नॅशनल क्रश स्मृती मानधना महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग २०२५ च्या पहिल्या हंगामात रत्नागिरी जेट्स संघाकडून मैदानात उतरली होती. स्मृती मानधनासह स्टार गर्ल्सचा भरणा असलेल्या या संघाचा पहिल्या हंगामातील प्रवास हा साखळी फेरीतच संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्याच्या मैदानात ११ जून रोजी रंगलेल्या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाला स्पर्धेत टिकून राहण्याची शेवटची संधी होती. पण हा सामना गमावला अन् संघ स्पर्धेतून आउट झाला. संघाचा प्रवास संपुष्टात आल्यावर रत्नागिरी जेट्स फ्रँचायझी संघानं आपल्या अधिकृत अकाउंटवरून स्मृती मानधनासह संघातील अन्य खेळांडूचा एक खास फोटो शेअर करत पहिला हंगाम देवाला अशी पोस्ट शेअर केलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिवाली शिंदेची फिफ्टी, कॅप्टन स्मृती मात्र स्वस्तात फिरली माघारी
पुणे वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त ११२ धावा केल्या होत्या. शिवाली शिंदेनं ४९ चेंडूत केलेल्या ५८ धावांच्या खेळीशिवाय अन्य कोणत्याही बॅटरला मोठी खेळी करता आली नाही. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मृती मानधना हिने ७ चेंडूचा सामना करताना फक्त ३ धावा केल्या. पुणे वॉरियर्स संघाकडून एकाही बॅटरनं अर्धशतक झळकावले नाही. पण १८. २ षटकातच त्यांनी हा सामना खिशात घातला.
ऑस्ट्रेलियात रोहित-विराटच्या निरोप समारंभाची तयारी; पण एवढी घाई का? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
स्मृतीच्या भात्यातून ५ सामन्यात २ अर्धशतके, पण...
रायगड रॉयल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्मृती मानधना हिने सलामीला बॅटिंग करताना २६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३५ धावांची खेळी केली होती. सोलापूर स्मॅशर्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात स्मृती मानधना हिने ४ चेंडूत फक्त एका धावेवर बाद झाल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेतील पुणे वॉरियर्स विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात स्मृती मानधनाच्या भात्यातून ३४ चेंडूत ६१ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. त्यानंतर चौथ्या सामन्यात तिने सोलापूर स्मॅशर्स विरुद्ध २९ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. पाचव्या सामन्यात पुन्हा तिच्यावर एकेरी धावसंख्येवर बाद होण्याची वेळ आली. रत्नागिरी जेट्सच्या संघाने पहिला सामना अगदी दाबात जिंकला होता. पण ज्या सामन्यात स्मृतीनं दोन अर्धशतक झळकावली त्यासह पुढच्या चारही सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला.