कधी काळी आघाडीची अभिनेत्री होती नम्रता शिरोडकर, वयाच्या ४९ वर्षी आता अशी दिसू लागली ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 02:40 PM2021-01-22T14:40:55+5:302021-01-22T14:45:47+5:30

अभिनेत्री नम्रात शिरोडकरने दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबूसह लग्न करत संसार थाटला. आज नम्रता आपला ४९ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. एकेकाळी टॉपची अभिनेत्री म्हणून नम्रता शिरोडकर ओळखली जायची.

लग्नानंतर तिने सिनेमात काम करणे बंद केले आणि संसारात रमली. आज आलिशान आयुष्य ती जगत आहे.

नम्रता शिरोडकर १९९३ मध्ये फेमिना मिस इंडियाचाही किताब जिंकला होता.

यानंतर नम्रताने सलमान खान आणि ट्विंकल खन्नासह 'जब प्यार किसीसे होता है' सिनेमातून पदार्पण केले होते.

त्यावेळी हा सिनेमा फारसा कमाल दाखवू शकला नाही.

सिनेमा सुपर फ्लॉप ठरला मात्र नम्रताकडे यानंतर अनेक ऑफर्स आल्या होत्या.

पहिल्या सिनेमानंतर नम्रताने तेलुगू सिनेमा 'वामसी'मध्ये झळकली होती.

विशेष म्हणजे या सिनेमाचा अभिनेता हा महेशबाबू होता.

'वामसी' हा महेशबाबूचा पहिला सिनेमा होता.2000 साली याच सिनेमाच्या सेटवर नम्रता आणि महेशबाबू यांची पहिली भेट झाली होती.

याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढू लागली होती. दोघांनी जवळपास एकमेकांना ४ वर्ष डेट केले त्यानंतर लग्नबंधनात अडकले होते.

१० फेब्रुवारी २००५ मध्ये दोघांनी लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली. आज या कपलला दोन मुंल आहेत.

'कच्चे धागे', 'वास्तव', 'पुकार', 'दिल विल प्यार व्यार', 'वामसी', 'हीरो हिंदुस्तानी', 'आगाज', 'प्राण जाए पर शान ना जाए', 'अलबेला' हे नम्रताचे सुपरहिट सिनेमे राहिले आहेत.

२००४ मध्ये नम्रता तेलुगू सिनेमा 'अंजी' मध्ये शेवटची झळकली त्यानंतर तिने इंडस्ट्रीला राम - राम ठोकला.