LMOTY 2018 : सोनाली कुलकर्णी अन् सुमित्रा भावे ठरल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या मानकरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 19:05 IST2018-04-10T13:35:07+5:302018-04-10T19:05:07+5:30
‘कासव’ या चित्रपटाने मराठी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त या चित्रपटाचा आशय खूपच गहन असून, ...

LMOTY 2018 : सोनाली कुलकर्णी अन् सुमित्रा भावे ठरल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या मानकरी!
‘ ासव’ या चित्रपटाने मराठी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त या चित्रपटाचा आशय खूपच गहन असून, प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारा आहे. याचे श्रेय चित्रपटाच्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि हळुवार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाºया अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना जातो. त्यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक करताना आज त्यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईयर २०१८’ हा पुरस्कार विभागून देण्यात आला. चित्रपट (स्त्री) या विभागात परीक्षकांनी या दोघींची निवड केली.
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इअर पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्र ीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामिगरी करणाºया शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेले मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. महालक्ष्मीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात सोनाली आणि सुमित्रातार्इंना सन्मानित करण्यात आले
सोनाली कुलकर्णी, गुलाबजाम, अभिनय
सोनाली कुलकर्णीने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये बहुरंगी-बहुढंगी भूमिका साकारल्या आहेत. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘दिल चाहता है’, ‘मिशन कश्मीर’, ‘सिंघम’ यांसारख्या चित्रपटांमधून तिनं आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘देऊळ’, ‘पुणे ५२’ या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकांनाही प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. गुलाबजाम या नव्या सिनेमातून एक वेगळी सोनाली चाहत्यांना भेटली आणि भावली.
![]()
सुमित्रा भावे, कासव, दिग्दर्शक
१५ चित्रपट, ६०-७० लघुपट, पाच दूरदर्शन मालिका अशा अनेक कलाकृती आज सुमित्रा भावे यांच्या नावावर आहेत. ‘दोघी’, ‘जिंदगी जिंदाबाद’, ‘संहिता’, ‘अस्तु’, ‘कासव’ या सुमित्रा भावे यांच्या अजरामर कलाकृती आहेत. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘कासव’ या मराठी चित्रपटाने सुवर्णकमळ मिळविले आहे. सध्याच्या धकाधकीच्या दुनियेत आपल्या शारीरिक आणि मानिसक आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आज अनेक जण डिप्रेशनचा सामना करत आहेत. याच डिप्रेशनवर आधारित ‘कासव’ या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संवाद खूपच कमी आहेत, पण दिग्दर्शकाने कलाकारांच्या अभिनयातून प्रत्येक दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचिवले आहे. ‘कासव’ या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, चित्रपटात टिपलेला कोकणचा परिसर, चित्रपटाची कथा या सगळ्यांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. या चित्रपटात अलोक राजवाडे आणि इरावती हर्षे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात आलोकला खूपच कमी संवाद असले, तरी त्याने त्याच्या देहबोलीतून आणि अभिनयातून ही भूमिका ताकदीने रंगविली आहे. सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शनामुळेच कलाकारांना आपल्या भूमिका तितक्या ताकदीने साकारता आल्या आहेत.
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इअर पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्र ीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामिगरी करणाºया शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेले मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. महालक्ष्मीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात सोनाली आणि सुमित्रातार्इंना सन्मानित करण्यात आले
सोनाली कुलकर्णी, गुलाबजाम, अभिनय
सोनाली कुलकर्णीने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये बहुरंगी-बहुढंगी भूमिका साकारल्या आहेत. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘दिल चाहता है’, ‘मिशन कश्मीर’, ‘सिंघम’ यांसारख्या चित्रपटांमधून तिनं आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘देऊळ’, ‘पुणे ५२’ या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकांनाही प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. गुलाबजाम या नव्या सिनेमातून एक वेगळी सोनाली चाहत्यांना भेटली आणि भावली.
सुमित्रा भावे, कासव, दिग्दर्शक
१५ चित्रपट, ६०-७० लघुपट, पाच दूरदर्शन मालिका अशा अनेक कलाकृती आज सुमित्रा भावे यांच्या नावावर आहेत. ‘दोघी’, ‘जिंदगी जिंदाबाद’, ‘संहिता’, ‘अस्तु’, ‘कासव’ या सुमित्रा भावे यांच्या अजरामर कलाकृती आहेत. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘कासव’ या मराठी चित्रपटाने सुवर्णकमळ मिळविले आहे. सध्याच्या धकाधकीच्या दुनियेत आपल्या शारीरिक आणि मानिसक आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आज अनेक जण डिप्रेशनचा सामना करत आहेत. याच डिप्रेशनवर आधारित ‘कासव’ या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संवाद खूपच कमी आहेत, पण दिग्दर्शकाने कलाकारांच्या अभिनयातून प्रत्येक दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचिवले आहे. ‘कासव’ या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, चित्रपटात टिपलेला कोकणचा परिसर, चित्रपटाची कथा या सगळ्यांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. या चित्रपटात अलोक राजवाडे आणि इरावती हर्षे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात आलोकला खूपच कमी संवाद असले, तरी त्याने त्याच्या देहबोलीतून आणि अभिनयातून ही भूमिका ताकदीने रंगविली आहे. सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शनामुळेच कलाकारांना आपल्या भूमिका तितक्या ताकदीने साकारता आल्या आहेत.