नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ बाधित 27 गाव कृती समितीचा नोटाचा इशारा ;बैठकीत घेतला निर्णय
By वैभव गायकर | Updated: May 11, 2024 15:00 IST2024-05-11T14:58:55+5:302024-05-11T15:00:02+5:30
Navi Mumbai News: लोकनेते दि बा पाटील 27 गाव कृती समितीने मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवार दि.13 रोजी पार पडणाऱ्या मतदानात नोटाचा वापर करण्याचा ईशारा दिला आहे.

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ बाधित 27 गाव कृती समितीचा नोटाचा इशारा ;बैठकीत घेतला निर्णय
-वैभव गायकर
पनवेल - पनवेल मधील ज्या गावांच्या बलिदानाने आज नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ उभा राहिला आहे.10 गावे कायमस्वरूपी विस्थापित झाली अशा गावांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या लोकनेते दि बा पाटील 27 गाव कृती समितीने मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवार दि.13 रोजी पार पडणाऱ्या मतदानात नोटाचा वापर करण्याचा ईशारा दिला आहे.
मागील पाच वर्षात दिबांच्या नावाचा केवळ वापर सत्ताधारी आणि विरोधक करीत आहेत.आम्ही दिबांच्या नावासाठी भांडत असताना केवळ राजकारण दिबांच्या नावाने सुरु असल्याने या मतदान प्रक्रियेत नोटा चे बटन दाबून आम्ही या निवडणुकीत कोणालाही पसंती देणार नसल्याचे कृती समितीचे प्रवक्ते ऍडव्होकेट विक्रांत घरत यांनी स्पष्ट केले.विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी जी समिती कार्यरत आहे.त्या समितीची भूमिका देखील संशयास्पद असून आम्ही त्या समितीचा निषेध करत असल्याचेही घरत यांनी यावेळी सांगितले.दिबांच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर होत असुन आम्ही नोटाच्या माध्यमातुन 27 गावांची ताकद या निवडणुकीत दाखवुन देऊ असाही ईशारा यावेळी 27 गाव समितीने दिला आहे.
प्रत्येक निवडणुकीत घाटावरील उमेदवार कशासाठी - मावळ लोकसभा मतदार संघाच्या स्थापनेला जवळपास 20 वर्ष होत आली आहेत.मात्र आजवर एकही प्रमुख पक्षाने पनवेल,उरण तसेच कर्जतचा उमेदवार देऊ केला नसल्याने आजवर केवळ घाट माथ्यावरील उमेदवारच मावळचे प्रतिनिधित्व करत आला आहे.त्यामुळे आपोआपच घाटाखालील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.