2019 मध्ये 'या' 10 गाण्यांनी घातला सर्वात जास्त धुमाकूळ, तुम्ही ऐकलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 02:55 PM2020-01-04T14:55:47+5:302020-01-04T16:29:52+5:30

२०१९ हे वर्ष बॉलिवूडसाठी जोरदार राईड होते. रणवीर सिंगच्या 'गली बॉय' पासून कार्तिक आर्यनच्या 'पति पत्नी और वो' पर्यंत हिंदी सिनेमाने यावर्षी विविध प्रकारात प्रेक्षकांची सेवा केली आहे.

'पति पत्नी और वो' मधील 'धीमे धीमे' या गाणं हे टोनी कक्कर व नेहा कक्कर यांनी गायलं आहे

सचेत टंडन यांनी गायलेल्या 'कबीर सिंग' मधील 'बेखयाली' या गाण्याने महाराष्ट्राला वेड लावले आहे.

अरिजीत सिंग व शिल्पा राव यांच्या 'वॉर' मधील 'घुंगरू' या गाण्याने गतवर्षी सर्वोत्कृष्ट गाणं म्हणून पुरस्कार स्विकारला

गली बॉय मधील "अपना टाइम आयेगा" या रॅप सोंग ने तरुणांचं मन जिंकले

'हाऊसफुल 4' मधील एक चुम्मा या गाण्याने गतवर्षी सर्वोत्कृष्ट गाणं म्हणून पुरस्कार स्विकारला

जुबिन नौटियाल यांनी गायलेल्या 'मरजावां' मधील 'तुम ही आना' हे एक सुंदर गाणे आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि तारा सुतारिया या गाण्यात आपल्याला दिसतात

अरिजित सिंगच्या सुंदर आवाजाने 'केसरी' मधील 'वे माही' हे गाणे खूप हिट झाले

'भारत' मधील 'चाशनी' हे गाणं सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या या रोमँटिक सिझलिंग केमिस्ट्रीमुळे या गाण्याला अजूनच रंगत आली आहे

'लुका छुपी' मधील 'कोका कोला' हे गाणे टोनी कक्कर यांच्या मूळ गाण्याची आवृत्ती असली तरी रिलीज झाल्यानंतर हे गाणं 'मिर्ची टॉप २०' च्या यादीत दाखल झालं

अरिजीत सिंगचं 'पछताओगे' या गाण्याने गतवर्षी सर्वोत्कृष्ट गाणं म्हणून पुरस्कार स्विकारला