
shorts: मंत्रालयात मंत्र्यांचे अतिक्रमण, सामान्यांच्या हक्काच्या जागांवर डल्ला!
मंत्रालयातील मंत्री कार्यालयांनी सामान्य नागरिकांच्या जागांवर अतिक्रमण केले आहे. आगीनंतरही सुधारणा नाही. आपत्कालीन मार्ग बंद, मोकळ्या जागांवर ताबा घेऊन मंजूर जागेपेक्षा जास्त वापर करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय: लाडकी बहीण योजनेमुळे बाजारातील गुंतवणूक तिप्पटीनं वाढली - सुनील तटकरे
मागील १०-१२ वर्षात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यातूनच अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. गेल्या १२-१३ महिन्यात लाडकी बहीण योजनेतून किमान ५० हजार कोटी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मिळाले आहेत. हे पैसेही बाजारात आले. ते साधारण तिप्पट धरले, तर दीड लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असं माजी अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी लंडन येथील 'लोकमत ग्लोबल इकॉनोमिक कन्व्हेन्शन' मध्ये सांगितले.

आंतरराष्ट्रीय: ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले: अमेरिकन तेल कंपन्यांसाठी धोक्याची घंटा?
ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला जवळ केले असून अमेरिकेची गुंतवणूक वाढणार आहे. बलुचिस्तानमधील तेल साठ्यांवर अमेरिकेची नजर आहे, पण तेथील अशांतता पाहता अमेरिकन कंपन्यांना धोका निर्माण होऊ शकतो. चीनच्या CPEC प्रकल्पांमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे.

मुंबई: अतिवृष्टीचा इशारा! मुंबई, ठाणे जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर
मागील २ दिवसांपासून मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. सततच्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार समोर आले आहेत. रस्ते जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे परिसरातील शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी १९ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई शहराला हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्या भेटीची दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. या संभाषणादरम्यान पुतिन यांनी अलीकडेच अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीबाबत पीएम मोदींना माहिती दिली. पुतिन यांचा हा फोन यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आज रात्री युरोपीय नेते झेलेन्स्कीसह वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांना भेटणार आहेत.

राष्ट्रीय: बंगाली स्थलांतरितांना दरमहा ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
परराज्यात काम करणाऱ्या बंगाली स्थलांतरितांना राज्यात परतण्याचं आवाहन करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्रमोश्री योजना जाहीर केली आहे. योजनेतून स्थलांतरितांना एक वर्षासाठी प्रत्येक महिन्याला ५ हजार रूपये मोफत प्रवासी भत्ता देऊ. हे पैसे आयटीआय आणि कामगार विभागाकडून दिले जातील. स्थलांतरितांना जॉब कार्डसह विविध ठिकाणी नोकरी दिली जाईल. ही योजना केवळ इतर राज्यातून परतणाऱ्या स्थलांतरितांसाठी आहे असं त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र: वाल्मीक कराडच्या जामिनावर उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद; न्यायालयाने निकाल ठेवला राखीव!
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मीक कराड व त्याचा साथीदार विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. उज्ज्वल निकम यांनी जामीनाला विरोध दर्शवला. कराडच्या वकिलांनी अटकेच्या कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्याचे निकम यांनी खंडन केले. न्यायालयाने निकाल राखून ठेवला, पुढील सुनावणी 30 ऑगस्टला होणार आहे.

राष्ट्रीय: उपराष्ट्रपती निवडणूक: विरोधक तामिळनाडूचा उमेदवार देणार; कोणाचे पारडे जड!
उपराष्ट्रपती निवडणुकीत NDA चे सी.पी. राधाकृष्णन यांच्या विरोधात द्रमुकचे तिरुची शिवा उभे राहण्याची शक्यता आहे. संख्याबळानुसार NDA चं पारडं जड असले तरी, विरोधक टक्कर देणार आहेत. ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांना एनडीएने उमेदवार केले आहे.

महाराष्ट्र: २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला सोडणार होती: प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट
भाजपा शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार होती, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला. भाजपा-राष्ट्रवादी सोबत सरकार बनवणार होते, पण जमले नाही. शरद पवार भाजपा सोबत येण्यास प्रचंड इच्छुक होते, पण गाडी स्लिप झाली, असे पटेल म्हणाले. गोंदियात महायुतीच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये घडलेल्या राजकारणावर गौप्यस्फोट केला.

पुणे: पुणे शहरात मुसळधार पाऊस: जनजीवन विस्कळीत, वाहतूक कोंडी; हवामान खात्याचा 'यलो' अलर्ट
पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याने 'यलो' अलर्ट जारी केला आहे. खडकवासला परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

नांदेड: मुखेडमध्ये पावसाचा हाहाकार, सहा गावे जलमय; १२ जण बेपत्ता!
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान! सहा गावे पाण्याखाली गेली असून अनेकांना बाहेर काढण्यात आले असले तरी अद्याप दहा ते बारा जण बेपत्ता आहेत. तर शंभरहून अधिक जण गावात अडकले आहेत. प्रशासनाने आता बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथकासह सैन्य दलाला पाचरण केले आहे.

