अजय देवगण आयुष्यात नसता तर या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काजोलने केले असते का लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:24 AM2020-04-22T10:24:04+5:302020-04-22T14:52:08+5:30

काजोलनेच तिच्या फॅन्सशी संवाद साधताना या प्रश्नाचे हटके अंदाजात उत्तर दिले होते.

Kajol marries Shahrukh Khan if she does not meet Ajay Devgan? Actress openly answers Fan’s question PSC | अजय देवगण आयुष्यात नसता तर या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काजोलने केले असते का लग्न?

अजय देवगण आयुष्यात नसता तर या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काजोलने केले असते का लग्न?

googlenewsNext
ठळक मुद्देकरण अर्जुन, कुछ कुछ होता है, दिलवाले, कभी खुशी कभी गम, माई नेम इज खान अशा अनेक चित्रपटात काजोल आणि शाहरुखची हटके केमिस्ट्री त्यांंच्या चाहत्यांना पाहायला मिळाली.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. त्यामुळे सगळेच सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. त्यात अनेक सेलिब्रेटींच्या सोशल मीडियावरील जुन्या मुलाखती देखील व्हायरल झाल्या आहेत. काजोलने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यातील काही प्रश्नांवर तिने सडेतोड उत्तर दिले होते. हाच तिचा फॅन्ससोबतचा संवाद सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. 

90 च्या दशकात शाहरुख खान आणि काजोल या जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. आजही तुमची आवडती बॉलिवूड जोडी कोण असे विचारल्यास अनेकांचे उत्तर काजोल-शाहरूख असेच येईल. 1993 साली ‘बाजीगर’ या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर एकत्र झळकलेल्या या जोडीने यानंतर अनेक सुपरहिट सिनेमे दिले. यातल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाने तर लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले. करण अर्जुन, कुछ कुछ होता है, दिलवाले, कभी खुशी कभी गम, माई नेम इज खान अशा अनेक चित्रपटात काजोल आणि शाहरुखची हटके केमिस्ट्री त्यांंच्या चाहत्यांना पाहायला मिळाली.

रिल लाईफमध्ये इतक्या लोकप्रिय ठरलेल्या या जोडीला रिअल लाईफमध्ये एकत्र पाहण्याचा मोह कुणाला होणार नाही? याच मोहापोटी एका चाहत्याने सोशल मीडियाद्वारे काजोलशी संवाद साधताना तिला एक आगळा वेगळा प्रश्न विचारला होता. ‘तुझ्या आयुष्यात अजय देवगण आला नसता तर तू शाहरुखसोबत लग्न केलं असतंस का?’खरं तर या प्रश्नाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या प्रश्नावर काजोलला राग येईल का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण काजोलने यावर अगदी तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असे उत्तर दिले. ‘पुरूषाने प्रपोज करायला नको का?’ असे हटके उत्तर देत काजोलने सगळ्यांचे मन जिंकले होते.

खऱ्या आयुष्यात काजोल आणि शाहरूख एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असून त्यांनी अनेक चॅट शोंना आजवर एकत्र हजेरी लावली असून त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले आहेत.

Web Title: Kajol marries Shahrukh Khan if she does not meet Ajay Devgan? Actress openly answers Fan’s question PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.