‘साम दाम दंड भेद’ या मालिकेतील या अभिनेत्रींची ऑफस्क्रीन 'याराना'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 13:57 IST2017-12-06T08:27:14+5:302017-12-06T13:57:14+5:30

बॉलिवूड असो किंवा टीव्ही इडस्ट्री ग्लॅमरजगतात एकमेकांशी स्पर्धा करण्यात बिझी असलेले कलाकार एकमेकांचे कधी कट्टर वैरी बनतात हे त्यांना ...

The actress's 'Yerana' offscreen for 'Samantha Bandh Bandh' | ‘साम दाम दंड भेद’ या मालिकेतील या अभिनेत्रींची ऑफस्क्रीन 'याराना'!

‘साम दाम दंड भेद’ या मालिकेतील या अभिनेत्रींची ऑफस्क्रीन 'याराना'!

लिवूड असो किंवा टीव्ही इडस्ट्री ग्लॅमरजगतात एकमेकांशी स्पर्धा करण्यात बिझी असलेले कलाकार एकमेकांचे कधी कट्टर वैरी बनतात हे त्यांना देखील कळत नाही. वारंवार आपण कलाकारांमध्ये रंगलेल्या कोल्ड वॉरच्या चर्चा ऐकत असतो. टीव्ही इंडस्ट्रीही या गोष्टीपासून काही वेगळी नाही. टीव्ही कलाकारामध्येही एकमेकांशी पटत नसल्याचे पाहाला मिळते.मात्र कधी कधी मालिकेत दिसणारे कट्टर वैरी हे ऑफस्क्रीन मात्र खूप चांगले मित्र असतात. ‘साम दाम दंड भेद’ या मालिकेत सोनल वेंगुर्लेकर आणि ऐश्वर्या खरे या एकमेकींच्या कट्टर वैरी असल्याचे मालिकेत पाहायला मिळते. पण वास्तव जीवनात या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. ‘साम दाम दंड भेद’ या मालिकेत सोनल वेंगुर्लेकर ही मंदिराची, तर ऐश्वर्या खरे ही बुलबुलची व्यक्तिरेखा साकारत आहे.या दोघी एकमेकींच्या शत्रू असतात. पडद्यावर एकमेकींचा सहवास जराही सहन न करणार्‍या या अभिनेत्री कॅमेरा बंद होताच एकमेकींच्या गळ्यात पडतात. त्यांच्यातील वैर हे केवळ टीव्हीच्या पडद्यापुरते असून प्रत्यक्ष जीवनात त्या सच्च्या मैत्रिणीच नव्हे,तर बहिणीच असल्याचे मालिकेच्या सेटवरचे इतर कलाकार सांगतात.या दोघी जेवताना, चित्रपट बघताना, खरेदीला जाताना सतत बरोबर असतात.ऐश्वर्याची स्तुती करताना सोनल म्हणते, “या मालिकेत आम्ही एकमेकींच्या शत्रू असल्याचे दाखवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात आमच्यात  खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे कधी कधी आम्हाला मालिकेत एकमेकींविरोधात भूमिका साकारताना विचित्र आणि विनोदीच वाटतं. ती या मालिकेत आहे, याचा मला आनंद आहे कारण तिच्या रूपाने मला खूप चांगली मैत्रीण मिळाली आहे.”ऐश्वर्याही म्हणते, “इतक्या कमी वेळेत आम्ही खूप क्लोज झालो आहोत आमच्यात अशी घनिष्ठ मैत्री निर्माण होईल,याची आम्हीही कल्पना देखील केली नव्हती. आता आम्ही दोघी एकत्र असलो की मनाला शांती लाभते.आमचे विचारही खूप जुळतात.पडद्यावर भलेही आम्ही परस्परांच्या शत्रु दिसत असले तरी वास्तव जीवनात आम्ही सच्च्या मैत्रिणी आहोत.”

Fat to Fit:‘साम दाम दंड भेद’मधील भानू उदयचा प्रवास

‘साम दाम दंड भेद’ मालिकेत विजय नामधारीची भूमिका साकारणारा भानू उदय हा असाच एक कलाकार असून त्याने या भूमिकेसाठी अनेकदा आपले वजन प्रचंड प्रमाणात वाढविले आणि ते पुन्हा नेहमीच्या पातळीवर आणले.सूत्रानुसार, मालिकेच्या दिग्दर्शकांनी सुरुवातीला भानूला आपले वजन वाढविण्याची सूचना केली होती. त्यानुसार भानूने आपल्या आहारात बदल करून आपले वजन वाढविले. वजन वाढण्यात काही अडचण आली नाही, परंतु अगदी अल्प काळात इतक्या प्रमाणात वजन वाढविण्याचा त्रास झाला. अशा त-हेने वजन वाढविणे हे आरोग्यास हानिकारक असते. परंतु भानूला ही भूमिका मनापासून आवडल्याने त्याने हा त्रास सहन केला.परंतु त्यानंतर पटकथेत काही बदल करण्यात आले आणि भानूला 25 वर्षांच्या तरुणाची भूमिका साकारण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्याला हे वाढलेले वजन कमी करणे भाग होते. पण भानूने नियमित व्यायाम आणि आहारावरील कठोर निर्बंधांद्वारे आपले वाढलेले वजन घटवून आपली अंगयष्टी एखाद्या 25 वर्षीय तरुणाइतकी सडपातळ केली. आपल्या या वजन वाढविणे-घटविण्याच्या प्रयोगाबाबत भानू उदय म्हणाला, “व्यक्तिरेखेसाठी प्रयोग करण्याची माझी नेहमीच तयारी असते आणि ती व्यक्तिरेखा वास्तव दिसावी, असा माझा प्रयत्न असतो असे सांगतिले.

Web Title: The actress's 'Yerana' offscreen for 'Samantha Bandh Bandh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.