राष्ट्रीय: ‘मत चोरी’चा वाद पेटला! निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाची तयारी!
राहुल गांधींच्या 'मत चोरी' आरोपानंतर निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू झालेला वाद आता विकोपाला जाताना दिसत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या हालचाली विरोधकांनी सुरू केल्या आहेत. काँग्रेस खासदार नासिर हुसेन यांनी याविषयी पक्षामध्ये सध्यातरी कुठलीही चर्चा झालेली नाही, मात्र गरज पडल्यास महाभियोग आणण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई: मुंबईत रेड अलर्ट! ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा, शाळांना सुट्टी जाहीर!
मुंबईत मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागांत पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली. हवामान खात्याकडून पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

व्यापार: ॲपलचा चीन आणि ट्रम्पना ठेंगा; भारतात iPhone 17 चं उत्पादन सुरू
ट्रम्प यांच्या विरोधानंतरही, ॲपलनं भारतात उत्पादन वाढवलंय. फॉक्सकॉननं बंगळूरुमध्ये iPhone 17 चं उत्पादन सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. २०२५ पर्यंत ६ कोटी युनिट्सचं उत्पादन करण्याचे लक्ष्य.

महाराष्ट्र: सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पावसाचा इशारा!
गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या पावसाचा जोर आता वाढला आहे. १८-१९ ऑगस्टला कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे घाट परिसरात रेड अलर्ट तर अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

मुंबई: बेस्ट पतपेढी निवडणूक: ठाकरे बंधू विरुद्ध भाजप; आज मतदान, उद्या निकाल!
बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी निवडणुकीत ठाकरे बंधूंचे 'उत्कर्ष' पॅनल विरुद्ध भाजपचे 'सहकार समृद्धी' पॅनल आमनेसामने असणार आहे. आज या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि उद्या निकाल लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीवर या निकालाचा परिणाम संभव आहे. कारण ठाकरे युतीची ही पहिलीच कसोटी आहे.

मुंबई: दहीहंडीत मुंबई पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून कोट्यवधींचा दंड वसूल
मुंबईत दहीहंडी उत्सवात वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांकडून १.१३ कोटींचा दंड वसूल केला. एका दिवसात पोलिसांनी तब्बल १०,०५१ ई-चलान जारी केले. याशिवाय, सीसीटीव्हीमुळे आणखी कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. बेधुंद वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई: मुंबई: चिरा बाजारमध्ये इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी, बचावकार्य सुरू
मुंबईच्या चिरा बाजारमध्ये इमारतीचा भाग कोसळल्याने तिघे जखमी झाले. मुसळधार पावसात अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू आहे. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रीय: फक्त रडणे हुंडा छळाचा गुन्हा सिद्ध करत नाही: दिल्ली उच्च न्यायालय
दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, केवळ महिला रडत असल्याने हुंडा छळाचा गुन्हा सिद्ध होत नाही. न्यायालयाने एका पुरुषाला व त्याच्या कुटुंबीयांना निर्दोष ठरवले. महिलेच्या कुटुंबीयांनी हुंड्याची मागणी केल्याचा आरोप केला होता, परंतु न्यायालयाने तो फेटाळला, कारण शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण न्यूमोनिया असल्याचे नमूद केले आहे.

महाराष्ट्र: ब्रेकिंग! महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत!
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपाने सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आहे. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक होत आहे. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असून यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी पक्षाची निवड अंतिम करण्यासाठी बोलावलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय: योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता
उत्तर प्रदेशात दोन वर्षांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपा १०० हून अधिक आमदारांचे तिकीट कापण्याची शक्यता. सपाच्या भाजपात येऊ इच्छिणाऱ्या आमदारांनाही परीक्षा द्यावी लागणार. लोकसभेतील नुकसानीनंतर भाजपा कमजोर आमदारांना बाजूला करण्याच्या तयारीत. भाजपाला विजयाची हॅटट्रिक साधायची आहे! भाजपाने अंतर्गत हालचाली सुरु केल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्र: पुण्यातील बॅनरवर अण्णा हजारेंनी सोडले मौन; म्हणाले, "हे माझे दुर्दैव..."
"अण्णा आता तरी उठा" पुण्यात झळकलेल्या या बॅनरवर अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली. वयाच्या ९० व्या वर्षानंतर मीच आंदोलन करतच बसू, तुम्ही झोपायचे का? असा सवाल करत तरुणांनी भ्रष्टाचारविरोधी लढा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'देशासाठी बलिदान देणाऱ्यांची आठवण ठेवा, नुसते तिरंगा हातात घेऊन काही होणार नाही, मी केलेल्या कायद्यांचा तरुणांनी उपयोग करावा,' असे आवाहन करत त्यांनी तरुणाईला जागं होण्याचा संदेश दिला.

