6283_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 15:30 IST2016-05-21T10:00:24+5:302016-05-21T15:30:24+5:30

युद्ध हे नेहमीच मानवी इतिहासाचे अंतरंग राहिले आहे. रक्ताळलेल्या जगाने नवी साम्राज्ये, नवे धर्म आणि वैयक्तिक अपेक्षांना बदलविले आहे. केवळ हेच नव्हे तर सामाजिक, राजकीय दिशाही या लढायांनी बदलविल्या आहेत. भारतीय इतिहास देखील यात मागे नाही. अशा अनेक लढाया झाल्या यामुळे भारतीय इतिहास बदलला गेला. अशाच लढायांची माहिती या ठिकाणी देत आहोत. भारतामध्ये शतकानुशतके विविध साम्राज्ये राहिली आहेत. चंद्रगुप्त मौर्य, अशोक, समुद्रगुप्त, हर्षवर्धन, पृथ्वीराज चौहान आणि अकबर यांनी बाहेरुन झालेले आक्रमण थोपविण्यासाठी प्रयत्न केले.

6283_article | 6283_article

6283_article

द्ध हे नेहमीच मानवी इतिहासाचे अंतरंग राहिले आहे. रक्ताळलेल्या जगाने नवी साम्राज्ये, नवे धर्म आणि वैयक्तिक अपेक्षांना बदलविले आहे. केवळ हेच नव्हे तर सामाजिक, राजकीय दिशाही या लढायांनी बदलविल्या आहेत. भारतीय इतिहास देखील यात मागे नाही. अशा अनेक लढाया झाल्या यामुळे भारतीय इतिहास बदलला गेला. अशाच लढायांची माहिती या ठिकाणी देत आहोत. भारतामध्ये शतकानुशतके विविध साम्राज्ये राहिली आहेत. चंद्रगुप्त मौर्य, अशोक, समुद्रगुप्त, हर्षवर्धन, पृथ्वीराज चौहान आणि अकबर यांनी बाहेरुन झालेले आक्रमण थोपविण्यासाठी प्रयत्न केले.
११९२ साली दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहान आणि घोरचा सुलतान मोहम्मद घोरी यांच्यात लढाई झाली. भारताला तीन वेळा लुटलेल्या घोरीने चौहानना आव्हान दिले. ११९१ साली पृथ्वीराज चौहाननी त्याचा पराभव केला. अफगाणिस्तानला परत गेलेल्या घोरीने ११९२ साली प्रचंड सैन्यासह आक्रमण करीत पुन्हा आव्हान दिले. राजपूत सैन्यात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे तसेच इतर राजपूत राजांकडून मदत न मिळाल्याने पृथ्वीराज चौहान पराभूत झाले. त्यानंतर भारतात इस्लामचा उदय झाला. घोरीने साम्राज्य उभे केले. कतुब-उल-दिन ऐबकची नियुक्ती केली. पुढे त्यानेच कुतुब मिनार उभारला. त्यानंतर दिल्लीवर सल्तनत आली.

Web Title: 6283_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.