‘जर्नी टू दि सेंटर आॅफ दि हार्ट...’ - आदिनाथ कोठारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 09:41 IST2017-07-02T13:39:12+5:302017-07-03T09:41:08+5:30
माझे दोन मित्र आहेत. या जगात आपल्यासारखेच दोन वेडे सापडण ह्याला खरंच खूप नशीब लागत. खरे मित्र सापडणं खूप ...
.jpg)
‘जर्नी टू दि सेंटर आॅफ दि हार्ट...’ - आदिनाथ कोठारे
म झे दोन मित्र आहेत. या जगात आपल्यासारखेच दोन वेडे सापडण ह्याला खरंच खूप नशीब लागत. खरे मित्र सापडणं खूप दुर्मिळ. त्यात स्वभाव आणि आवडीनिवडींबरोबर वेडेपणाही मॅच होणं म्हणजे आयुष्यभराचा खजिनाच. माझे खूप जुने मित्र. एक बालपणापासूनचा तर एक कॉलेजपासूनचा.
आम्हाला रोड ट्रिप्सवर जायला खूप आवडत. आणि आमच्या ट्रिपची खासियत म्हणजे आम्ही फक्त ठरवतो या दिवशी ट्रिपला जायच, त्या दिवशी एकजण त्याची गाडी काढतो. दोघांना पिकअप करतो आणि मग गाडी रस्त्याला लावली कि आम्ही ठरवतो कुठे जायच ते. ठिकाण आमच्या तिघांच्या मुडवर अवलंबून असत.
खरंतर आम्ही चार वेडे मित्र आहोत. पण चौथा परदेशात काम करत असतो, त्यामुळे तो खूप क्वचितच आमच्यासॊबत असतो.
तर अशाच एके दिवशी आम्ही तिघे मित्र भेटलो. गाडी नाशिक हायवेच्या दिशेने घेतली. ठिकाण अजूनही ठरत नव्हतं. काही वेगळ सुचल नाहीच तर नाशिकच्या सुला वाईन यार्डला जाऊन एक रात्र मुक्काम करुन परतू असा एक ढोबळ विचार मनात होता.
ह्या दोन वेड्यांमधला माझा बालपणीचा जो मित्र आहे. तो आता लग्न होऊन मुलगी झाल्यावर त्याच्या गावी शिफ्ट झालाय. वयाच्या पाचव्या वर्षापासूनचा हा माझा मित्र. आयुष्यातली सगळी मस्ती, सगळे राडे, सगळी माती आणि सगळे किडे, आम्ही एकत्र केले, खाल्ले आणि भोगले. इतरांसारखेच आमच्या मैत्रीतही अनेक उतार चढाव आले आणि गेले. असो तो खूपच गहन आणि इमोशनल विषय आहे. तो पुढच्या वेळेस.
तर इगतपुरी पासून १० कि.मी. वर असताना आम्हाला एक साईन बोर्ड दिसला ज्यावर लिहिल होत, "भंडारदारा - ५० कि.मी."
आमच्यापैकी कुणीही याआधी भंडारदाराला गेल नव्हतं. त्यातल्या त्यात मी खूप ऐकून होतो. जुलै महिना चालू होता. पाऊसही छान पडत होता. आणि आम्ही तीघेही निसर्ग प्रेमी. ठरल तर. मुक्काम पोस्ट भंडारदारा.
तिथे कुठे जायचा ? कुठे रहायचं ? बुकिंग मिळाल नाही तर ? ... बघु ! व्ही विल क्रोस दि ब्रिज व्हेन व्ही कम टू ईट !
रोडट्रिपचा खरा आनंद त्याच्या प्रवासात असतो. त्या प्रवासाच्या अनपेक्षितपणात असतो, आणि त्या अनपेक्षितपणात दडलेल्या एका प्रकारच्या गूढतेते असतो.
मला अस वाटत कि आयुष्यातही खूप प्लानिंग करुन आपण कधी कधी जगण्याची खरी मजाच घालवून बसतो. आयुष्यात एक ध्येय नक्कीच ठरवावं. जस आम्ही कुठेच नाही तर नाशिकच्या सुला वाईन यार्डला पोहोचणारच होतो. पण ते ध्येय गाठताना जर वाटेत एका वळणावर एक आणखी सुंदर आणि आणखी मोठी संधी दिसत असेल, जी आपलं पहिलं ध्येय गाठण्यामागाची प्रेरणा साधत असेल. तर मग गाडी वळवून बघण्यात काय हरकत आहे ? फार फार तर काय, यु टर्न घेऊन पुन्हा येऊ हायवेवर आणि जाऊ सुला वाईन यार्डला. पण मग आणखी पुढे गेल्यावर गाडी वळवण तितकं सोप नसत. आणि मग सतत एक खंत वाटत राहते. आपण आयुष्यात पुन्हा त्याच रस्त्यावरून खूप क्वचित जातो, आणि गेलो तरी तिच वळण पुन्हा सापडतील याची शाश्वती नसते.
हायवे सोडून भंडारदारासाठी जाणाऱ्या आतल्या रस्त्यावर जसे आम्ही लागलो, तसे आम्ही हळू हळू निसर्गाच्या कुशीत शिरत गेलो.
हिरवळ, डोंगर, धुकं ह्यातून वाट काढत काढत आम्ही शेवटी एका छोट्याश्या घाटापर्यंत पोहोचलो. तो संपूर्ण घाट आपल्या कापसी ढगांच पांघरूण ओढून गाढ निजला होता. भवतालचे धबधबे देखील त्याची झोप मोड होऊ नये म्हणून स्वतः ची गती मंदावून वाहत होते.
