अन्नू मलिक आसूध या मराठी चित्रपटासाठी देणार संगीत... या कारणामुळे घेतला नाही एकही रुपया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 16:33 IST2018-01-01T11:03:33+5:302018-01-01T16:33:44+5:30
अन्नू मलिकने अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट गाणी दिली आहेत. त्याचे उंची है बिल्डींग, गरम चाय की प्याली, ...
.jpg)
अन्नू मलिक आसूध या मराठी चित्रपटासाठी देणार संगीत... या कारणामुळे घेतला नाही एकही रुपया
अ ्नू मलिकने अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट गाणी दिली आहेत. त्याचे उंची है बिल्डींग, गरम चाय की प्याली, ये काली काली आँखे यांसारखी गाणी तर रसिकांनी डोक्यावर घेतली आहेत. त्याने आजवर अनेक गाण्यांना संगीत दिले असून अनेक गाणी देखील गायली आहेत. बॉलिवूडमधील आघाडीचा संगीतकार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. आजवर त्याला त्याच्या संगीतासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध संगीतकार आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहे. अन्नू आता मराठीतील एका चित्रपटाला संगीत देणार असून सध्या तो या चित्रपटावर काम करत आहे आणि विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अन्नूने एकही रुपया घेतलेला नाहीये.
आसूध हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या अतिशय गंभीर प्रश्न आहे. यावर या चित्रपटाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या चित्रपटातील सगळ्या गाण्यांना अन्नू संगीत देत आहे. पण या चित्रपटासाठी अन्नूने एक रुपया देखील घेतलेला नाही. या चित्रपटासाठी पैसे न घेण्यामागे एक विशेष कारण आहे. याविषयी अन्नू मलिक सांगतो, हा चित्रपट शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित असल्याने या चित्रपटासाठी मी एकही पैसा घेतलेला नाही. आज शेतकरी सगळ्यांसाठी धान्य पिकवत आहे. पण शेतकऱ्याला स्वतःला खायला काहीही नाहीये. त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आज भारतातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यांना त्यांचे पोट भरण्यासाठी विविध शहरांमध्ये फिरावे लागत आहे. त्यामुळे आज प्रत्येकाने पुढे येऊन त्यांना मदत करण्याची नितांत गरज आहे. मला शेतकऱ्यांना मदत करण्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून इच्छा होती आणि त्यामुळे मी माझ्याकडून त्यांच्या चित्रपटाला हातभार लावत आहे.
अन्नूच्या हिंदी गाण्यांप्रमाणे रसिक त्याची मराठी गाणी देखील डोक्यावर घेतली अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.
आसूध हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सध्या अतिशय गंभीर प्रश्न आहे. यावर या चित्रपटाद्वारे प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या चित्रपटातील सगळ्या गाण्यांना अन्नू संगीत देत आहे. पण या चित्रपटासाठी अन्नूने एक रुपया देखील घेतलेला नाही. या चित्रपटासाठी पैसे न घेण्यामागे एक विशेष कारण आहे. याविषयी अन्नू मलिक सांगतो, हा चित्रपट शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित असल्याने या चित्रपटासाठी मी एकही पैसा घेतलेला नाही. आज शेतकरी सगळ्यांसाठी धान्य पिकवत आहे. पण शेतकऱ्याला स्वतःला खायला काहीही नाहीये. त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आज भारतातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्यांना त्यांचे पोट भरण्यासाठी विविध शहरांमध्ये फिरावे लागत आहे. त्यामुळे आज प्रत्येकाने पुढे येऊन त्यांना मदत करण्याची नितांत गरज आहे. मला शेतकऱ्यांना मदत करण्याची गेल्या कित्येक महिन्यांपासून इच्छा होती आणि त्यामुळे मी माझ्याकडून त्यांच्या चित्रपटाला हातभार लावत आहे.
अन्नूच्या हिंदी गाण्यांप्रमाणे रसिक त्याची मराठी गाणी देखील डोक्यावर घेतली अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.