जयंती विशेष : गझल सम्राट जगजीत सिंहबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 11:19 IST2017-02-08T05:49:58+5:302017-02-08T11:19:58+5:30
गझल किंग जगजीत सिंह आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या अनेक गझलांच्या रूपात प्रत्येक चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. आज (८ फेबु्रवारी) जगतीत सिंह यांची जयंती. आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्याबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी....

जयंती विशेष : गझल सम्राट जगजीत सिंहबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी...
ग ल किंग जगजीत सिंह आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या अनेक गझलांच्या रूपात प्रत्येक चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. आज (८ फेबु्रवारी) जगतीत सिंह यांची जयंती. आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्याबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी....
जगजीत सिंह यांचा जन्म ८ फेबु्रवारी १९४१ रोजी राजस्थानच्या बिकानेर येथे झाला होता. त्यांचे जन्मनाव जगजीवन सिंह असे होते. जगजीत यांनी इंजिनिअर बनावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जगजीत यांनी आॅल इंडिया रेडिओ, जालंधरमध्ये गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून काम करणे सुरु केले. याचदरम्यान गुरुद्वारात पंडित छगनलाल मिश्रा आणि उस्ताद जमाल खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली.
![]()
मार्च १९६५ मध्ये जगजीत सिंह कुणालाही न सांगता मुंबईला पळून गेलेत. येथे त्यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. पण याच मुंबईत त्यांना त्यांचे प्रेम मिळाले. येथे चित्रा दत्ता या बंगाली मुलीसोबत त्यांची ओळख झाली. १९६९ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांचा विवेक नावाचा एक मुलगाही आहे.
१९७६ मध्ये जगजीत आणि चित्रा यांचा ‘दी अनफर्गेटेबल’ हा अल्बम रिलीज झाला. हा अल्बम प्रचंड गाजला. यामुळे जगजीत व चित्रा हे कपल स्टार कपल झाले. या अल्बमचे ‘बात निकलेगी’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले.
जगजीत व चित्रा सिंह यांनी एकत्र अनेक कॉन्सर्ट केलेत. १९८० मध्ये आलेला ‘वो कागज की कश्ती’ हा या दोघांचा अल्बम बेस्ट सेलिंग अल्बम बनला. याच काळात जगजीत सिंह यांना गझल किंग म्हणून नवी ओळख मिळाली. याच काळात जगजीत यांनी चित्रपटांमध्येही अनेक गजला गायल्या. ‘प्रेम गीत’, ‘अर्थ’, ‘जिस्म’,‘तुम बिन’ या चित्रपटात त्यांनी गायले.
जगजीत सिंह यांचा मुलगा विवेक १८ वर्षांचा असताना एका सडक दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. तरूण मुलाच्या मृत्यूचा धक्का चित्रा यांना सहन करता आला नाही. यानंतर त्यांनी गाणे सोडले ते कायमचे.
२००३ मध्ये जगजीत यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन २०११मध्ये जगजीत सिंह हे गुलाम अली यांच्यासोबत युकेमध्ये परफॉर्म करणार होते. मात्र cerebral hemorrhage मुळे २३ सप्टेंबर २०११ रोजी त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली आणि ते कोमात गेलेत. १० आक्टोबर २०११ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जगजीत सिंह यांचा जन्म ८ फेबु्रवारी १९४१ रोजी राजस्थानच्या बिकानेर येथे झाला होता. त्यांचे जन्मनाव जगजीवन सिंह असे होते. जगजीत यांनी इंजिनिअर बनावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जगजीत यांनी आॅल इंडिया रेडिओ, जालंधरमध्ये गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून काम करणे सुरु केले. याचदरम्यान गुरुद्वारात पंडित छगनलाल मिश्रा आणि उस्ताद जमाल खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली.
मार्च १९६५ मध्ये जगजीत सिंह कुणालाही न सांगता मुंबईला पळून गेलेत. येथे त्यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. पण याच मुंबईत त्यांना त्यांचे प्रेम मिळाले. येथे चित्रा दत्ता या बंगाली मुलीसोबत त्यांची ओळख झाली. १९६९ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांचा विवेक नावाचा एक मुलगाही आहे.
१९७६ मध्ये जगजीत आणि चित्रा यांचा ‘दी अनफर्गेटेबल’ हा अल्बम रिलीज झाला. हा अल्बम प्रचंड गाजला. यामुळे जगजीत व चित्रा हे कपल स्टार कपल झाले. या अल्बमचे ‘बात निकलेगी’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले.
जगजीत व चित्रा सिंह यांनी एकत्र अनेक कॉन्सर्ट केलेत. १९८० मध्ये आलेला ‘वो कागज की कश्ती’ हा या दोघांचा अल्बम बेस्ट सेलिंग अल्बम बनला. याच काळात जगजीत सिंह यांना गझल किंग म्हणून नवी ओळख मिळाली. याच काळात जगजीत यांनी चित्रपटांमध्येही अनेक गजला गायल्या. ‘प्रेम गीत’, ‘अर्थ’, ‘जिस्म’,‘तुम बिन’ या चित्रपटात त्यांनी गायले.
जगजीत सिंह यांचा मुलगा विवेक १८ वर्षांचा असताना एका सडक दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. तरूण मुलाच्या मृत्यूचा धक्का चित्रा यांना सहन करता आला नाही. यानंतर त्यांनी गाणे सोडले ते कायमचे.
२००३ मध्ये जगजीत यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन २०११मध्ये जगजीत सिंह हे गुलाम अली यांच्यासोबत युकेमध्ये परफॉर्म करणार होते. मात्र cerebral hemorrhage मुळे २३ सप्टेंबर २०११ रोजी त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली आणि ते कोमात गेलेत. १० आक्टोबर २०११ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.