आम्ही त्या निजलेल्या घाटाच्या स्वप्नात विलीन होऊन भारावलेल्या अवस्थेत त्याच्या वळणांना वळसे घालत, त्या दाट धुक्यातून वाट शोधात, घाट चढत होतो. कुणीही एकमेकांशी एक शब्दही बोलत न्हवता. हा भंडारदराचाच घाट होता. जसे आम्ही त्या घाटाच्या शिखरावर पोहोचलो, आम्हाला काही अंतरावर ती दाट धुकं विखुरताना दिसायला लागली आणि भांडाराच्या डोंगरावरून दिसणारा निसर्गरम्य विस्तार अंधुकसा स्पष्ट होऊ लागला. त्या धुक्युतून बाहेर पडताच आमचे डोळे दिपून गेले. ते निसर्गाचं विस्तीर्ण सौंदर्य आमच्या डोळ्यात मावत न्हवत.
क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवळ, दाट ढगांच्या मिठीत तल्लीन झालेले डोंगर, त्या डोंगरतुन पाझरणारे असंख्य धबधबे आणि ह्या भारावून टाकणाऱ्या मैफिलीच्या पायथ्याशी, त्या दाटून आलेल्या आभाळच प्रतिबिंब झळकणारा आर्थर तलाव.
एक सुप्रसिद्ध हॉलिवूड सिनेमा आहे ज्याचं नाव आहे, "जर्नी टू द सेंटर ऑफ दि अर्थ"... ह्या सिनेमातील मुख्य पात्र, जगाच्या खोल पोटात जाऊन एक हरवलेलं जग शोधुन काढतात. आम्हाला त्या क्षणी तसच काहीतरी भासत होत. जस कि आम्ही एक्सप्लोरर्स आहोत आणि जणू एक हरवलेलं जगच आम्हाला सापडलं आहे.
खरंतर जग हरवलेलं नसत, आपणच हरवलेलो असतो. शहर नावाच्या कॉंक्रीट जंगलात, आपल्या रोजच्या दगदगीत आपण एक स्वतःचच छोटस जग बनवून त्यात घुटमळत असतो. आपण सतत काहीतरी शोधात असतो, ज्यातून आपल्याला समाधान मिळेल, ज्यातून आपण संतुष्ट होऊ. अनेकदा आपण हे समाधान आणि हि संतुष्टता, आपणच निर्माण केलेल्या छोट्याश्या जगातल्या, आपणच मोठे बनवून ठेवलेल्या माणसांच्या, त्यांच्या आपल्या प्रती असलेल्या स्विकारात शोधत असतो. जे स्वतः त्यांच्याच स्वतःच्या छोट्याशा निर्माण केलेल्या जगात हरवलेले असतात. आणि म्हणूनच कदाचित आपण समाधानी किंवा संतुष्ट नसतो.
आपण सगळेच एक्सप्लोरर्स आहोत. आपण सतत नव्या जगाच्या शोधात असतो. पण ह्या कॉंक्रीटच्या जंगलात आपल्या सगळ्यांचं होकायंत्र हरवलेलं असत. पर्यावरणाशी आणि निसर्गाशी आपलं नात तुटल्यामुळे आपण चुकीच्या दिशेने प्रवास करत असतो.
निसर्गाच्या संपर्कात आल्यावर आपल्याला आपलं होकायंत्र पुन्हा सापडत. ते व्यवस्थित काम करायला लागत. आपल्याला आपला धृव तारा दिसतो आणि मग आपल्याला आपल्या प्रवासाची दिशा कळते.
आपण सगळेच एक्सप्लोरर्स आहोत. ऍड अवर जर्नी इज टूदी सेंटर ऑफ अवर हार्ट. आपल्या आत, आपल्या हृदयात एक हरवलेला निसर्ग आहे. आणि मला अस वाटत कि आपण त्याचा शोध कायम घेतला पाहिजे.
असो, हार्टमधला निसर्ग सापडेल तेव्हा सापडेल. आम्हाला त्याक्षणी स्वतःच हार्टच सापडत नव्हत. कारण आमच हार्ट त्याक्षणी भांडरदाराच्या निसर्गात हरवून गेल होत.
तिथेच आजूबाजूला दोन तीन रिसॉर्टस होती. आम्ही ठरवलं इथच कुठेतरी मुक्काम करायचा. एम टि डि सी रिसॉर्टमध्ये एरव्ही पावसाळ्यात बुकिंगशिवाय जाणं मूर्खपणाच ठरेल. पण आम्ही तरी कुठे शहाणे होतो. आमचं कदाचित नशीब चांगल होतं. आम्हाला कठड्यावरच कॉर्नर कॉटेज मिळालं ज्यावरून संपूर्ण आर्थर तलावाचा विस्तार स्पष्ट दिसत होता. एम टि डि सी, आर्थर तलाव, देव किंवा नशिब. चौघांपैकी एक कोणीतरी त्या दिवशी खूप प्रेमात होतं आमच्या. आम्ही तिघे त्या दिवशी निसर्गाचा आनंद घेत तिथेच राहिलो. तीन मित्र अशा ठिकाणी गेल्यावर जी धमाल मस्ती करतात ती सगळी केली.
