Bigg Boss 12 : बिग बॉसने केलेल्या या घोषणेने सगळ्याच स्पर्धकांना आले टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 06:27 PM2018-10-10T18:27:49+5:302018-10-10T22:30:00+5:30

जेलब्रेक टास्क अजूनही बिग बॉसच्या घरात सुरू असल्याचे आज देखील पाहायला मिळाले. या टास्क दरम्यान करणवीर, उर्वषी आणि सृष्टी यांच्या जोरदार चढाओढ लागली होती. दुसरी फेरी आपण जिंकायचीच असेच ठरवून सगळे स्पर्धक टास्क करत असल्याचे दिसून आले.

Bigg Boss 12 : Mid-week eviction to leave contestants despaired | Bigg Boss 12 : बिग बॉसने केलेल्या या घोषणेने सगळ्याच स्पर्धकांना आले टेन्शन

Bigg Boss 12 : बिग बॉसने केलेल्या या घोषणेने सगळ्याच स्पर्धकांना आले टेन्शन

googlenewsNext

बिग बॉस हाऊसमध्ये विकेंडच्या भागात सलमान खानने सगळ्याच स्पर्धकांचे कान टोचले होते. सगळ्या स्पर्धकांनी टास्क चांगल्या प्रकारे पूर्ण करावेत आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी. विशेषतः टास्क करताना कोणीही चीटिंग करू नये असे त्याने सांगितले होते. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याकडून टास्क चांगल्याप्रकारेच झाला पाहिजे यासाठी सध्या प्रयत्न करत आहे. 

जेलब्रेक टास्क अजूनही बिग बॉसच्या घरात सुरू असल्याचे आज देखील पाहायला मिळाले. या टास्क दरम्यान करणवीर, उर्वषी आणि सृष्टी यांच्या जोरदार चढाओढ लागली होती. दुसरी फेरी आपण जिंकायचीच असेच ठरवून सगळे स्पर्धक टास्क करत असल्याचे दिसून आले. या टास्कच्या दरम्यान अनेक भांडणे झाली, तसेच अनेकांची नाती बिघडली. जवळचे मित्र दुरावले. पण तरीही आपण या टास्कचे विजेतेपद मिळवायचे ही एकच गोष्ट सगळ्यांच्या डोक्यात असल्याचे स्पष्ट दिसून येत होते.

बिग बॉसच्या घरात जाऊन स्पर्धकांना आता 24 दिवस झाले आहेत. त्यामुळे आता या स्पर्धकांमध्ये चांगलीच मैत्री निर्माण झाली आहे. अनेक स्पर्धक तर एकमेकांचे खूपच चांगले फ्रेंड्स बनले आहेत. पण बिग बॉसने या स्पर्धकांवर आजच्या भागात एक बॉम्ब टाकला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण हा आठवडा पूर्ण व्हायच्या आधीच एविक्शन होणार असून एका स्पर्धकाला लगेचच घराच्या बाहेर जावे लागणार असल्याचे बिग बॉसने सांगितले. हे ऐकल्यावर सगळ्याच स्पर्धकांना चांगलाच धक्का बसला. या आठवड्यात श्रीसंत, करणवीर आणि नेहा यांना घराच्या बाहेर जाण्यासाठी नामांकन मिळालेले आहे. त्यामुळे बिग बॉसने त्यांना अॅक्टिव्हिटी भागात बोलवण्यात आले आणि इतर सगळ्यांना लिव्हिंग रूममध्ये थांबायला सांगितले. अॅक्टिव्हीटी भागात तीन कॉफीन ठेवण्यात आलेले होते. त्या कॉफीनमध्ये स्पर्धकांनी उभे राहायचे आणि या तिघांपैकी कोणत्या स्पर्धकाने घराच्या बाहेर जायला पाहिजे हे इतर स्पर्धकांनी सांगायचे असे बिग बॉसने स्पर्धकांना सांगितले. पण यात देखील बिग बॉसने ट्विस्ट ठेवला होता. प्रत्येक स्पर्धकाने आपल्यामते कोणता स्पर्धक घरात राहाण्यास योग्य नाही हे सांगायचे. पण तरीही घरातून कोण बाहेर जाणार हे लोकांच्या मतांवरच ठरणार असल्याचे सांगण्यात आले. 

एक स्पर्धक लगेचच घराच्या बाहेर जाणार हे कळल्यावर घरातील पूर्ण वातावरणच बदलून गेले होते. 

Web Title: Bigg Boss 12 : Mid-week eviction to leave contestants despaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.