शालीन मल्होत्रा लाडो-वीरपूर की मर्दानी मध्ये प्रमुख भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 15:42 IST2017-11-13T10:42:05+5:302017-11-14T15:42:00+5:30
स्त्री-पुरूष समानता या समस्येचा सामना महिलांना दीर्घकाळा पासून करावा लागत आहे. अशाच एका महिलेची ही कहाणी सादर करत आहे ...
.jpg)
शालीन मल्होत्रा लाडो-वीरपूर की मर्दानी मध्ये प्रमुख भूमिकेत
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">स्त्री-पुरूष समानता या समस्येचा सामना महिलांना दीर्घकाळा पासून करावा लागत आहे. अशाच एका महिलेची ही कहाणी सादर करत आहे कलर्स टिव्ही त्याच्या प्रसिद्ध आणि प्रेरक मालिका ना आना इस देस में लाडो ची दुसरी आवृत्ती लाडो-वीरपूर की मर्दानी च्या रुपात.
या दुसऱ्या आवृत्ती मध्ये अम्माजी बदललेल्या अवतारात दिसून येत आहे आणि तिच्या सोबत आहे तिची नात अनुष्का. नवीन रुपातील या शो मध्ये शालीन मल्होत्रा देवच्या भूमिकेत दिसणार आहेत. शालीन शो मध्ये अविका गौरच्या विरोधी भूमिका करताना दिसणार आहेत. हा शो आणि स्वतःच्या पात्रा विषयी बोलताना शालीन काही गोष्टी सांगीतल्या, माझे पात्र देव थोडेसे चिक्कू आहे, तो शब्दांचा वापर सुद्धा सावधगिरीने करतो. तो स्मार्ट, डायनॅमिक, तीक्ष्ण आणि आकर्षक आहे. त्याच्या मध्ये चाणक्याचे कौशल्य आहे, पण तो त्याचा वापर सुद्धा स्वतःसाठीच करतो.
ते पुढे म्हणाले, ‘माझे पात्र जादुगारा प्रमाणे दुसऱ्यांच्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकते, तसेच तो शब्दांचा वापर अचूक वेळी करून कोणालाही त्याचा चाहता बनवू शकतो. एका संधीसाधू माणसा प्रमाणे दुसऱ्यांच्या कमतरतेचा फायदा उठविणे त्याला चांगले जमते. परिस्थितीला आपल्या मर्जीने तो वळवू शकतो. शोमध्ये पुढे दाखविले जाणार आहे की तो अम्माजीच्या विरुद्ध उभा राहतो आणि त्यांना आव्हान सुद्धा देतो. तथापि, स्वतःच्या कुटुंबातील महिलांचा तो मान राखतो.
शालीलने पुढे सांगीतले, ‘देवची एक संवेदनशील बाजू सुद्धा आहे, त्यामुळे घरातील महिलांचा तो आवडता आहे. तो कविता सुद्धा लिहितो. त्याचे हेतू नेहमी चांगलेच असतात. शालीन शिवाय या शो मध्ये मेघना मलिक, अविका गौर, अंकित राज, ऋतुराज सिंह, झलक देसाई, हिमान चैधरी, सुदिप्ती परमार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
अम्माजींची अतिशय क्लिष्ट व्यक्तिरेखा साकारणा-या मेघना मलिक म्हणाल्या, “लाडोच्या या आवृत्तीतील अम्माजी मनाने, शरीराने आणि दिसण्यात सुद्धा अगदी वेगळया आहेत. गैरसमजूतीचा बळी असलेल्या तिला आधी मुलगी जन्माला आलेली नको होती. पण, काळ बदलला आहे, आणि आता ती महिलांचा कैवार घेणारी बनली आहे आणि महिलांचा गौरव, सुरक्षा आणि हक्कां विषयीच्या संवेदनशील समस्यांचा उल्लेख करत आहे.”
अम्माजींची अतिशय क्लिष्ट व्यक्तिरेखा साकारणा-या मेघना मलिक म्हणाल्या, “लाडोच्या या आवृत्तीतील अम्माजी मनाने, शरीराने आणि दिसण्यात सुद्धा अगदी वेगळया आहेत. गैरसमजूतीचा बळी असलेल्या तिला आधी मुलगी जन्माला आलेली नको होती. पण, काळ बदलला आहे, आणि आता ती महिलांचा कैवार घेणारी बनली आहे आणि महिलांचा गौरव, सुरक्षा आणि हक्कां विषयीच्या संवेदनशील समस्यांचा उल्लेख करत आहे.”