सकाळी उठलो तेव्हा भान हरपून जावं अस दृष्य आमच्या डोळयांसमोर होतं. इतरांसारखंच रिसॉर्टमध्ये नाश्ता करून आंघोळ करून बाहेर पडू असा विचार मनात आला आमच्या. पण मग इतरांसारखंच शहाण्यासारखे वागलो तर मग काय मजा. व्ही हॅड टू ल्हिव अप टू अवर रेप्युटेशन. डोळ्यांसमोर भंडारदारयाचं मोहक नैसर्गिक सौंदर्य आम्हाला आणखी कुशीत घेण्यासाठी बोलवत होतच. आम्ही ठरवलं. अंघोळ नाश्ता बिश्ता सगळ नैसर्गिक पद्धतीने भंडारदारयाच्या खोल निसर्गात शिरून करायचं. आम्ही लगेच आमच्या बॅग पॅक्स घेतल्या आणि चेक आऊट करून निघालो.
भंडारदाराच्या दरीत उतरल्या उतरल्या पायथ्याशी पहुडलेल्या विस्तीर्ण आर्थर तलाव. त्या तलावाच्या काठाला, त्याच्या वळणांबरोबर वळणारा रस्ता आम्हाला भंडारदाराच्या दाट जंगलामध्ये घेऊन जात होता. थोडं आत शिरल्यावर उजव्या हाताला डोंगरातल्या धबधब्यातून तयार झालेले दोन तीन ओढे एकत्र येऊन त्यांचा एक मोठा ओढा तयार झाला होता जो रस्त्यावरून आतल्या बाजूला थोडया अंतरावर एका छोटयाश्या कठडयावरून धबधबा होऊन कोसळत होता. पुढे जाऊन त्याची एक छोटीशी नदी तयार झाली होती. आम्ही गाडी रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली लावली आणि त्या धबधब्याखाली अंघोळ करायला उतरलो.
धबधब्यात आमची धमाल मस्ती चालू असताना आमच्यातल्या एका मित्राला बाजूच्या खेडयातलं एक जोडपं थोडयाशा अंतरावर धबधब्याजवळ काहीतरी शोधताना दिसलं. तो त्यांना विचारायला गेला. तोपर्यंत आम्ही दोघं त्या धबधब्याची खूप मजा घेत होतो. त्या धबधब्याच्या आवाजात लांबच काही ऐकू येणं शक्यच नवहतं. धबधबा आपला प्रायव्हेट जॅकूझी आहे अशा गैरसमजात मी असताना, माझी नजर सहज वरच्या बाजूला गेली. माझा मित्र जो त्या जोडप्याला विचारायला गेला होता, तो जिवाच्या आकांताने ओरडून आम्हाला काहितरी सांगायचा प्रयत्त्न करत होता. आम्हा दोघांना काहीच काळत नवहत. धबधब्याखालून जेव्हा मी डोकं बाहेर काढलं तेंव्हा त्याच्या तोंडातून निघालेल्या शब्दांतला फक्त शेवटचा शब्द जो मला आणि माझ्या दुसऱ्या मित्राला ऐकू आला, तो म्हणजे "साप"! दुसऱ्या कुठल्या शब्दाची आम्हाला गरजच नाही भासली. आपल्या प्रायव्हेट जॅकूझीच बुकिंग संपल आहे असं आम्हाला त्याक्षणी कळलं. कुल्याला पाय लावून आम्ही डायरेक्ट पॅंट घालत रस्त्यावर प्रकट झालो. थोड्यावेळाने भानावर आल्यावर खूप हसलो आणि त्या प्रसंगाची खूप मजाही वाटली. उसनं धाडस करून “चला बघुया तरी कुठे आहे तो साप” असा बेतही मांडला. पण आता तिघांनाही छान आंघोळ झाल्यावर खूप भूक लागली होती.
आजुबाजूला छोटी छोटी खेडी होती. आम्ही गाडीत बसून कुठे काही खायला मिळेल का, शोधायला लागलो. एक दोन खानावळी दिसल्या पण त्यात फार काही रस नाही वाटला. आपण एके ठिकाणी जेव्हा प्रवास करतो, तो प्रवास त्या ठिकाणातल्या खास किंवा अस्सल जेवण पद्धतीची चव घेतल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तिकडच्या अस्सल खाद्य पदर्थांची चव घेतल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणची ओळख पटूच शकत नाही. ज्या पद्धतीने आपण एका व्यक्तीची ओळख पटवून घेण्यासाठी त्याच्याशी बोलतो, चर्चा करतो. तशाच पद्धतीने एका गावाची ओळख पटवून घेण्यासाठी त्या गावातलं अस्सल जेवण जेववाच लागतं.
आमच्या समोर एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं खेडं होतं. आम्ही गाडी लावली आणि त्या खेडयात चालत आत शिरलो. आम्हाला एक छोटीशी झोपडी दिसली, जी बऱ्यापैकी नीट नेटकी होती. त्या झोपडीच्या दारापाशी जाऊन मी विचारलं “कोणी आहे का ?”
एक चाळिशीतली बाई दारापाशी आली. आम्हा तिघा पुरुषांना बघुन थोडी हादरली. मग पदर डोक्यावर घेत थोडी सावध होऊन म्हणाली “कोन ?”
मी तिला सांगितलं “आम्ही मुंबईहून आलो आहोत. तुम्हाला त्रास नाही द्यायचाय, पण आम्हाला खूप भूक लागली आहे. आम्ही तुम्हाला ५०० रुपये देऊ. काही वेगळं किंवा खास करायची गरज नाही. तुम्ही जे घरात रोज बनवून जेवता आम्हाला अगदी तेच हवंय”.
