Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ: संजू सॅमसनची २६वी धाव टीम इंडियाला जिंकवून देणार World Cup! कसं काय.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:06 IST

Open in App
1 / 9

भारतीय संघ रविवारी ८ मार्चला न्यूझीलंड विरूद्ध टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगणार आहे.

2 / 9

अंतिम सामन्यापूर्वी भारतीय सलामीवीर संजू सॅमसनची तुफान चर्चा रंगली आहे. आधीच्या दोन सामन्यात संजूने केलेल्या खेळीमुळेच भारताने फायनल गाठली.

3 / 9

'करो वा मरो'च्या लढतीत त्याने विंडीजविरूद्ध तुफानी नाबाद ९७ धावा केल्या. एका बाजूने खिंड लढवत विजयी फटका मारून त्याने भारताला सेमीफायनल गाठून दिली.

4 / 9

सेमीफायनलमध्येही संजू सॅमसनने तडाखेबंद फलंदाजी करत ४२ चेंडूत ८९ धावा कुटल्या. त्यामुळेच भारताने २५३पर्यंत धडक मारली आणि सामना जिंकला.

5 / 9

आता त्याने फायनलमध्येही मोठी खेळी करावी अशी अपेक्षा आहे. त्यातही एक रंजक बाब म्हणजे संजूने २६वी धाव काढताच भारत पुन्हा विश्वविजेता बनू शकतो.

6 / 9

संजू सॅमसनने आतापर्यंत टीम इंडियाकडून ६१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याच्या ५३ डावांमध्ये तीन शतकांसह १,३१० धावा आहेत.

7 / 9

या सामन्यांपैकी १६ सामन्यांमध्ये संजू सॅमसनने २५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा काढल्या आहेत आणि त्या सर्व १६ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.

8 / 9

त्यामुळे आकडेवारी पाहिल्यास हे स्पष्ट आहे की संजू सॅमसनने टी२० सामन्यात २६ धावांचा टप्पा गाठला की भारताच्या विजयाची शक्यता थेट १०० टक्के आहे.

9 / 9

त्यामुळेच अंतिम सामन्यात संजू सॅमसनकडून २६ किंवा त्याहून अधिक धावा काढण्याची अपेक्षा केली जाईल आणि टीम इंडियाचा विजय निश्चित होईल.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६संजू सॅमसनभारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