बिग बॉस : मनवीर, नीतिभाच्या मैत्रीला लागले ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 14:04 IST2017-01-10T13:37:38+5:302017-01-10T14:04:14+5:30

बिग बॉसच्या घरात मैत्री आणि दुश्मनी कॉमन बाब आहे. कारण घरात मैत्री झालेले सदस्य कधी एकमेकांचे कट्टर शत्रू होतील हे सांगणे मुश्किल आहे. आता हेच बघा ना काल-परवापर्यंत एकमेकांचा आधार घेऊन घरात वावरत असलेले मनवीर गुर्जर आणि नीतिभा कौर एकमेकांचे शत्रू बनले आहेत.

Bigg Boss: Manavir, eulogy started with friendship | बिग बॉस : मनवीर, नीतिभाच्या मैत्रीला लागले ग्रहण

बिग बॉस : मनवीर, नीतिभाच्या मैत्रीला लागले ग्रहण

ग बॉसच्या घरात मैत्री आणि दुश्मनी कॉमन बाब आहे. कारण घरात मैत्री झालेले सदस्य कधी एकमेकांचे कट्टर शत्रू होतील हे सांगणे मुश्किल आहे. आता हेच बघा ना काल-परवापर्यंत एकमेकांचा आधार घेऊन घरात वावरत असलेले मनवीर गुर्जर आणि नीतिभा कौर एकमेकांचे शत्रू बनले आहेत. 

There seems to be no end to #ManveerGurjar & #NitibhaKaul's differences as they get into a war of words! Don't miss it tomorrow#BB10#videopic.twitter.com/QQ25zNcmOk— Bigg Boss (@BiggBoss) January 8, 2017}}}} ">http://

}}}} ">There seems to be no end to #ManveerGurjar & #NitibhaKaul's differences as they get into a war of words! Don't miss it tomorrow#BB10#videopic.twitter.com/QQ25zNcmOk— Bigg Boss (@BiggBoss) January 8, 2017जेव्हा मनू पंजाबी आईच्या निधनामुळे घराबाहेर पडला होता तेव्हा एकाकी पडलेल्या मनवीरने नीतिभाशी जवळीकता साधली होती. त्यातच मोनालिसा आणि मनवीरमध्ये मतभेद होऊ लागल्याने, मनवीर नीतिभाच्या जणू काही प्रेमातच पडला होता. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीपलीकडचे नाते असल्याची घरवाल्यांमध्ये चर्चा रंगली होती. मात्र जेव्हा मनू घरात परतला तेव्हा तो मनवीरला नीतिभापासून दूर राहण्यास त्याला वारंवार सांगत होता. 

सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये त्याने मनूचा सल्ला फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. मात्र पुढे त्याला मनूचा सल्ला पटू लागला. तो नीतिभाला टाळण्यासाठी संधी शोधत होता. तसेच तिच्यावर कॉमेंटही करत होता. हे सर्व नीतिभाच्या लक्षात येत होते. परंतु ती त्याला उत्तर देत नव्हती. कदाचित ती संधीच्या शोधात असावी. अखेर नीतिभाला ही संधी मिळाली. तिने मनवीरला असे काही सुनावले की, त्याच्या कानाखाली मारण्याचा इशारा देण्यापर्यंत तिची मजल गेली. 

त्याचे झाले असे की, नीतिभा आणि बानी इंग्रजीत संवाद साधत असतात. बिग बॉस दोघींनाही वारंवार हिंदीत संवाद साधण्याची सूचना करीत होते. तसेच मनवीर कॅप्टन या नात्याने दोघींनाही हिंदी बोलण्यास सांगत होता. बिग बॉसने नीतिभाला तिसºयांदा सूचना दिल्यानंतर मनवीर तिच्यावर भडकला. तो तिला हिंदीमध्ये का बोलत नाहीस, असे ओरडून सांगत होता. मात्र मनवीरची हीच गोष्ट तिला खटकली. तू माझ्याशी वरच्या आवाजात बोलू शकत नाहीस, असे म्हणत दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. 

मात्र नीतिभाने मनवीरला चांगलेच सुनावले. ‘माझ्याशी बोलण्याची तुझी औकात नाही, मी तुझ्या कानाखाली मारेल’ अशा शब्दात तिने मनवीरवर राग व्यक्त केला. दोघांमधील भांडण वाढत असतानाच मनूने मध्यस्थी करीत वाद सोडविला. मात्र सकाळपर्यंत एकमेकांचे जीवलग मित्र असलेले हे जोडपे दुपारी एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. 

#ManveerGurjar gets furious after #NitibhaKaul is caught breaking rules! Will this further create differences between the two friends? #BB10pic.twitter.com/kkkkTueMop— Bigg Boss (@BiggBoss) January 9, 2017}}}} ">http://


कदाचित हाच बिग बॉसच्या घराचा करिष्मा असून, येथे कुठलीही गोष्ट क्षणार्धात घडते हे पुन्हा एकदा दिसून आले. आता दोघांमधील वैर पुढच्या काळातही असेच राहणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.   

Web Title: Bigg Boss: Manavir, eulogy started with friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.