आयुष्यभर चवळीची शेंग पण चाळिशीनंतर झाली लठ्ठ, असं का? चाळिशीनंतर महिला जाड होतात कारण..

Updated:December 2, 2025 19:12 IST2025-12-02T12:37:05+5:302025-12-02T19:12:03+5:30

आयुष्यभर चवळीची शेंग पण चाळिशीनंतर झाली लठ्ठ, असं का? चाळिशीनंतर महिला जाड होतात कारण..

आपल्या आसपासच्या अशा अनेक महिला आपण पाहातो ज्या तरुणपणी अगदी सुडौल, सडपातळ असतात. पण जसा त्या चाळिशीचा टप्पा ओलांडतात तशा त्या एकदम लठ्ठ दिसू लागतात.

आयुष्यभर चवळीची शेंग पण चाळिशीनंतर झाली लठ्ठ, असं का? चाळिशीनंतर महिला जाड होतात कारण..

असं एकदम वजन वाढण्यामागे तरुणपणी त्या महिला करत असलेल्या काही चुका कारणीभूत ठरतात. म्हणूनच वजनात असा एकदम फरक पडू नये म्हणून अगदी तरुणपणापासूनच काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

आयुष्यभर चवळीची शेंग पण चाळिशीनंतर झाली लठ्ठ, असं का? चाळिशीनंतर महिला जाड होतात कारण..

बहुतांश महिलांचा हा समज असतो की नोकरी, घर, मुलांच्या मागे पळणे, घरातली कामे करणे हाच माझ्यासाठी व्यायाम आहे. मला फिटनेससाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. पण असं घरकाम करणं तुम्हाला फिट ठेवू शकत नाही. त्यासाठी संपूर्ण शरीराचा व्यायाम योग्य पद्धतीनेच व्हायला हवा.

आयुष्यभर चवळीची शेंग पण चाळिशीनंतर झाली लठ्ठ, असं का? चाळिशीनंतर महिला जाड होतात कारण..

काही जणी एकच एक प्रकारचा व्यायाम म्हणजेच उदाहरणार्थ चालण्याचा व्यायाम सलग वर्षांनुवर्षे करतात. याचाही वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फारसा उपयोग होत नाही.

आयुष्यभर चवळीची शेंग पण चाळिशीनंतर झाली लठ्ठ, असं का? चाळिशीनंतर महिला जाड होतात कारण..

वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मसल फिटनेस महत्त्वाचे आहे. स्नायूंचा व्यायाम होईल असे कार्डिओ व्यायाम, वेटलिफ्टिंग असे प्रकारही नियमितपणे करायला हवे.

आयुष्यभर चवळीची शेंग पण चाळिशीनंतर झाली लठ्ठ, असं का? चाळिशीनंतर महिला जाड होतात कारण..

चाळिशीपर्यंत साधारणपणे पचनक्रिया, मेटाबॉलिझम चांगले असते. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साचत नाही. पण नंतर मात्र वयानुसार खाण्यापिण्यात बदल केला नाही तर त्याचा परिणाम पचनक्रिया आणि चयापचय क्रियेवर होतो आणि वजन वाढत जाते.