लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पावसानं वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे. आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत पावसामुळे मागील पाच दिवसांत चार सामने रद्द करावे लागले आहेत. गुरुवारी भारतीय संघालाही याचा फटका बसला. नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिजवर न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना समान एका गुणावर समाधान मानावे लागले. पावसाच्या या फटकेबाजीपासून वाचण्यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं आयसीसीला एक सल्ला दिला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यावर अल्प कालावधीत सामना कसा खेळवता येईल, याचा उपाय सुचवला आहे.
सामना रद्द झाला, पण भारताला मिळाली 'ही' गोड बातमीभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात अखेर पावसानेच बाजी मारली. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे अखेर सामना रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पण सामना रद्द झाला असला तरी भारतासाठी एक गोड बातमी मिळाली आहे. ही बातमी नेमकी कोणती ते जाणून घ्या... या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ सहा गुणांसह अव्वल स्थानावर होता. कारण न्यूझीलंडने यापूर्वी श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सहा गुणांसह न्यूझीलंड अव्वल स्थानावर होता. हा सामना न्यूझीलंडने जिंकला असता तर त्यांचे अव्वल स्थान कायम राहिले असते. पण त्यांनी जर मोठ्या फरकाने सामना गमावला असता तर त्यांचे अव्वल स्थान धोक्यात आले असते.