रवी जाधव प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत यंटम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 14:18 IST2017-12-15T08:48:13+5:302017-12-15T14:18:13+5:30
निर्माता दिग्दर्शक रवी जाधव यांनी सातत्याने हिट चित्रपट दिले आहेत. तसेच चांगल्या चित्रपटांच्या पाठीशी प्रस्तुतकर्ते म्हणून ते नेहमीच खंबीरपणे ...
रवी जाधव प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत यंटम
न र्माता दिग्दर्शक रवी जाधव यांनी सातत्याने हिट चित्रपट दिले आहेत. तसेच चांगल्या चित्रपटांच्या पाठीशी प्रस्तुतकर्ते म्हणून ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहेत. दगडी चाळच्या यशानंतर अमोल ज्ञानेश्वर काळे निर्मित यंटम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रस्तुती रवी जाधव फिल्म्सची असून अतुल ज्ञानेश्वर काळे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. समीर आशा पाटील दिग्दर्शित यंटम ही टीनएजमधली रिफ्रेशिंग आणि म्युझिकल लव्हस्टोरी असून २ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
रवी जाधव फिल्म्सने यापूर्वी अभिजित पानसे दिग्दर्शित रेगे आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित कॉफी आणि बरंच काही हे दोन चित्रपट प्रस्तुत केले होते. अतिशय वेगळ्या धाटणीचे हे चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरल होते. आता यंटम हे आगळेवेगळे नाव असलेला नवा चित्रपट रवी जाधव प्रस्तुत करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयीचे कुतूहल वाढले आहे. चौर्य या पहिल्याच चित्रपटातून लक्ष वेधलेल्या समीर आशा पाटीलने यंटम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा- पटकथा-संवाद समीरसह मेहुल अघजा यांनी लिहिले आहेत. यंटम या चित्रपटात टीनएज लव्हस्टोरी दाखवली जाणार आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन आयुष्याबद्दल काहीतरी वेगळा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट आहे. संगीत हा या चित्रपटाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. मराठी फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेल्या मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना टाइमपास या चित्रपटासह अनेक अनेक हिट गाणी दिलेल्या चिनार-महेश या जोडीने संगीत दिले आहे. या चित्रपटाविषयी रवी जाधव सांगतात, २०१७ ला मी कच्चा लिंबू या चित्रपटामध्ये अभिनय केला तर न्यूड या चित्रपटाचे मी दिग्दर्शन केले. हे दोन्ही चित्रपट अत्यंत वेगळ्या धाटणीचे होते. २०१८ हे वर्ष मात्र माझ्यासाठी एकदम वेगळे असणार आहे. या वर्षी काही सहज, सोप्या, सामान्य माणसांच्या स्वप्नांच्या कथा, तर काही असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या प्रेरणादायी कथा लोकांसमोर आणायचा मानस आहे. यंटम हे त्यातलेच पहिले पाऊल आहे. यंटम म्हणजेच वेडेपणा. आजच्या ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांची अत्यंत तरल प्रेमकथा, ज्यात दाहक वास्तवतेचा पदर आहे आणि प्रेमात काहीही करण्याचा वेडेपणा आहे अशा लोकांची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मी या आधी अभिजित पानसे आणि प्रकाश कुंटे या नव्या दमाच्या टॅलेटेड दिग्दर्शकांचे चित्रपट प्रस्तुत केले आहेत. त्यात आता समीर आशा पाटील या तरुण टॅलेंटेड दिग्दर्शकाचे नाव सामील होत आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून सयाजी शिंदेसारख्या मात्तबर कलाकारासोबत काम करण्याचाही योग जुळून येतोय, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटात बरेच कलाकार पहिल्यांदा पडद्यावर काम करीत आहेत. मला आशा आहे, की लोकांपर्यंत हा चित्रपट पोचवण्यात माझा थोडाफार हातभार लागेल आणि या सर्व नव्या कलाकारांची या क्षेत्रात यशस्वी सुरुवात होईल.'
