भालचंद्र व्यंकटेश पेंढारकरांचा स्मृतीदिन
By Admin | Updated: August 11, 2016 10:42 IST2016-08-11T10:39:08+5:302016-08-11T10:42:08+5:30
मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर यांचा आज (११ऑगस्ट) स्मृतीदिन

भालचंद्र व्यंकटेश पेंढारकरांचा स्मृतीदिन
>प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. ११ - मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर यांचा आज (११ऑगस्ट) स्मृतीदिन. २५ नोव्हेंबक १९२१ साली हैदराबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली.
भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत.. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते.
ललितकलादर्श
१ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली. आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे
भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेली गीते
आई तुझी आठवण येते (कवी - बाळ कोल्हटकर, गायक/संगीत - भालचंद्र पेंढारकर; नाटक - दुरितांचे तिमिर जावो; राग - मांड)
घनश्याम मुरली (नाटक - शाब्बास बिरबल शाब्बास)
जय जय कुंजविहारी (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर; नाटक - शाब्बास बिरबल शाब्बास)
जय जय रमारमण श्रीरंग (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर; नाटक - जय जय गौरीशंकर)
तू जपून टाक पाऊल जरा (कवी - बाळ कोल्हटकर, गायक/संगीत - भालचंद्र पेंढारकर; नाटक - दुरितांचे तिमिर जावो)
नयन तुझे जादुगार (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर; नाटक - पंडितराज जगन्नाथ)
मदनाची मंजिरी साजिरी (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर; नाटक - पंडितराज जगन्नाथ)
शिव-शक्तीचा अटीतटीचा (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर; नाटक - पंडितराज जगन्नाथ)
सप्तसूर झंकारित बोले (कवी - विद्याधर गोखले; संगीत - वसंत देसाई; गायक - भालचंद्र पेंढारकर, राम मराठे, प्रसाद सावकार; नाटक - पंडितराज जगन्नाथ)
भालचंद्र यांचे संगीत असलेली गीते
आई तुझी आठवण येते (कवी - बाळ कोल्हटकर, गायक/संगीत - भालचंद्र पेंढारकर; नाटक - दुरितांचे तिमिर जावो; राग - मांड)
तू जपून टाक पाऊल जरा (कवी - बाळ कोल्हटकर, गायक/संगीत - भालचंद्र पेंढारकर; नाटक - दुरितांचे तिमिर जावो)
पुरस्कार
विष्णुदास भावे पुरस्कार१९७३
बालगंधर्व पुरस्कार १९८३
केशवराव भोसले पुरस्कार१९९०
जागतिक मराठी परिषदेचा पुरस्कार, १९९६
संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार २००४
तन्वीर सन्मान२००५
चतुरंग जीवनगौरव पुरस्कार २००६
प्रभाकर पणशीकर जीवनगौरवपुरस्कार
११ ऑगस्ट २०१५ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. लोकत समूहातर्फे त्यांना आदरांजली.
सौजन्य : मराठी विकिपीडिया