"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?

वनडे मालिका विजयानंतर  गंभीरनं काढला मनातला राग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 00:54 IST2025-12-07T00:48:47+5:302025-12-07T00:54:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA Gautam Gambhir Attacks Delh Capitals Owner For Split Coaching Demand He Says Stay In Your Domain After Rohit Sharma And Virat Kohli Won The Series | "तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?

"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?

IND vs SA, Gautam Gambhir After India Won The ODI Series  : कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने अखेर वनडे मालिका जिंकत दक्षिण आफ्रिकेचा हिशोब चुकता केला.  भारतीय संघाच्या मालिका विजयात माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज सर्वात आघाडीवर राहिले.  कोच गौतम गंभीरसाठी हा क्षण आणखी खास होता. कारण त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने जिंकलेली ही पहिली वनडे द्विपक्षीय मालिका ठरली. या विजयानंतर गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेत कसोटी मालिकेनंतर जे काही घडलं त्यावर नाराजी व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वनडे मालिका विजयानंतर  गंभीरनं काढला मनातला राग

वनडे मालिका जिंकल्यावर पत्रकारपरिषदेत गौतम गंभीरला कसोटी मालिकेतील पराभवनानंतर झालेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. याप्रश्नाचं उत्तर देताना गंभीरनं आपल्या मनातील राग काढला. ज्या लोकांना काही कळतं नाही असे लोक आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या गोष्टावर बोलू लागले आहेत, अशा आशयाच्या शब्दांत त्याने कसोटी मालिकेनंतर टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. भारताच्या कसोटीतील पराभवानंतर एकालाही शुभमन गिलच्या दुखापतीचा मुद्दा पराभवामागचे कारण असू शकतो, असे वाटले नाही, याचे आश्चर्य वाटले, असेही गंभीरने म्हटले आहे. 

'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका

वनडे मालिका विजयानंतर गंभीरचा कसोटीनंतर ट्रोल करणाऱ्यांना टोला, म्हणाला...

कसोटीतील पराभवानंतर झालेल्या टीकेसंदर्भातील प्रश्नावर गौतम गंभीर म्हणाला की, लोक आणि प्रसारमाध्यमांतून खूप काही बोलले गेले. पण आम्ही पहिला सामना फक्त ३० धावांनी गमावला होता. त्यावेळी संघातील सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार फलंदाजी करु शकला नाही. या गोष्टीचा कुणी साधा उल्लेखही केला नाही, याचे आश्चर्य वाटते. एका आयपीएल फ्रेंचायजी मालकाने कोचिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला. त्यांनी तर क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात वेगळा प्रशिक्षक असायला पाहिजे असा सल्ला देऊन टाकला. ज्यांना काहीच कळत नाही, असे लोक मर्यादा ओलांडून वाट्टेल ते बोलतात. आम्ही मर्यादा पाळतो, लोकांनी आपली मर्यादा ओळखावी, अशा शब्दांत गंभीर यांनी टीकारांना टोला हाणला आहे.

तो IPL मालक कोण? 

घरच्या मैदानातील कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियावर चांगलीच टीका झाली. अनेकांनी कोच गौतम गंभीरवर निशाणा साधला. दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी भारतीय कसोटीत स्प्लिट कोचिंगचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशी पोस्ट एक्स अकाउंटवरून शेर केली होती.  हाच मुद्दा उकरून काढत गंभीरनं त्यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. 
 

Web Title : ODI श्रृंखला जीतने के बाद गौतम गंभीर का गुस्सा: 'अपनी सीमाएँ जानो!'

Web Summary : भारत की वनडे श्रृंखला जीत के बाद, कोच गौतम गंभीर ने टेस्ट श्रृंखला हार पर टिप्पणी करने वालों की आलोचना की। उन्होंने शुभमन गिल जैसे खिलाड़ियों के लिए समर्थन की कमी को उजागर किया और एक आईपीएल मालिक को उनकी कोचिंग पर सवाल उठाने के लिए फटकार लगाई, आलोचकों को अपनी सीमा में रहने की सलाह दी।

Web Title : Gautam Gambhir's outburst after ODI series win: 'Know your limits!'

Web Summary : After India's ODI series win, coach Gautam Gambhir criticized those who commented on the Test series loss. He highlighted the lack of support for players like Shubman Gill and called out an IPL owner for questioning his coaching, advising critics to stay within their limits.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.