५०० रुपये एकून त्या बिचाऱ्या गरीब बाईचे डोळेच फिरले. ती खूप खुष झाली. म्हणाली “पाउन तास लागल जेवन बनवाया”.
मी म्हणालो “काही हरकत नाही, तुम्ही तुमचा वेळ घ्या, आम्ही येऊ पाउण तासाने”. असं म्हणून आम्ही तिथून निघालो.
मला त्या बाईच्या धाडसाबद्दल खरच नवल आणि अभिमान वाटला. एका छोट्या खेड्यातली एक गरीब बाई जी आधी तीन पुरूषांना बघुन थोडी घाबरली होती. तिने ५०० रुपयांसाठी ह्या तीन अनोळखी पुरुषांवर विश्वास ठेवण्याचं धाडस पत्करलं. तिच्यासाठी ते ५०० रुपये म्हणजे एक महिन्याचा घराचा निम्मा किंवा संपूर्ण खर्चच असावा. परिस्थिती माणसाला धाडसी बनवतेच.
आम्ही पाऊण तास निसर्गाची टेहळणी करत घालवला. काही धबधबे, एक नदी धुक्याच्या थरात लपलेली, रस्त्याच्या कडेला पसरून ठेवलेले गवताचे हिरवे गालिचे, अशा वातावरणात आणखी मंत्रमुग्ध होऊन आम्ही पाऊण तासानंतर त्या बाईच्या झोपडीपाशी पुन्हा पोहोचलो.
अळूची भाजी, तुरीची डाळ, त्यांच्याच शेतातला भात आणि चपाती. असा साधा अस्सल बेत आमच्यासाठी त्या बाईने मांडला होता. आम्ही त्या जेवणावर तुटून पडलो. प्रत्येक घासात त्या गावाची अस्सल चव, त्या घराची परिस्थिती, त्या घरातल्या माणसांचा साधेपणा, तिला मदत केल्याने तिला झालेला आनंद आणि त्यातून उमटणार प्रेम सतत भासवत आणि डोकावत होत.
आम्ही जेवत असताना त्या बाईच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थपणा जाणवत होता. मी जेंव्हा तिला कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, "माज्या नवऱ्याला कळलं तर मारनार मला". आम्हाला काय बोलावं काहीच कळेना. आमचं जेवण संपणारच होतं इतक्यात ती घाई घाई ने बाहेर गेली. काही मिनिटातच ती धावत आत आली. ती भीतीने थरथरत होती. तिचा नवरा आला होता. कुठल्याही क्षणी तो घरात येणार होता.
आम्ही ताटावरून उठणारच होतो जेंव्हा तिचा नवरा घरात शिरला. त्या बाईला आता घाम फ़ुटला होता. आम्हा तिघांना बघुन तो ही चपापला. त्यांच्या बायकोने लगेच आम्ही तिला दिलेली ५०० ची नोट त्याच्यासमोर धरली आणि त्याला सगळं थरथरत्या आवाजात सांगायला लागली. नवरा खूप तापलेला, पण आमच्यासमोर राग लपवण्याचा प्रयत्न करत होता.
मी लगेच उठून तिच्या नवऱ्याला सगळं नीट समजावलं. माझी ओळख पटवून दिली. माझं बोलण ऐकून तो थोडा शांत झाला, आणि कसंनुसं हसला.
आम्ही त्यांचे इतक सुंदर जेवण दिल्याबद्ल आणि पाहुणचार केल्याबद्दल आभार मानले आणि निघालो.
आम्ही गेल्यावर त्या नवऱ्याने तिच्यावर हात उगारला असेल का.. ? का ५०० रुपये हुशारीने कमावल्याबद्दल आनंद व्यक्तकेला असेल.. ? का तिला मारझोड करून राग शांत झाल्यावर ५०० रुपयांकडे बघून मनातल्या मनात सुखावला असेल.. ?
पण त्या बाईला सलाम !! नवऱ्याची वृत्ती माहित असुनही, घराच्या परिस्थितीकडे बघून तिने हे धाडस केलं. परिणाम तिला माहित होता. कदाचित तिला सवयही झाली असावी.
पण त्या नवऱ्याने तिला मारझोड करायला नको.... रागवावं हवं तर तिच्यावर, पण मारझोड करायला नको. तसं बघायला गेलं तर त्याचा रागपण बरोबर आहे. तीने अनोळखी पुरुषांना एका खेड्यातली बाई घरात कोणीही नसताना ५०० रुपयांसाठी घरात घेते आणि जेवायला वाढते. आम्ही चांगल्या घरातील मुलं होतो म्हणून.... पण दुसरं कोण असतं तर..? पण हे त्या गृहिणीला नक्कीच कळलं असणार. म्हणूनच तर तिने आम्हाला जेवायला वाढलं.
पण काहीही असो कुठल्याही पुरुषांनी स्वतःच्या बायकोला कधीही मारझोड करू नये.... त्यातून तो फक्त त्याचा पुरुषार्थ गमावून बसतो.
ती गृहिणी हुशार होती, धीट होती.
ह्या अशा सुंदर निसर्गाच्या कुशीत राहणारी माणसं एवढं कठीण आयुष्य का जगतात? यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर सगळ्या निसर्गाचें क्रॉंक्रिट जंगल होईल आणि सगळ्या ह्रुदयातील निसर्ग नष्ट होतील.
