबई फायनान्शिअल सर्व्हिसेस अथॉरिटी'नं (DFSA) एचडीएफसी बँकेच्या दुबई इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर (DIFC) शाखेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. 'इकोनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, बँकेनं ग्राहकांना धोकादायक 'क्रेडिट सुइस बाँड्स'ची चुकीच्या पद्धतीनं विक्री (मिस-सेलिंग) केल्याचं तपासात समोर आलंय.