Join us
Daily Top 2Weekly Top 5

२००७ सारखाच अजब योगायोग; भारताने तेव्हाही पाकिस्तानला हरविलेले, नंतर सुपर ८ मध्ये पहिला सामना हरलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:30 IST

Open in App
1 / 9

टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर आकडेवारी आणि योगायोग अनेकदा मोठी भूमिका बजावतात.

2 / 9

सध्या भारतीय संघाच्या बाबतीत असाच एक अजब योगायोग जुळून येत आहे, जो २००७ च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाची आठवण करून देतो.

3 / 9

२००७ मध्ये जेव्हा भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता, तेव्हाही काही घटना नेमक्या अशाच घडल्या होत्या.

4 / 9

१. पाकिस्तानवर विजय: २००७ मध्ये भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. २०२६ मध्येही भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला धूळ चारली आहे.

5 / 9

२. सुपर-८ मधील पहिला पराभव: २००७ मध्ये भारताने सुपर-८ चा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध गमावला होता. २०२६ मध्ये भारताला सुपर-८ च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

6 / 9

३. पुनरागमन: २००७ मध्ये पहिल्या पराभवानंतर भारताने जबरदस्त पुनरागमन करत जेतेपद पटकावले होते. आता २०२६ मध्येही तशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

7 / 9

भारताचा सध्याचा नेट रन रेट उणे ३.८० (-३.८०) आहे. अशा परिस्थितीत सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला खालील गोष्टींची गरज आहे:

8 / 9

मोठे विजय: २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वे आणि १ मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध भारताला केवळ जिंकावेच लागणार नाही, तर विजयाचे अंतर मोठे ठेवावे लागेल.

9 / 9

नशिबाची साथ: जर दक्षिण आफ्रिकेने आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर भारताचा रस्ता सोपा होईल. मात्र, जर आफ्रिका एखादा सामना हरली, तर प्रकरण पुन्हा रन रेटवर येईल.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६टी-20 क्रिकेटमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघआयसीसी