lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > लग्नानंतरच्या सहा महिन्यांत मी केवळ २१ दिवसच विराटसोबत राहिले, अनुष्का शर्मा सांगते...

लग्नानंतरच्या सहा महिन्यांत मी केवळ २१ दिवसच विराटसोबत राहिले, अनुष्का शर्मा सांगते...

अनुष्काने सांगितली लग्नानंतरच्या नात्यातल्या विरहाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2022 05:25 PM2022-05-29T17:25:30+5:302022-05-29T17:46:20+5:30

अनुष्काने सांगितली लग्नानंतरच्या नात्यातल्या विरहाची गोष्ट

In the six months after marriage, I stayed with Virat for only 21 days, says Anushka Sharma ... | लग्नानंतरच्या सहा महिन्यांत मी केवळ २१ दिवसच विराटसोबत राहिले, अनुष्का शर्मा सांगते...

लग्नानंतरच्या सहा महिन्यांत मी केवळ २१ दिवसच विराटसोबत राहिले, अनुष्का शर्मा सांगते...

Highlightsअनुष्का आणि विराटच्या नात्यात लग्नानंतर होता बराच विरहअनुष्काने सांगितले आपल्या लग्नानंतरचे खरे दु:ख

लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस गुलाबी असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. या दिवसांत नात्यातील प्रेम फुलते आणि आपण एकमेकांना समजून घेत असतो. मात्र याच काळात आपली एकमेकांशी पुरेशी भेट होऊ शकली नाही तर? असेच काहीसे प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्याबाबत घडले आहे. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असताना लग्नानंतर मात्र ते एकमेकांना फारसे भेटू शकत नसल्याचे नुकतेच समजले आहे. अभिनेत्री अनुष्काने व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. अनुष्का म्हणते, “लोकांना असे वाटते की मी जेव्हा विराटला भेटत होते तेव्हा किंवा विराट मला भेटायचा तेव्हा आम्हाला सुट्टी आहे. पण प्रत्यक्षात तसे अजिबातच नव्हते. कारण आमच्यापैकी एक व्यक्ती कायम वर्कींग होता. 

(Image : Google)
(Image : Google)

ती सांगते मी पहिल्या सहा महिन्यांत आम्ही किती वेळा भेटलो हे मोजले. तर आम्ही फक्त २१ दिवस सोबत असल्याचे माझ्या लक्षात आले आहे. मी जेव्हा विराटला भेटायला परदेशात जात असे तेव्हा एखादे जेवण सोबत करण्यासाठी आमची भेट होत असे. त्यामुळे तो वेळ आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असायचा. तर स्टार स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीत विराटने कोरोना काळात लागलेला लॉकडाऊन आपल्या नात्यासाठी कसा महत्त्वाचा होता याविषयी सांगितले. आपल्या आयुष्यात नात्यात कधी सिल्व्हर इनिंग येईल हे खूप महत्त्वाचे असते. याआधी आम्हाला दोघांना एकमेकांसोबत असा वेळ कधीच घालवायला मिळाला नव्हता. पण देशातील इतर लोकांना या काळात ज्या प्रमाणात त्रास भोगावे लागले त्या प्रमाणात आम्हाला फारच कमी त्रास सहन करावा लागला. 

(Image : Google)
(Image : Google)

हे दोघेही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून सतत काही ना काही पोस्ट करत असतात. २०२१ मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला आणि या दोघांच्या आयुष्यात आनंदाची बरसात झाली. या दोघांनी आपल्या मुलीला बराच एकत्रित वेळ दिला असल्याचे दिसले. विराटचे मुलीसोबतच्या क्षणांचा आनंद लुटत असल्याचेही पाहायला मिळाले. अनुष्काने २०१८ पासून आपल्या करिअरमध्ये ब्रेक घेतला आहे. तर नुकताच तिने भारतीय क्रिकेटर असलेल्या झुलन गोस्वामीवरील छकडा एक्सप्रेस या चरीत्रपटात प्रमुख भूमिका केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर लवकरच त्याचा प्रिमियर प्रसिद्ध होणार आहे. 

Web Title: In the six months after marriage, I stayed with Virat for only 21 days, says Anushka Sharma ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.