आम्ही तिघे सुन्न होऊन परतीचा प्रवास साधत होतो. कल्याण येईपर्यंत कोणीही एक शब्द उच्चारलेला मला आठवत नाहीए. त्या परतीच्या प्रवासात आमच्या स्वतःच्या ह्रुदयातल्या निसर्गाचा शोध सुरु झाला होता. जो आजही सुरु आहे आणि आयुष्यभर चालतच राहणार.
- आदिनाथ कोठारे
आम्हाला रोड ट्रिप्सवर जायला खूप आवडत. आणि आमच्या ट्रिपची खासियत म्हणजे आम्ही फक्त ठरवतो या दिवशी ट्रिपला जायच, त्या दिवशी एकजण त्याची गाडी काढतो. दोघांना पिकअप करतो आणि मग गाडी रस्त्याला लावली कि आम्ही ठरवतो कुठे जायच ते. ठिकाण आमच्या तिघांच्या मुडवर अवलंबून असत.
खरंतर आम्ही चार वेडे मित्र आहोत. पण चौथा परदेशात काम करत असतो, त्यामुळे तो खूप क्वचितच आमच्यासॊबत असतो.
तर अशाच एके दिवशी आम्ही तिघे मित्र भेटलो. गाडी नाशिक हायवेच्या दिशेने घेतली. ठिकाण अजूनही ठरत नव्हतं. काही वेगळ सुचल नाहीच तर नाशिकच्या सुला वाईन यार्डला जाऊन एक रात्र मुक्काम करुन परतू असा एक ढोबळ विचार मनात होता.
ह्या दोन वेड्यांमधला माझा बालपणीचा जो मित्र आहे. तो आता लग्न होऊन मुलगी झाल्यावर त्याच्या गावी शिफ्ट झालाय. वयाच्या पाचव्या वर्षापासूनचा हा माझा मित्र. आयुष्यातली सगळी मस्ती, सगळे राडे, सगळी माती आणि सगळे किडे, आम्ही एकत्र केले, खाल्ले आणि भोगले. इतरांसारखेच आमच्या मैत्रीतही अनेक उतार चढाव आले आणि गेले. असो तो खूपच गहन आणि इमोशनल विषय आहे. तो पुढच्या वेळेस.
तर इगतपुरी पासून १० कि.मी. वर असताना आम्हाला एक साईन बोर्ड दिसला ज्यावर लिहिल होत, "भंडारदारा - ५० कि.मी."
आमच्यापैकी कुणीही याआधी भंडारदाराला गेल नव्हतं. त्यातल्या त्यात मी खूप ऐकून होतो. जुलै महिना चालू होता. पाऊसही छान पडत होता. आणि आम्ही तीघेही निसर्ग प्रेमी. ठरल तर. मुक्काम पोस्ट भंडारदारा.
तिथे कुठे जायचा ? कुठे रहायचं ? बुकिंग मिळाल नाही तर ? ... बघु ! व्ही विल क्रोस दि ब्रिज व्हेन व्ही कम टू ईट !
रोडट्रिपचा खरा आनंद त्याच्या प्रवासात असतो. त्या प्रवासाच्या अनपेक्षितपणात असतो, आणि त्या अनपेक्षितपणात दडलेल्या एका प्रकारच्या गूढतेते असतो.
मला अस वाटत कि आयुष्यातही खूप प्लानिंग करुन आपण कधी कधी जगण्याची खरी मजाच घालवून बसतो. आयुष्यात एक ध्येय नक्कीच ठरवावं. जस आम्ही कुठेच नाही तर नाशिकच्या सुला वाईन यार्डला पोहोचणारच होतो. पण ते ध्येय गाठताना जर वाटेत एका वळणावर एक आणखी सुंदर आणि आणखी मोठी संधी दिसत असेल, जी आपलं पहिलं ध्येय गाठण्यामागाची प्रेरणा साधत असेल. तर मग गाडी वळवून बघण्यात काय हरकत आहे ? फार फार तर काय, यु टर्न घेऊन पुन्हा येऊ हायवेवर आणि जाऊ सुला वाईन यार्डला. पण मग आणखी पुढे गेल्यावर गाडी वळवण तितकं सोप नसत. आणि मग सतत एक खंत वाटत राहते. आपण आयुष्यात पुन्हा त्याच रस्त्यावरून खूप क्वचित जातो, आणि गेलो तरी तिच वळण पुन्हा सापडतील याची शाश्वती नसते.
हायवे सोडून भंडारदारासाठी जाणाऱ्या आतल्या रस्त्यावर जसे आम्ही लागलो, तसे आम्ही हळू हळू निसर्गाच्या कुशीत शिरत गेलो.
हिरवळ, डोंगर, धुकं ह्यातून वाट काढत काढत आम्ही शेवटी एका छोट्याश्या घाटापर्यंत पोहोचलो. तो संपूर्ण घाट आपल्या कापसी ढगांच पांघरूण ओढून गाढ निजला होता. भवतालचे धबधबे देखील त्याची झोप मोड होऊ नये म्हणून स्वतः ची गती मंदावून वाहत होते.
आम्ही त्या निजलेल्या घाटाच्या स्वप्नात विलीन होऊन भारावलेल्या अवस्थेत त्याच्या वळणांना वळसे घालत, त्या दाट धुक्यातून वाट शोधात, घाट चढत होतो. कुणीही एकमेकांशी एक शब्दही बोलत न्हवता. हा भंडारदराचाच घाट होता. जसे आम्ही त्या घाटाच्या शिखरावर पोहोचलो, आम्हाला काही अंतरावर ती दाट धुकं विखुरताना दिसायला लागली आणि भांडाराच्या डोंगरावरून दिसणारा निसर्गरम्य विस्तार अंधुकसा स्पष्ट होऊ लागला. त्या धुक्युतून बाहेर पडताच आमचे डोळे दिपून गेले. ते निसर्गाचं विस्तीर्ण सौंदर्य आमच्या डोळ्यात मावत न्हवत.
क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवळ, दाट ढगांच्या मिठीत तल्लीन झालेले डोंगर, त्या डोंगरतुन पाझरणारे असंख्य धबधबे आणि ह्या भारावून टाकणाऱ्या मैफिलीच्या पायथ्याशी, त्या दाटून आलेल्या आभाळच प्रतिबिंब झळकणारा आर्थर तलाव.
एक सुप्रसिद्ध हॉलिवूड सिनेमा आहे ज्याचं नाव आहे, "जर्नी टू द सेंटर ऑफ दि अर्थ"... ह्या सिनेमातील मुख्य पात्र, जगाच्या खोल पोटात जाऊन एक हरवलेलं जग शोधुन काढतात. आम्हाला त्या क्षणी तसच काहीतरी भासत होत. जस कि आम्ही एक्सप्लोरर्स आहोत आणि जणू एक हरवलेलं जगच आम्हाला सापडलं आहे.
खरंतर जग हरवलेलं नसत, आपणच हरवलेलो असतो. शहर नावाच्या कॉंक्रीट जंगलात, आपल्या रोजच्या दगदगीत आपण एक स्वतःचच छोटस जग बनवून त्यात घुटमळत असतो. आपण सतत काहीतरी शोधात असतो, ज्यातून आपल्याला समाधान मिळेल, ज्यातून आपण संतुष्ट होऊ. अनेकदा आपण हे समाधान आणि हि संतुष्टता, आपणच निर्माण केलेल्या छोट्याश्या जगातल्या, आपणच मोठे बनवून ठेवलेल्या माणसांच्या, त्यांच्या आपल्या प्रती असलेल्या स्विकारात शोधत असतो. जे स्वतः त्यांच्याच स्वतःच्या छोट्याशा निर्माण केलेल्या जगात हरवलेले असतात. आणि म्हणूनच कदाचित आपण समाधानी किंवा संतुष्ट नसतो.
आपण सगळेच एक्सप्लोरर्स आहोत. आपण सतत नव्या जगाच्या शोधात असतो. पण ह्या कॉंक्रीटच्या जंगलात आपल्या सगळ्यांचं होकायंत्र हरवलेलं असत. पर्यावरणाशी आणि निसर्गाशी आपलं नात तुटल्यामुळे आपण चुकीच्या दिशेने प्रवास करत असतो.
निसर्गाच्या संपर्कात आल्यावर आपल्याला आपलं होकायंत्र पुन्हा सापडत. ते व्यवस्थित काम करायला लागत. आपल्याला आपला धृव तारा दिसतो आणि मग आपल्याला आपल्या प्रवासाची दिशा कळते.
आपण सगळेच एक्सप्लोरर्स आहोत. ऍड अवर जर्नी इज टूदी सेंटर ऑफ अवर हार्ट. आपल्या आत, आपल्या हृदयात एक हरवलेला निसर्ग आहे. आणि मला अस वाटत कि आपण त्याचा शोध कायम घेतला पाहिजे.
असो, हार्टमधला निसर्ग सापडेल तेव्हा सापडेल. आम्हाला त्याक्षणी स्वतःच हार्टच सापडत नव्हत. कारण आमच हार्ट त्याक्षणी भांडरदाराच्या निसर्गात हरवून गेल होत.
तिथेच आजूबाजूला दोन तीन रिसॉर्टस होती. आम्ही ठरवलं इथच कुठेतरी मुक्काम करायचा. एम टि डि सी रिसॉर्टमध्ये एरव्ही पावसाळ्यात बुकिंगशिवाय जाणं मूर्खपणाच ठरेल. पण आम्ही तरी कुठे शहाणे होतो. आमचं कदाचित नशीब चांगल होतं. आम्हाला कठड्यावरच कॉर्नर कॉटेज मिळालं ज्यावरून संपूर्ण आर्थर तलावाचा विस्तार स्पष्ट दिसत होता. एम टि डि सी, आर्थर तलाव, देव किंवा नशिब. चौघांपैकी एक कोणीतरी त्या दिवशी खूप प्रेमात होतं आमच्या. आम्ही तिघे त्या दिवशी निसर्गाचा आनंद घेत तिथेच राहिलो. तीन मित्र अशा ठिकाणी गेल्यावर जी धमाल मस्ती करतात ती सगळी केली.
सकाळी उठलो तेव्हा भान हरपून जावं अस दृष्य आमच्या डोळयांसमोर होतं. इतरांसारखंच रिसॉर्टमध्ये नाश्ता करून आंघोळ करून बाहेर पडू असा विचार मनात आला आमच्या. पण मग इतरांसारखंच शहाण्यासारखे वागलो तर मग काय मजा. व्ही हॅड टू ल्हिव अप टू अवर रेप्युटेशन. डोळ्यांसमोर भंडारदारयाचं मोहक नैसर्गिक सौंदर्य आम्हाला आणखी कुशीत घेण्यासाठी बोलवत होतच. आम्ही ठरवलं. अंघोळ नाश्ता बिश्ता सगळ नैसर्गिक पद्धतीने भंडारदारयाच्या खोल निसर्गात शिरून करायचं. आम्ही लगेच आमच्या बॅग पॅक्स घेतल्या आणि चेक आऊट करून निघालो.
भंडारदाराच्या दरीत उतरल्या उतरल्या पायथ्याशी पहुडलेल्या विस्तीर्ण आर्थर तलाव. त्या तलावाच्या काठाला, त्याच्या वळणांबरोबर वळणारा रस्ता आम्हाला भंडारदाराच्या दाट जंगलामध्ये घेऊन जात होता. थोडं आत शिरल्यावर उजव्या हाताला डोंगरातल्या धबधब्यातून तयार झालेले दोन तीन ओढे एकत्र येऊन त्यांचा एक मोठा ओढा तयार झाला होता जो रस्त्यावरून आतल्या बाजूला थोडया अंतरावर एका छोटयाश्या कठडयावरून धबधबा होऊन कोसळत होता. पुढे जाऊन त्याची एक छोटीशी नदी तयार झाली होती. आम्ही गाडी रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली लावली आणि त्या धबधब्याखाली अंघोळ करायला उतरलो.
धबधब्यात आमची धमाल मस्ती चालू असताना आमच्यातल्या एका मित्राला बाजूच्या खेडयातलं एक जोडपं थोडयाशा अंतरावर धबधब्याजवळ काहीतरी शोधताना दिसलं. तो त्यांना विचारायला गेला. तोपर्यंत आम्ही दोघं त्या धबधब्याची खूप मजा घेत होतो. त्या धबधब्याच्या आवाजात लांबच काही ऐकू येणं शक्यच नवहतं. धबधबा आपला प्रायव्हेट जॅकूझी आहे अशा गैरसमजात मी असताना, माझी नजर सहज वरच्या बाजूला गेली. माझा मित्र जो त्या जोडप्याला विचारायला गेला होता, तो जिवाच्या आकांताने ओरडून आम्हाला काहितरी सांगायचा प्रयत्त्न करत होता. आम्हा दोघांना काहीच काळत नवहत. धबधब्याखालून जेव्हा मी डोकं बाहेर काढलं तेंव्हा त्याच्या तोंडातून निघालेल्या शब्दांतला फक्त शेवटचा शब्द जो मला आणि माझ्या दुसऱ्या मित्राला ऐकू आला, तो म्हणजे "साप"! दुसऱ्या कुठल्या शब्दाची आम्हाला गरजच नाही भासली. आपल्या प्रायव्हेट जॅकूझीच बुकिंग संपल आहे असं आम्हाला त्याक्षणी कळलं. कुल्याला पाय लावून आम्ही डायरेक्ट पॅंट घालत रस्त्यावर प्रकट झालो. थोड्यावेळाने भानावर आल्यावर खूप हसलो आणि त्या प्रसंगाची खूप मजाही वाटली. उसनं धाडस करून “चला बघुया तरी कुठे आहे तो साप” असा बेतही मांडला. पण आता तिघांनाही छान आंघोळ झाल्यावर खूप भूक लागली होती.
आजुबाजूला छोटी छोटी खेडी होती. आम्ही गाडीत बसून कुठे काही खायला मिळेल का, शोधायला लागलो. एक दोन खानावळी दिसल्या पण त्यात फार काही रस नाही वाटला. आपण एके ठिकाणी जेव्हा प्रवास करतो, तो प्रवास त्या ठिकाणातल्या खास किंवा अस्सल जेवण पद्धतीची चव घेतल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तिकडच्या अस्सल खाद्य पदर्थांची चव घेतल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणची ओळख पटूच शकत नाही. ज्या पद्धतीने आपण एका व्यक्तीची ओळख पटवून घेण्यासाठी त्याच्याशी बोलतो, चर्चा करतो. तशाच पद्धतीने एका गावाची ओळख पटवून घेण्यासाठी त्या गावातलं अस्सल जेवण जेववाच लागतं.
आमच्या समोर एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं खेडं होतं. आम्ही गाडी लावली आणि त्या खेडयात चालत आत शिरलो. आम्हाला एक छोटीशी झोपडी दिसली, जी बऱ्यापैकी नीट नेटकी होती. त्या झोपडीच्या दारापाशी जाऊन मी विचारलं “कोणी आहे का ?”
एक चाळिशीतली बाई दारापाशी आली. आम्हा तिघा पुरुषांना बघुन थोडी हादरली. मग पदर डोक्यावर घेत थोडी सावध होऊन म्हणाली “कोन ?”
मी तिला सांगितलं “आम्ही मुंबईहून आलो आहोत. तुम्हाला त्रास नाही द्यायचाय, पण आम्हाला खूप भूक लागली आहे. आम्ही तुम्हाला ५०० रुपये देऊ. काही वेगळं किंवा खास करायची गरज नाही. तुम्ही जे घरात रोज बनवून जेवता आम्हाला अगदी तेच हवंय”.
५०० रुपये एकून त्या बिचाऱ्या गरीब बाईचे डोळेच फिरले. ती खूप खुष झाली. म्हणाली “पाउन तास लागल जेवन बनवाया”.
मी म्हणालो “काही हरकत नाही, तुम्ही तुमचा वेळ घ्या, आम्ही येऊ पाउण तासाने”. असं म्हणून आम्ही तिथून निघालो.
