या अभिनेत्यासोबतही रेखा यांचे जुळले सूत,सुखी संसार सुरु होण्यापूर्वीच धरावा लागला होता बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 03:33 PM2021-06-19T15:33:49+5:302021-06-19T15:34:33+5:30

सिनेसृष्टीतील ज्या ज्या नायकाशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं तो प्रत्येक नायक रेखा यांचं मन दुखावून त्यांच्यापासून दूर गेला.

Due to this Reason Kiran kumar also left Rekha and this small love story of Rekha Also Ended | या अभिनेत्यासोबतही रेखा यांचे जुळले सूत,सुखी संसार सुरु होण्यापूर्वीच धरावा लागला होता बाहेरचा रस्ता

या अभिनेत्यासोबतही रेखा यांचे जुळले सूत,सुखी संसार सुरु होण्यापूर्वीच धरावा लागला होता बाहेरचा रस्ता

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलीवुड दिवा रेखा यांच्या अभिनयावर सारेच फिदा आहेत. त्यांच्या अभिनयासह त्यांचं घायाळ करणारं सौंदर्य याची जादू आजही रसिकांवर कायम आहे. मग हीच जादू त्यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या सहकलाकारांवर झाली नसती तरच नवल. रेखा यांच्या सौंदर्यावर त्यांचे अनेक सहकलाकार फिदा झाले. त्यामुळेच कित्येक कलाकारांशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं.  सावन भादो या पहिल्याच सिनेमातून रेखा चर्चेत आल्या. हा सिनेमा हिट ठरला. या सिनेमापासू सुरु झालेल्या त्यांच्या अफेअरच्या चर्चा सतत चर्चेत राहायच्या. सिनेसृष्टीतील ज्या ज्या नायकाशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं तो प्रत्येक नायक रेखा यांचं मन दुखावून त्यांच्यापासून दूर गेला.

अभिनेता किरण कुमारसुद्धा रेखा यांच्या सौंदर्यावर फिदा होते. रेखा यांच्याशी गुपचुप लग्न करुन त्यांना घरी घेऊन येण्याची तयारी किरण कुमार यांनी केली होती. लग्न करुन नववधू बनलेली रेखा किरण कुमार यांच्या घरी पोहचली. त्यावेळी रुपेरी पडद्यावर महिलांवर अत्याचार करणारे  खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेता आणि किरण कुमार यांचे वडील जीवन यांनी रेखाला आपली सून मानण्यास आणि गृहप्रवेश देण्यास नकार दिला.

जीवन कुमार यांना रेखा सून म्हणून मान्य नव्हती. नववधूच्या रुपात आलेल्या रेखा यांना घराची एक पायरीही चढता आली नव्हती असं त्यावेळी बोललं गेलं. किरण कुमार यांनीही प्रेमाऐवजी आपल्या वडिलांना निवडलं होतं.यामुळेच रेखा यांच्या आयुष्यातून किरण कुमारही निघून गेले.


रेखा यांची जीवनकहानी पुढे अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी जोडली गेली. 'दो अनजाने' हा या जोडीचा पहिला सिनेमा. या सिनेमापासूनच अमिताभ-रेखा जोडी रसिकांना भावली. यानंतर विविध सिनेमातून अमिताभ-रेखा जोडीनं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं. दोघांच्या अनोख्या केमिस्ट्रीमुळे आणि सिनेमाच्या यशामुळे रिअल लाइफमध्ये दोघं आणखी जवळ आले.अमिताभ आणि रेखा लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या. मात्र तसं काहीच घडलं नाही. त्याच काळात अमिताभ-रेखा-जया यांच्या प्रत्यक्ष जीवनात सुरु असलेल्या उलथापालथीचं चित्रण करणारा 'सिलसिला' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला. 

यांत अमिताभ-रेखा यांचं अव्यक्त प्रेम, त्यांची केमिस्ट्री सिनेमातील विविध सीन्स आणि गाण्यांमधून रसिकांना पाहायला मिळाली. त्यानंतर अमिताभ-रेखा एका सिनेमात कधीच झळकले नाही. विविध कार्यक्रमांमध्ये दोघंही एकमेंकांपासून खूप लांब लांब बसल्याचं पाहायला मिळतं. मात्र कॅमे-याच्या नजरा त्या दोघांवरच असतात. एखाद्या क्षणी दोघं चुकून समोरा समोर आले तर त्याचीही बातमी बनते. त्यामुळेच अमिताभ आणि रेखा यांची लव्हस्टोरी आजही रसिकांसाठी फार मोठं कोडं आहे. 

Web Title: Due to this Reason Kiran kumar also left Rekha and this small love story of Rekha Also Ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.