हिवाळा सुरु झाला की वातावरणात गारवा असतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.(Kidney health in winter) हिवाळ्यात आपल्याला आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. पण या काळात शरीरातील अंतर्गत अवयवांकडे विशेष लक्ष दिले जात नाही.(Ayurvedic kidney care) त्यातही किडनीचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं असतं. किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करते. हवामानातील गारव्यामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो.(Best water for kidney health) आपल्याला तहान कमी लागते, पाणी कमी प्यायलं जातं ज्याचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होतो. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात योग्य प्रकारे पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. (Ayurveda tips for kidneys)
अजरख प्रिंटेंड साडीचे ५ लेटेस्ट डिझाइन्स! डेली वेअर, पार्टी - ऑफिससाठी सुंदर पर्याय, दिसाल झक्कास
आचार्य बाळकृष्ण यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्पष्ट केले की हिवाळ्यात कोमट पाणी पिणे हे सगळ्यात जास्त फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार कोमट किंवा किंचित गरम पाणी पिणे हे औषधाइतकेच उपयुक्त आहे. कोमट पाणी प्यायल्याने आपल्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
हवामान थंड असल्यामुळे आपले शरीर सुस्तावते. थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेचा वेग देखील मंदावतो. कोमट पाणी पोटात गेल्याने पचनक्रिया सक्रिय होते. ज्यामुळे गॅस, आम्लता सारख्या समस्या कमी होतात. ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य मजबूत होते. म्हणून हिवाळ्यात कोमट पाणी प्यायला हवे.
हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो, ज्यामुळे आपल्या किडनीवर दबाव येऊ शकतो. कोमट पाणी प्यायल्याने शरीराला पुरेसे पाणी मिळते. डिहायड्रेशन्सची समस्या कमी होऊन किडनी योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. कोमट पाणी प्यायल्याने मूत्रपिंडावर परिणाम होत नाही. त्याउलट आरोग्याला मदत होते. विषारी पदार्थ शरीरातून बाहेर निघण्यास मदत होतात. रक्ताभिसरण आणि लघवीचा प्रवाह देखील सुधारतो. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होण्यास मदत होते. जास्त गरम पाणी पिऊ नका. कोमट पाणी प्यायल्याने अन्नाचे विघटन लवकर होते. ज्यामुळे अपचन, पोट जड असण्याच्या समस्या कमी होतात. रक्ताभिसरण सुरळीत होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. सकाळच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केल्यास विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे त्वचा, पचन आणि चयापचय यांना फायदा होतो. तसेच सर्दी- खोकल्यासारख्या आजारापासून देखील आपल्याला आराम मिळतो.
पाणी कसं प्यावं?
1. सकाळी १ ग्लास नियमितपणे कोमट पाणी प्यायला हवं.
2. दिवसभर थंड पाणी पिण्याऐवजी आपण कोमट पाणी प्यावं
3. जास्त गरम किंवा उकळते पाणी पिऊ नका. यामुळे तोंडाला आणि घशाला इजा पोहोचू शकते.
4. दिवसभरात ६ ते ८ ग्लास पाणी प्या. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होईल.