मला त्या बाईच्या धाडसाबद्दल खरच नवल आणि अभिमान वाटला. एका छोट्या खेड्यातली एक गरीब बाई जी आधी तीन पुरूषांना बघुन थोडी घाबरली होती. तिने ५०० रुपयांसाठी ह्या तीन अनोळखी पुरुषांवर विश्वास ठेवण्याचं धाडस पत्करलं. तिच्यासाठी ते ५०० रुपये म्हणजे एक महिन्याचा घराचा निम्मा किंवा संपूर्ण खर्चच असावा. परिस्थिती माणसाला धाडसी बनवतेच.
आम्ही पाऊण तास निसर्गाची टेहळणी करत घालवला. काही धबधबे, एक नदी धुक्याच्या थरात लपलेली, रस्त्याच्या कडेला पसरून ठेवलेले गवताचे हिरवे गालिचे, अशा वातावरणात आणखी मंत्रमुग्ध होऊन आम्ही पाऊण तासानंतर त्या बाईच्या झोपडीपाशी पुन्हा पोहोचलो.
अळूची भाजी, तुरीची डाळ, त्यांच्याच शेतातला भात आणि चपाती. असा साधा अस्सल बेत आमच्यासाठी त्या बाईने मांडला होता. आम्ही त्या जेवणावर तुटून पडलो. प्रत्येक घासात त्या गावाची अस्सल चव, त्या घराची परिस्थिती, त्या घरातल्या माणसांचा साधेपणा, तिला मदत केल्याने तिला झालेला आनंद आणि त्यातून उमटणार प्रेम सतत भासवत आणि डोकावत होत.
आम्ही जेवत असताना त्या बाईच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थपणा जाणवत होता. मी जेंव्हा तिला कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, "माज्या नवऱ्याला कळलं तर मारनार मला". आम्हाला काय बोलावं काहीच कळेना. आमचं जेवण संपणारच होतं इतक्यात ती घाई घाई ने बाहेर गेली. काही मिनिटातच ती धावत आत आली. ती भीतीने थरथरत होती. तिचा नवरा आला होता. कुठल्याही क्षणी तो घरात येणार होता.
आम्ही ताटावरून उठणारच होतो जेंव्हा तिचा नवरा घरात शिरला. त्या बाईला आता घाम फ़ुटला होता. आम्हा तिघांना बघुन तो ही चपापला. त्यांच्या बायकोने लगेच आम्ही तिला दिलेली ५०० ची नोट त्याच्यासमोर धरली आणि त्याला सगळं थरथरत्या आवाजात सांगायला लागली. नवरा खूप तापलेला, पण आमच्यासमोर राग लपवण्याचा प्रयत्न करत होता.
मी लगेच उठून तिच्या नवऱ्याला सगळं नीट समजावलं. माझी ओळख पटवून दिली. माझं बोलण ऐकून तो थोडा शांत झाला, आणि कसंनुसं हसला.
आम्ही त्यांचे इतक सुंदर जेवण दिल्याबद्ल आणि पाहुणचार केल्याबद्दल आभार मानले आणि निघालो.
आम्ही गेल्यावर त्या नवऱ्याने तिच्यावर हात उगारला असेल का.. ? का ५०० रुपये हुशारीने कमावल्याबद्दल आनंद व्यक्तकेला असेल.. ? का तिला मारझोड करून राग शांत झाल्यावर ५०० रुपयांकडे बघून मनातल्या मनात सुखावला असेल.. ?
पण त्या बाईला सलाम !! नवऱ्याची वृत्ती माहित असुनही, घराच्या परिस्थितीकडे बघून तिने हे धाडस केलं. परिणाम तिला माहित होता. कदाचित तिला सवयही झाली असावी.
पण त्या नवऱ्याने तिला मारझोड करायला नको.... रागवावं हवं तर तिच्यावर, पण मारझोड करायला नको. तसं बघायला गेलं तर त्याचा रागपण बरोबर आहे. तीने अनोळखी पुरुषांना एका खेड्यातली बाई घरात कोणीही नसताना ५०० रुपयांसाठी घरात घेते आणि जेवायला वाढते. आम्ही चांगल्या घरातील मुलं होतो म्हणून.... पण दुसरं कोण असतं तर..? पण हे त्या गृहिणीला नक्कीच कळलं असणार. म्हणूनच तर तिने आम्हाला जेवायला वाढलं.
पण काहीही असो कुठल्याही पुरुषांनी स्वतःच्या बायकोला कधीही मारझोड करू नये.... त्यातून तो फक्त त्याचा पुरुषार्थ गमावून बसतो.
ती गृहिणी हुशार होती, धीट होती.
ह्या अशा सुंदर निसर्गाच्या कुशीत राहणारी माणसं एवढं कठीण आयुष्य का जगतात? यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर सगळ्या निसर्गाचें क्रॉंक्रिट जंगल होईल आणि सगळ्या ह्रुदयातील निसर्ग नष्ट होतील.
आम्ही तिघे सुन्न होऊन परतीचा प्रवास साधत होतो. कल्याण येईपर्यंत कोणीही एक शब्द उच्चारलेला मला आठवत नाहीए. त्या परतीच्या प्रवासात आमच्या स्वतःच्या ह्रुदयातल्या निसर्गाचा शोध सुरु झाला होता. जो आजही सुरु आहे आणि आयुष्यभर चालतच राहणार.
- आदिनाथ कोठारे