तलावांनी घेतला मोकळा श्वास, पाण्याची स्थिती सुदृढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:22 PM2020-10-03T22:22:42+5:302020-10-03T22:24:27+5:30

Clean Lake, Ganesh Fesival, Nagpur News पर्यावरणप्रेमी संस्था ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनने गणपती विसर्जनाच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी शुक्रवारी फुटाळा, सोनेगाव, शुक्रवारी व सक्करदरा तलावांच्या पाण्याचे परीक्षण केले. परीक्षणानंतर तलावातील पाण्याची स्थिती सुदृढ आढळून आली. या स्थितीवरून, गेल्या आठ वर्षात प्रथमच शहरातील तलावांनी मोकळा श्वास घेतल्याचे स्पष्ट झाले.

The lakes took a deep breath, the water condition improved | तलावांनी घेतला मोकळा श्वास, पाण्याची स्थिती सुदृढ

तलावांनी घेतला मोकळा श्वास, पाण्याची स्थिती सुदृढ

googlenewsNext
ठळक मुद्देगणपती विसर्जनापूर्वी आणि नंतरच्या जलपरीक्षणात झाला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरणप्रेमी संस्था ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनने गणपती विसर्जनाच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी शुक्रवारी फुटाळा, सोनेगाव, शुक्रवारी व सक्करदरा तलावांच्या पाण्याचे परीक्षण केले. परीक्षणानंतर तलावातील पाण्याची स्थिती सुदृढ आढळून आली. या स्थितीवरून, गेल्या आठ वर्षात प्रथमच शहरातील तलावांनी मोकळा श्वास घेतल्याचे स्पष्ट झाले.
फुटाळा, शुक्रवारी, सोनेगाव तलाव (तिन्ही तलावांचे ४.५ मिलिग्रॅम/लिटर) आणि सक्करदरा तलावात (३ मिलिग्रॅम/लिटर) गणपती विसर्जनापूर्वी आणि नंतर डिसॉल्ड आॅक्सिजन मात्र समान प्रमाणात दिसून आला. गेल्या दोन महिन्यात उत्तम पावसामुळे फुटाळा, सोनेगाव व शुक्रवारी तलाव तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळेही या तलावांतील गढूळपणा (टर्बिडिटी) काहीअंशी घसरलेला आहे.
ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन गेल्या आठ वर्षापासून अर्थ इको इंटरनॅशनल नामक आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत शहरातील प्रमुख तलावांमध्ये गणपती विसर्जनाच्या परिणामाची तपासणी करत असल्याचे टीम लिडर सुरभी जायसवाल यांनी सांगितले. महानगरपालिकेद्वारे या वर्षी सर्वच तलावांमध्ये विसर्जनावर निर्बंध घातल्यामुळेच, हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी फुटाळा तलावात ऑक्सिजन मात्रा घसरली होती
गेल्या वर्षी गणपती विसर्जनानंतर फुटाळा तलावाची स्थिती अत्यंत दयनीय होती. येथे डिसॉल्ड आॅक्सिजनची मात्रा घसरून ३.५ मिलिग्रॅम/लिटर पर्यंत पोहोचली होती. शुक्रवारी तलावात ही मात्रा ४ मिलिग्रॅम/लिटरपर्यंत घसरली होती. तलावांमध्ये डिसॉल्ड ऑक्सिजनची मात्रा सर्वसाधारणपणे ६ मिलिग्रॅम/लिटर असायला हवी, असे सुरभी जायसवाल यांनी सांगितले.

सक्करदरा तलावाचे परितंत्र धोक्यात
सक्करदरा तलावात पाणी कमी आहे आणि चहूबाजूंनी जलकुंभी परसली आहे. त्यामुळे, या तलावाची साफसफाई होणे गरजेचे आहे. अन्यथा तलावाचे परितंत्र पूर्णत: ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख तलावांमध्ये कृत्रिम एरेशन सिस्टिम लावण्याची गरज आहे. या सिस्टिममुळे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा वाढवणे शक्य असल्याचे ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे डिप्टी टीम लीडर मेहुल कोसुरकर यांनी सांगितले.

Web Title: The lakes took a deep breath, the water condition improved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.