अचानक बॉलिवूडमधून गायब झाली Rimi Sen ?काय होतं त्यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 07:28 PM2021-04-16T19:28:13+5:302021-04-16T19:34:39+5:30

अभिनयाचे क्षेत्र सोडाव्या लागलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री रिमी सेन. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या मेहनतीने मॉडेलिंग तसेच व्यावसायिक जाहिरातीत रिमीने आपले स्थान निर्माण केलं. याच मेहनतीमुळे तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

'हंगामा' हा तिचा पहिला चित्रपट. अक्षय खन्ना, आफताब आणि रिमी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या विनोदी चित्रपटाने चांगलं यश मिळवलं.

यानंतर दिवाने हुए पागल, क्युंकी, गरम मसाला, धूम, फिर हेरा फेरी, गोलमाल अनलिमिटेड या चित्रपटातही तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या.

रिमीने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमे केले आहेत. काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलीवुडमध्ये फारसं यश मिळालं नाही.

रिमीकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या.

यापैकी बहुतांशी भूमिका बोल्ड होत्या. मात्र पुढच्या काळात रिमीला एकाच प्रकारच्या, एकाच धाटणीच्या भूमिका मिळू लागल्या.

त्यामुळे एकाच पठडीतील भूमिका साकारल्याने रिमी कंटाळली. अशाप्रकारच्या भूमिका न साकारण्याचा निर्णय तिने घेतला.

हाच निर्णय तिला भारी पडला आणि रिमीच्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला. यानंतर तिने निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.

बॉलीवुडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रिमीला वाटतं. गेल्या काही वर्षांपासून ती लाईमलाइटपासून दूरच राहणे पसंत करते.

स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस तिने स्थापन केलं. २०१५ साली रिमीची निर्मिती असलेल्या बुधिया सिंह- बॉर्न टू लर्न या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

एक अभिनेत्री म्हणून जीवनातला एक निर्णय चुकला आणि करिअर संपुष्टात आले अशी कबुली रिमीने एका मुलाखतीत दिली होती.