anniversary special: अशी सुरु झाली होती अमिताभ-जया यांची लव्हस्टोरी, या अटीमुळे घाईघाईत उरकले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 01:39 PM2020-06-03T13:39:03+5:302020-06-03T13:39:03+5:30

आज अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाचा 47वा वाढदिवस आहे. .या निमित्ताने फोटो शेअर करुन अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचे सीक्रेट सांगितले आहे.

अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाला 47 वर्षे झाले आहेत. अशात त्यांनी लग्नाच्या अल्बममधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यासोबतच अमिताभ बच्चन यांनी लग्नाचे एक सीक्रेटदेखील शेअर केले आहे.

अमिताभ व जया बच्चन यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1973 मध्ये अमिताभ व जया यांनी ‘जंजीर’मध्ये एकत्र काम केले. याच चित्रपटादरम्यान दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

‘जंजीर’ हिट झाला तर सर्वजण मिळून लंडनमध्ये फिरायला जाऊ, असे ‘जंजीर’च्या टीमने ठरवले होते. यात अमिताभ व जया हे दोघेही होते. जंजीर’ हिट झाला आणि अमिताभ यांनी लंडनला जाण्याची तयारी सुरु केली.

तत्पूर्वी वडील हरिवंशराय यांची परवानगी घेण्यासाठी ते गेले. लंडनचे नाव ऐकताच कोण कोण जाणार, असा प्रश्न हरिवंशराय यांनी अमिताभ यांना केला आणि जया यांचे नाव ऐकताच त्यांनी नकार दिला. 

जयासोबत जायचे असेल तर आधी तिच्यासोबत लग्न कर. लग्न न करता मी तुला जयासोबत जाऊ देणार नाही, असे हरिवंशराय म्हणाले. अमिताभ वडिलांचे शब्द टाळू शकत नव्हते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.मग काय घाईघाईत अगदी 24 तासांत जया व अमिताभ यांचे लग्न झाले. या लग्नाला केवळ पाच व-हाडी हजर होते. यानंतर दुस-याच दिवशी जया व अमिताभ लंडनसाठी रवाना झालेत.