छोट्या पडद्यावरील या मालिकेत रंगणार जागरण - गोंधळ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 13:53 IST2018-02-16T08:23:53+5:302018-02-16T13:53:53+5:30
घाडगे & सून मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भक्तीमय वातावरण आहे कारण, मालिकेमधील सगळेच कलाकार खंडेरायाच्या दर्शनानिमित्त थेट जेजुरीला फ्चले ...
.jpg)
छोट्या पडद्यावरील या मालिकेत रंगणार जागरण - गोंधळ !
घ डगे & सून मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भक्तीमय वातावरण आहे कारण, मालिकेमधील सगळेच कलाकार खंडेरायाच्या दर्शनानिमित्त थेट जेजुरीला फ्चले आहेत. जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या अक्षयसाठी आणि अक्षय-अमृताचं नवरा-बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतला. नवस पूर्ण करण्याच्या निमित्ताने सर्व विधी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण घाडगे कुटुंब जेजुरीला गेले खरं पण, या विधी अमृताबरोबर पूर्ण करणे अक्षयला खूपच कठीण जात आहे.जेजुरीला पोहोचताच घाडगे वाड्यावर अक्षय आणि अमृताच धुमधडाक्यात स्वागत झाले. नव्या नवरीप्रमाणे तिचा गृहप्रवेश वाड्यामध्ये करण्यात आला.हे सगळं बघून माईना खूपच आनंद झाला आहे. आता खंडोबाच्या दर्श्नासोबतच अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडणार आहे. हा जागरण- गोंधळाचा विधी निर्विघ्नपणे पार पडेल ? अमृताच्या समोर आणखी कोणते सत्य येणार आहे ? ते सत्य कळल्यावर माईना हे सत्य अमृता सांगू शकेल? हे सगळे रसिकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.खंडेरायाचे दर्शन आणि त्यानंतर अशी प्रथा असते कि,घरामध्ये जागरण-गोंधळ घालावा लागतो.आणि त्यासाठीच घरामधील सगळे तयारीमध्ये व्यग्र आहेत.या मध्ये माई सगळ्यांना बोलता बोलता सांगतात कि,या वाड्याच्या खालच्या खोलीमध्ये घाडगे घराण्याचा खजिना आहे आणि ज्याने कोणी त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न केले त्याचा मृत्यू झाला.तर दुसरीकडे अमृताच्या विरोधात असलेली वसुधा नवी खेळी खेळणार आहे ज्याबद्दल माई आणि संपूर्ण घाडगे परिवार अनभिज्ञ आहे.अमृताला वसुधाच्या या खेळी बद्दल कळेल का? घाडगे घरात घडणारा हा गोंधळात गोंधळ कसा अमृता माईच्या मदतीने दूर करेल हे बघणे रंजक असणार आहे.
Also Read:अक्षय आणि अमृता या ठिकाणी जाणार हनिमूनला!
घाडगेच्या परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन खंडोबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात. याच वेळेस अक्षय आणि अमृताला जेजुरी मंदिराच्या ४०० पायऱ्या चढायच्या होत्या.परंतु अमृताच्या पायाला अचानक लागल्यामुळे अक्षयने अमृताला उचलून घेतले आणि खरोखरच सीन मध्ये चिन्मयने मंदिराच्या ३०० पायऱ्या चढल्या.अक्षयच्या प्रेमात पडलेल्या अमृतासाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरला आहे.खंडोबाच्या दर्श्नासोबतच अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडला आहे.
Also Read:अक्षय आणि अमृता या ठिकाणी जाणार हनिमूनला!
घाडगेच्या परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन खंडोबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात. याच वेळेस अक्षय आणि अमृताला जेजुरी मंदिराच्या ४०० पायऱ्या चढायच्या होत्या.परंतु अमृताच्या पायाला अचानक लागल्यामुळे अक्षयने अमृताला उचलून घेतले आणि खरोखरच सीन मध्ये चिन्मयने मंदिराच्या ३०० पायऱ्या चढल्या.अक्षयच्या प्रेमात पडलेल्या अमृतासाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरला आहे.खंडोबाच्या दर्श्नासोबतच अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडला आहे.