शेषराव वानखेडे यांच्यानंतर अजित पवारांनी मिळविला सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:38 IST2025-03-11T10:36:57+5:302025-03-11T10:38:04+5:30

वार यांनी अलीकडील  काळात २०११..१२ पासून हा मान मिळविला आहे.त्यामुळे आजचा दिवस बारामतीकरांसाठी वैशिष्ठ्यपुर्ण ठरला आहे.

After Sheshrao Wankhede Ajit Pawar has achieved the distinction of presenting the budget the most times. | शेषराव वानखेडे यांच्यानंतर अजित पवारांनी मिळविला सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान

शेषराव वानखेडे यांच्यानंतर अजित पवारांनी मिळविला सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान

बारामती  -  बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री खात्याचा कार्यभार संभाळणार्या अजित पवार यांनी आतापर्यंत सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान मिळविला आहे.बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांनी १३ वेळा  अर्थसंकल्प सादर केला आहे.तर सोमवारी(दि १०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कारकीर्दीतील   अकरावा अर्थसंकल्प सादर केला.बॅरीस्टर वानखेडे यांनी महाराष्ट्राच्या सुरवातीच्या काळात १९६० च्या दशकात हा मान मिळविला.तर पवार यांनी अलीकडील  काळात २०११..१२ पासून हा मान मिळविला आहे.त्यामुळे  आजचा दिवस बारामतीकरांसाठी वैशिष्ठ्यपुर्ण ठरला आहे.

बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांनी अर्थमंत्री म्हणून १३ वेळा अर्थसंकल्प मांडले आहेत. ११ जुलै १९६० ला वानखेडे यांनी सुरवातीचा अर्थसंकल्प मांडला. १९६०...६१,१९६१..६२,१९६४...६५,१९६५..६६, तसेच १९६६..६७ ,त्यानंतर १९६७...६८ मध्ये २३ मार्च आणि १५ जुन रोजी दोन वेळा वानखेडे यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर १९६८..६९,१९६९...७० मध्ये १९ मार्च आणि १७ जुन रोजी दोन वेळा,१९७०...७१,१९७१...७२ मध्ये वानखेडे यांनी शेवटचा अर्थसंकल्प सादर केला.

तर उपमुख्यमंत्री पवार यांनी सुरवातीला २०११..१२,२०१२..१३,२०१४...१४ मध्ये २५ फेब्रुवारी आणि ५ जुन रोजी दोन वेळा,२०२०...२१,२०२१...२२,२०२२...२३,२०२४...२५ मध्ये २७ फेब्रुवारी आणि २८ जुन रोजी,तर २०२४..२५, तसेच नुकताच पवार यांनी २०२५...२६ चा ११ वा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील यांना मिळाला आहे. त्यांनी आतापर्यंत १९ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

तर सुशीलकुमार शिंदे यांनी तब्बल ९ वेळा,१९७० च्या दशकात मधुकरराव चाैधरी यांनी ५ वेळा, यशवंतराव मोहिते यांनी चार वेळा,१९८० च्या दशकात शंकरराव चव्हाण यांनी एकदा,रामराव आदीक यांनी ७ वेळा,डाॅ.व्ही सुब्रमण्यम यांनी एकदा,१९९० च्या दशकात हशु अडवाणी,गोपीनाथ मुंडे यांनी एकदा,तर एकनाथराव खडसे यांनी ३ वेळा,महादेवराव शिवणकर यांनी २ वेळा,तसेच दिलीप वळसे पाटील यांनी २००९...१० मध्ये दोन वेळा, त्यानंतर २०१०...११ ला सुनील तटकरे, तसेच २०१५...१६ नंतर सुधीर मुनगटीवार यांनी ६ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

दरम्यान,उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे महायुती सरकारमध्ये  अर्थमंत्री खात्याचा कार्यभार आहे.तसेच पवार यांचा या सरकारमधील पहिलाच अर्थसंकल्प आहे.आणखी चारवेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी पवार यांना मिळणार असल्याचे उघड आहे.त्यामुळे १५ वेळा अर्थसंकल्प सादर करुन सर्वांचेच   रेकॉर्ड मोडण्याची संधी अजित पवारांकडे आहे.

Web Title: After Sheshrao Wankhede Ajit Pawar has achieved the distinction of presenting the budget the most times.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.