गौरी नलावडे सांगते, नाटक करणे आव्हानात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 17:26 IST2017-01-27T11:56:25+5:302017-01-27T17:26:25+5:30

बेनझीर जमादार स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून अभिनेत्री गौरी नलावडे ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे. यानंतर ती कान्हा या चित्रपटातदेखील ...

Gauri Nalawe tells that drama is challenging | गौरी नलावडे सांगते, नाटक करणे आव्हानात्मक

गौरी नलावडे सांगते, नाटक करणे आव्हानात्मक

बेनझीर जमादार


स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून अभिनेत्री गौरी नलावडे ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे. यानंतर ती कान्हा या चित्रपटातदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्रेक्षकांची हीच लाडकी अभिनेत्री आता आपल्या अभिनयाची चुणूक रंगभूमीवर सादर करताना दिसत आहेत. हे तिचे पहिलेच नाटक आहे. त्यामुळे रंगभूमीविषयी काय अनुभव आहे याविषयी तिने लोकमत सीएनएक्सशी साधलेला संवाद.

१. मालिका, चित्रपटानंतर तूला  नाटक का करावे वाटले?
- चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना, एक दोन नाटकांची आॅफर आली होती. ँपण मी नाटक करण्यास तयार नव्हते. मात्र काहीतरी नवीन करायचे म्हणून दिग्दर्शकाला नाटकाची स्क्रीप्ट पाठविण्यास सांगतिली. खरं सांगू का, ती स्क्रीप्ट वाचल्यावर त्या विषयाच्या प्रेमातच पडले. यानंतर लगेच मी नाटक करण्यास होकार दिला. 

२. पहिल्या नाटकाचा अनुभव कसा होता?
- खरचं माझ्या पहिल्या नाटकाचा अनुभव खूपच छान होता. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे अधिक आनंद होत आहे. आमच्या नाटकाची टीमदेखील खूप छान आहे. या सर्वाकडून खूप काही शिकण्यास मिळत आहे. तसेच काहीतरी वेगळं आणि नवीन काही करण्यास मिळाले. त्याचबरोबर लाइव्ह परफॉर्मन्स मी कधीच केले नाही. त्यामुळे मला नाटक हे करायचे होतेच.

३. नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये तूला जास्त काय आव्हानात्मक वाटले?
- मालिका आणि चित्रपटांपेक्षा मला नाटक करणे हेच जास्त आव्हानात्मक वाटले. कारण मालिका आणि चित्रपटांमध्ये रिटेक घेता येते. मात्र नाटक करताना रिटेक नावाचा प्रकारच नसतो. तसेच रंगभूमीवर मिळणारा प्रतिसाद हा तुम्हाला थेट मिळत असतो. पहिल्यादांच रंगभूमीवर प्रेक्षकांसमोर लाइव्ह परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली. तसेच नाटक करणे हे माझ्यासाठी चॅलेंज होतं.

४. तू नाटक, मालिका आणि चित्रपट केले आहेत, त्यामुळे या तिन्ही माध्यमांचा प्रेक्षकवर्गाविषयी काय सांगेल?
- जेव्हा मालिका करत असतो, त्यावेळी प्रेक्षक हे खूपच त्या भूमिकेशी भावनिक कनेक्ट असतात. ते स्वत: ला त्या भूमिकेत पाहत असतात. त्यामुळे ही कलाकारासाठी मोठी जबाबदारी असते. तर चित्रपट ज्यावेळी करतो, त्यावेळी प्रेक्षकवर्गाचे प्रेम कळते. कारण ते आपला पैसा खर्च करून कलाकारांचा अभिनय पाहयला येत असतात. तसेच नाटक म्हणाल तर, प्रत्यक्ष प्रेक्षकवर्गच असतो. त्यावेळी स्वत: ते समोर येऊन आपलं प्रेम व्यक्त करतात.

५. स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून तू घराघरात पोहचली, त्यामुळे प्रेक्षक पुन्हा तूला टीव्हीवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत याविषयी काय सांगेल?
- छोटया पडदयावर पुन्हा मला चांगली संधी मिळाली तर नक्कीच मी छोटया पडदयावर काम करेन. मी स्वत:देखील काम करण्यास उत्सुक आहे. तसेच आता सध्या एका चित्रपटाविषयची तयारी चालू आहे. वेळ आली तर नक्कीच सांगेन. 

Web Title: Gauri Nalawe tells that drama is challenging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.