कोल्हापूर: कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन झाले. 46 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या इमारतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील नागरिकांना फायदा होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय: ...त्याचवेळी तुम्ही आक्षेप का घेतले नाहीत?; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना थेट प्रश्न
जेव्हा निवडणूक कार्यालयाकडून महाराष्ट्रातील मतदारांची मसुदा यादी प्रसिद्ध केली गेली, त्याचवेळी दावे आणि आक्षेप का सादर केले नव्हते? परंतु जेव्हा निकाल लागला तेव्हा ते चुकीचे होते ही आठवण झाली. आजपर्यंत एकही आक्षेप पुराव्यासह महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांना मिळाले नाहीत. एखादी गोष्ट तुम्ही दहावेळा, वीस वेळा बोलला म्हणून ते सत्य होईल असं नाही असं सांगत मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले.

राष्ट्रीय: केंद्रीय निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना आव्हान: प्रतिज्ञापत्र द्या, अन्यथा माफी मागा!
मतदार यादीबाबत राहुल गांधी यांनी केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. हे आरोप चुकीचे असून ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा असं आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिले आहेत. विना प्रतिज्ञापत्र अशा गंभीर आरोपांवर निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही, कारण ते संविधान आणि निवडणूक आयोग दोघांच्याही विरोधात होईल असं त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय: जिथे नवीन मतदार, तिथे भाजपचा विजय; महाराष्ट्रात EC ने 1 कोटी मतदार निर्माण केले: राहुल गांधी
राहुल गांधींनी बिहारमध्ये 'मतदार हक्क यात्रा' सुरू केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने १ कोटी नवीन मतदार निर्माण केल्यामुळे भाजपचा विजय झाल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले, मात्र ते भाजपला विचारत नाहीत. जेव्हा आम्ही सीसीटीव्ही मागितले, तेव्हा त्यांनी नकार दिला. लोकसभा-विधानसभेच्या मतांची चोरी होत आहे. बिहारमध्येही ते मतदारांना विभागून मतांची चोरी करण्याची तयारी करत आहेत. मात्र, आम्ही त्यांना हे करू देणार नाही, असेही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय: नोबेलसाठी उतावळे ट्रम्प! नॉर्वेला टेरिफची धमकी
नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा उतावळेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यांनी चक्क नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करत टेरिफ लावण्याची धमकी. इस्रायल-हामस युद्ध थांबवल्याचा दावा फोल ठरला आहे. भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा दावा भारताने फेटाळला आहे. शांततेच्या पुरस्कारासाठी त्या देशालाच धमकी देणे चुकीचे आहे हे ट्रम्प विसरले आहेत. आता ट्रम्प यांना नोबेल मिळणार का? हे पाहणे औत्स्युक्याचे ठरले आहे.

राष्ट्रीय: निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना प्रत्युत्तर, 'मत चोरी'चे आरोप फेटाळले!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'मत चोरी' आणि बिहारमधील SIR वरुन केलेल्या आरोपांबाबत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी(दि. १७) महत्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मत चोरीच्या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावले. तसेच, "निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष समान आहेत. निवडणूक आयोग कोणाशीही भेदभाव करत नाही. निवडणूक आयोगाचे दरवाजे चर्चेसाठी नेहमीच सर्वांसाठी समान खुले असतात," असे स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय: आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात
पहलगाम हल्ल्यानंतर भारतापाठोपाठ आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार आहे. तालिबानने नद्यांवर धरणे बांधायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे पाकिस्तान आणि इराणमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानला शेतीसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी पाणी हवे आहे, ज्यामुळे आशियाई देशांमध्ये तणाव आहे. अफगाणिस्तानातून आशियातील सर्व देशांना वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखण्यात येणार आहे.

व्यापार: सौदी-इराण नाही, 'या' देशात सर्वात स्वस्त पेट्रोल; भारताचा कितवा क्रमांक ?
११ ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या जागतिक पेट्रोल किमतींच्या आकडेवारीनुसार, लिबियामध्ये तेलाची किंमत २.४५ रुपये प्रति लिटर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगभरातील विविध देशांमधील पेट्रोलच्या किमतींची आकडेवारीवर जारी केली आहे. लिबियानंतर, इराण दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे तेलाची किंमत २.५४ रुपये प्रति लिटर आहे. त्यानंतर व्हेनेझुएला येतो, जिथे १ लिटर तेलाची किंमत ३.०७ रुपये आहे. या यादीमध्ये भारताचा २१ वा क्रमांक आहे.

राष्ट्रीय: यंदा दिवाळीला डबल बोनस! पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
पंतप्रधान मोदींनी द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले, दिल्लीच्या विकासाचे आश्वासन दिले. जीएसटी सुधारणा आणि दिवाळीत डबल बोनसची घोषणा करत सुधारणांची राज्यांना माहिती पाठवली. सर्व राज्ये सरकारला सहकार्य करतील, अशी आशा व्यक्त केली. दिवाळीत 'मेड इन इंडिया' वस्तू खरेदी करण्याचे मोदींचे आवाहन, स्थानिक व्यापाऱ्यांनाही केले भारतीय वस्तू विकण्याचे आवाहन.