यंटम हा माझा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. रवी जाधव यांच्यासारख्या निर्माता दिग्दर्शकाने माझ्या चित्रपटाची प्रस्तुती करणे खूपच आनंददायी आहे. या निमित्ताने हा चित्रपट अधिक चांगल्या रितीने प्रेक्षकांपुढे येईल. यंटममधून प्रेक्षकांना नक्कीच वेगळे काहीतरी पहायला मिळेल, असं समीर आशा पाटीलने सांगितले.
Also Read : रवी जाधव यांचा नवा चित्रपट रंपाट
रवी जाधव फिल्म्सने यापूर्वी अभिजित पानसे दिग्दर्शित रेगे आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित कॉफी आणि बरंच काही हे दोन चित्रपट प्रस्तुत केले होते. अतिशय वेगळ्या धाटणीचे हे चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरल होते. आता यंटम हे आगळेवेगळे नाव असलेला नवा चित्रपट रवी जाधव प्रस्तुत करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयीचे कुतूहल वाढले आहे. चौर्य या पहिल्याच चित्रपटातून लक्ष वेधलेल्या समीर आशा पाटीलने यंटम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा- पटकथा-संवाद समीरसह मेहुल अघजा यांनी लिहिले आहेत. यंटम या चित्रपटात टीनएज लव्हस्टोरी दाखवली जाणार आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन आयुष्याबद्दल काहीतरी वेगळा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट आहे. संगीत हा या चित्रपटाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. मराठी फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेल्या मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना टाइमपास या चित्रपटासह अनेक अनेक हिट गाणी दिलेल्या चिनार-महेश या जोडीने संगीत दिले आहे. या चित्रपटाविषयी रवी जाधव सांगतात, २०१७ ला मी कच्चा लिंबू या चित्रपटामध्ये अभिनय केला तर न्यूड या चित्रपटाचे मी दिग्दर्शन केले. हे दोन्ही चित्रपट अत्यंत वेगळ्या धाटणीचे होते. २०१८ हे वर्ष मात्र माझ्यासाठी एकदम वेगळे असणार आहे. या वर्षी काही सहज, सोप्या, सामान्य माणसांच्या स्वप्नांच्या कथा, तर काही असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या प्रेरणादायी कथा लोकांसमोर आणायचा मानस आहे. यंटम हे त्यातलेच पहिले पाऊल आहे. यंटम म्हणजेच वेडेपणा. आजच्या ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांची अत्यंत तरल प्रेमकथा, ज्यात दाहक वास्तवतेचा पदर आहे आणि प्रेमात काहीही करण्याचा वेडेपणा आहे अशा लोकांची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मी या आधी अभिजित पानसे आणि प्रकाश कुंटे या नव्या दमाच्या टॅलेटेड दिग्दर्शकांचे चित्रपट प्रस्तुत केले आहेत. त्यात आता समीर आशा पाटील या तरुण टॅलेंटेड दिग्दर्शकाचे नाव सामील होत आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून सयाजी शिंदेसारख्या मात्तबर कलाकारासोबत काम करण्याचाही योग जुळून येतोय, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटात बरेच कलाकार पहिल्यांदा पडद्यावर काम करीत आहेत. मला आशा आहे, की लोकांपर्यंत हा चित्रपट पोचवण्यात माझा थोडाफार हातभार लागेल आणि या सर्व नव्या कलाकारांची या क्षेत्रात यशस्वी सुरुवात होईल.'
यंटम हा माझा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. रवी जाधव यांच्यासारख्या निर्माता दिग्दर्शकाने माझ्या चित्रपटाची प्रस्तुती करणे खूपच आनंददायी आहे. या निमित्ताने हा चित्रपट अधिक चांगल्या रितीने प्रेक्षकांपुढे येईल. यंटममधून प्रेक्षकांना नक्कीच वेगळे काहीतरी पहायला मिळेल, असं समीर आशा पाटीलने सांगितले.
Also Read : रवी जाधव यांचा नवा चित्रपट रंपाट