"अजून किती लुटणार आहात?"; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या मुद्द्यावरुन किशोर कदम भडकले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 11:34 AM2023-08-28T11:34:37+5:302023-08-28T11:35:36+5:30

अभिनेत्री ऋतुजा देशमुखनंतर कवी किशोर कदमही संतापले

kishor kadam marathi actor poet shows displeasure regarding mumbai pune express way toll | "अजून किती लुटणार आहात?"; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या मुद्द्यावरुन किशोर कदम भडकले...

"अजून किती लुटणार आहात?"; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या मुद्द्यावरुन किशोर कदम भडकले...

googlenewsNext

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मात्र सध्या या महामार्गावरील टोलनाक्यावर होणारी लूट चर्चेत आहे. अनेक कलाकारांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ऋतुजा देशमुखने व्हिडिओ शेअर करत मुंबई पुणे महामार्गावरील टोलचं गणितच मांडलं होतं. तर आता लोकप्रिय कवी, अभिनेते किशोर कदम (Kishor Kadam) यांनी देखील फेसबुक पोस्ट शेअर करत राग व्यक्त केलाय.

काय आहे किशोर कदम यांची पोस्ट?

"मुंबईहून पुण्याला जाताना एक्स्प्रेस हायवे वर २४० टोल घेतात. मध्ये मनःशांती वगैरेमध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा २४० का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का? एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तास दोन तासांनी येत राहतात. ते पैसे कुठे आणि का जातात? अरे लूट थांबवा रे ही. लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात? कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत?"

किशोर कदम यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत आम्हालाही असाच अनुभव आल्याचं सांगितलं आहे. 'आपणच आपल्या कानफटात मारुन घ्यायची' अशी कमेंट एकाने केली आहे. ही लूट कधी थांबणार हा प्रश्नच जनतेसमोर उभा राहिला आहे.

Web Title: kishor kadam marathi actor poet shows displeasure regarding mumbai pune express way toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.