India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्मानं पंचांना दिल्या शिव्या? होऊ शकते मोठी कारवाई

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20त रोहित शर्मानं तिसऱ्या पंचांना शिव्या घातल्याचं चित्र पाहायला मिळालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 08:26 PM2019-11-07T20:26:27+5:302019-11-07T20:26:43+5:30

whatsapp join usJoin us
India vs Bangladesh, 2nd T20I: Rohit Sharma abuse word over to the umpires? It can be big action | India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्मानं पंचांना दिल्या शिव्या? होऊ शकते मोठी कारवाई

India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्मानं पंचांना दिल्या शिव्या? होऊ शकते मोठी कारवाई

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20त रोहित शर्मानं तिसऱ्या पंचांना शिव्या घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्याच्या या कृत्याची गंभीर दखल घेतली जाऊ शकते आणि त्याच्यावर मोठी कारवाईही केली जाऊ शकते. नेमकं असं काय घडलं?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रिषभ पंतकडून अजानतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण, बांगलादेशच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करून भारताच्या चमून चिंतेचं वातावरण निर्माण केलं. बांगलादेशनं पहिल्या पॉवर प्ले मध्ये एकही विकेट न गमावता 54 धावा केल्या. सहाव्या षटकात भारताला यश मिळालं होतं, परंतु यष्टिरक्षक रिषभ पंतची एक चूक महागात पडली. 

सहाव्या षटकात रोहितनं चेंडू फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हाती सोपवला. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभनं स्टम्पिंग करताना लिटन दासला माघारी पाठवले. पण, तिसऱ्या पंचांनं रिषभची एक चूक पकडली अन् बांगलादेशच्या फलंदाजाला जीवदान मिळालं. पंतनं चेंडू स्टम्पच्या पुढे पकडून स्टम्पिंग केली आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नो बॉल देत लिटन दासला नाबाद ठरवलं. त्यानंतर सातव्या षटकात रोहितनं लिटनचाच झेल सोडला. पण, त्यानंतर पंतनेच टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. पंतनं लिटन दासला धावबाद करून माघारी पाठवले. लिटनने 21 चेंडूंत 4 चौकारांसह 29 धावा केल्या. बांगलादेशनं 10 षटकांत 1 बाद 78 धावा केल्या.


वॉशिंग्टन सूंदरनं भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानं मोहम्मद नईमला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. नईमने 31 चेंडूंत 5 चौकारांसह 36 धावा केल्या. बाराव्या षटकात कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर मुश्फिकर रहीमनं पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क झाला नाही. पण, तरीही पंत तो चेंडू हवेत शोधत राहिला आणि स्टेडियमवर एकच हास्यकल्लोळ झाला. त्यानंतर चहलने 13व्या षटकात बांगलादेशच्या दोन प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले.

मुश्फिकर रहिम ( 4) आणि सौम्या सरकार ( 30) एकाच षटकात बाद झाले. 13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंतनं सरकारला यष्टिचीत केले. पण, तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला आणि सुरुवातीला नाबाद असा निर्णय दिला. पण, त्यांना ही चूक लक्षात येताच त्यांनी निर्णय मागे घेत सरकारला बाद दिले. पंचांच्या या चुकीवर रोहित भडकला आणि शिव्या दिल्या. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला...

Web Title: India vs Bangladesh, 2nd T20I: Rohit Sharma abuse word over to the umpires? It can be big action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.