​मोहनीश बहल ‘होशीयार...’ म्हणत करणार सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 21:43 IST2016-12-08T21:43:10+5:302016-12-08T21:43:10+5:30

अभिनेता मोहनीश बहल पुन्हा एकदा टीव्हीवर पुनरागमन करीत आहे. आगामी अपराध मालिकेतून त्याची एंट्री होणार आहे. आधी त्याने काही ...

Mohnish Bahl, 'Hoashiar ...' | ​मोहनीश बहल ‘होशीयार...’ म्हणत करणार सूत्रसंचालन

​मोहनीश बहल ‘होशीयार...’ म्हणत करणार सूत्रसंचालन

िनेता मोहनीश बहल पुन्हा एकदा टीव्हीवर पुनरागमन करीत आहे. आगामी अपराध मालिकेतून त्याची एंट्री होणार आहे. आधी त्याने काही टीव्ही मालिकांत आपल्या अभिनयाचा जलवा दाखविला आहे. आता तो अपराधांविषयी जागृती करताना दिसेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी तो सांभळत असल्याने चांगलाच उत्सुक आहे. 

निर्माता दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या चित्रपटातील आदर्श मुलगा व टीव्ही मालिकेमधील आदर्श प्रेमी अशी ओळख मिळविणारा मोहनीश बहल टीव्हीवर नव्या रुपात पुनरागमन करीत आहे. गुन्ह्यांवर आधारित ‘होशियार...सही वक्त सही कदम’ या मालिकेचे संचालन करताना दिसणार आहे. मोहनीश या कार्यक्रमाचे संचालन करण्यासाठी चांगलाच उत्सुक आहे. मोहनीश म्हणाला, ‘होशियार... सही वक्त सही कदम’ या पुरोगामी विचारांवर आधारित मालिकेचा भाग होत असल्याचा मला आनंद आहे. मी हा कार्यक्रम एकटाच होस्ट करणार आहे. या एकल सूत्रसंचालक शैलीत शो होस्ट करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. यासाठी मी उत्सुक आहे. या शोच्या माध्यमातून मी दररोज एक साकारात्मक विचार समाजाला देणार आहे. हा कार्यक्रम अपराधाचे उदात्तीकरण करणारा नसून गुन्हांवर आळा कसा घालता येईल याची जागृती करणारा आहे. टीव्हीवर प्रसारित केले जाणाºया गुन्ह्यांवरील मालिकांतून अपराधांवर नियंत्रण कसे मिळविता येईल याची माहिती देणार आहोत. 

मोहनीशने यापूर्वी सावधान इंडियाच्या काही भागांचे सूत्रसंचालन केले आहे. यासोबतच त्याने अनेक मालिकांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकेतील त्याची डॉ. आशूतोष ही भूमिका लोकांना फारच आवडली होती. बचके रहना थोडे संभलके व स्टार विवाह या शोचे सूत्रसंचालनही मोहनीश बहलने केले होते. 

Web Title: Mohnish Bahl, 'Hoashiar ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.